कर्म, स्वधर्म, परधर्म, निष्कर्म सविस्तर माहिती -Karm, Swadharm, Adharm

*प्रश्न आमचा उत्तर तुमचे*
 *शृंखला  5, अध्याय 3*
*दिनांक ७ एप्रिल 2025  पर्यंत उत्तरे पाठवावीत*
प्रश्न 1: अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला? निष्क्रियता आणि कर्म यामध्ये काय फरक आहे?
प्रश्न 2: निष्काम कर्म म्हणजे काय? कर्म बंधनातून मुक्ती कशी मिळते?
प्रश्न 3: स्वधर्म पाळण्याचे महत्त्व काय? परधर्म का टाळावा?

उत्तरे...

1. भारती शेटे ताई लिहितात.....

प्रश्न 1: अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला? निष्क्रियता आणि कर्म यामध्ये काय फरक आहे?
उत्तर:-ऐन युद्धाच्या वेळेस अर्जुनाच्या मनात युद्ध करण्याविषयी संभ्रम निर्माण झाला जेव्हा त्याने युद्धामध्ये आपल्या समोरच्या विरुद्ध पार्टीमध्ये आपलेच पितामह भीष्म, आपलेच गुरु द्रोणाचार्य आणि इतर जेष्ठ श्रेष्ठ मंडळी तसेच आपलेच नातेवाईक म्हणजेच चुलत बंधू दुर्योधन, दुशासन यांच्यापैकी अनेक जण पाहिले तेव्हा असे युद्ध न केलेले चांगले,युद्ध करणे योग्य की अयोग्य या विचारांमधून अर्जुन बाहेरच येऊ शकत नव्हता त्याला युद्ध न करणे योग्य वाटत होते कारण गुरुजनांवर हात उगारणे कधीही चुकीचेच असे त्याचे मनात होते. 
        हा अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग शिकविला आहे 
    येथेच पुढे विचारले आहे निष्क्रियता आणि कर्म म्हणजे काय? यामध्ये फरक काय? तर निष्क्रियता म्हणजे कामच न करणे पण तरीही आपल्या दैनंदिन हालचालीसाठी सुद्धा आपण काही ना काही कर्म करत असतो, जसे उठणे, बसणे, चालणे, जेवण करणे या सर्व क्रिया , शरीराच्या चलनवलनाच्या  क्रियाच आहेत त्याला त्यांनी कर्म असे म्हटले नाही पण ते निष्क्रियताही होत नाही. म्हणजे कर्म न करता कोणीही राहू शकत नाही जीवनात जन्म घेतला म्हणजे कर्म आलेच, चांगले वाईट जे ही आपल्याला वाटयाला येईल ते कर्म आपल्याला करावेच लागते पण कोणतेही कर्म हे भगवंताला स्मरून भगवंता प्रित्यर्थ केल्याने त्याच्यामध्ये मी पणआ संपुष्टात येतो. आणि ते कर्म केल्याचा किंवा त्या कर्मा विषयीची निर्माण होणारी आसक्ती आपल्यामध्ये येत नाही.

प्रश्न 2: निष्काम कर्म म्हणजे काय? कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते?
उत्तर:- निष्काम कर्म म्हणजे निस्वार्थ किंवा इच्छा शून्य कृती. निष्काम कर्म ही कोणतीही फळे किंवा परिणामांची अपेक्षा न करता केलेली क्रिया आहे. मुक्तीच्या कर्मयोग मार्गाचा मध्यवर्ती सिद्धांत हा निष्काम कर्म आहे. फळाच्या आणि आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे केवळ भगवंतासाठी समत्व बुद्धीने कार्य करत राहणे म्हणजे निष्काम कर्मयोग आहे 
"न करमणा मनारंभा नेष्करम्याम पुरुषओ ष्नुते | नच सन्य सनादेव सिद्धीम समधी गच्छती"||3.4||
या ओवी मध्ये निष्काम कर्माचा अर्थ सांगितलेला आहे 
         ज्या स्थितीत मनुष्याचे कर्म अकर्म होतात अर्थात बंधनकारक राहत नाहीत त्या स्थितीला निष्कर्मता असे म्हणतात. कामना रहित होऊन केल्या गेलेल्या कर्माला फल देण्याच्या शक्तीचा असा अभाव होतो जसे भाजलेल्या किंवा उकळलेल्या बीजात अंकुरण क्षमता संपूर्णपणे नष्ट होते म्हणून निष्काम कर्म करणाऱ्या मनुष्याच्या कर्मात पुन्हा जन्म मरनाच्या चक्रामध्ये भ्रमण करण्याची शक्ती राहत नाही जेव्हा संपूर्ण कर्म दुसऱ्याच्या सेवेसाठी केले जाते आपल्यासाठी नव्हे तेव्हा कामानेचा त्याग होऊ शकतो कारण संपूर्ण कर्माचा संबंध संसाराशीआहे आणि आपला संबंध परमात्म्याशी आहे जोपर्यंत आपल्यासाठी कर्म केले जाईल तोपर्यंत कामानेचा त्याग होणार नाही आणि जोपर्यंत कामानेचा त्याग होणार नाही तोपर्यंत निष्करमता प्राप्त होणार नाही
याच प्रश्नांमधील दुसरा प्रश्न जो कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते ते 30 व्या श्लोकात सांगितले आहे तो असा "मयि सर्वांणी कर्मणी संननय साध्यात्मचे तसा|  निराशिरनिर्म मो भूतवा युद्धयस्व विगत ज्वरः"
म्हणजे काय तर कोणतेही कर्म करण्यापूर्वी भगवंताला स्मरून भगवंतासाठी आपल्यालां फक्त कर्तव्य बुद्धीने भगवंतासाठी हे कर्म करत आहोत असेच स्मरण केल्याने आपल्याला त्या कर्मापासून किंवा त्या कर्म बंधनापासूनच मुक्ती मिळेल असे भगवान श्रीकृष्ण येथे सांगतात

प्रश्न 3: स्वधर्म पाळण्याचे महत्त्व काय? परधर्म का टाळावा?
उत्तर:-"श्रेयान स्वधर्म विगुण: परधर्मात्स्वनुश्ठितात| स्वधरमे  निधनम  श्रेय: परधर्मओ भयावह:||3.35||
आपल्या धर्मात मरणेही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म हा भय देणारा आहे. जसे येथे अर्जुन पुन्हा पुन्हा म्हणत होता की मी भिक्षा मागून वनचरी हिंडून जगून घेईन पण मी युद्ध करणार नाही कारण अर्जुन हा क्षत्रिय धर्मात जन्मलेला होता आणि युद्ध करणे हे क्षत्रिय धर्माचे ज्येष्ठ, श्रेष्ठ कर्तव्य आहे त्याच्यासाठी त्याला समजावताना भगवान श्रीकृष्णांनी या ओवी सांगितल्या आहेत. 
       त्याचा अर्थ असा की इतर वर्ण आश्रम इत्यादींचा धर्म बाहेरून आपल्याला गुणसंपन्न वाटत असेल त्याच्या पालनात सोपे पणा असेल, पालन करण्यात मनही लागत असेल, धन वैभव सुख सुविधा मान प्रतिष्ठा इत्यादी मिळत असतील आणि जीवनभर सुख आणि आरामात राहावयास मिळत असेल तरीसुद्धा त्या परधर्माचे पालन आपल्यासाठी विहित नसल्याने परिणामी दुःख आणि भयदायकच आहे याउलट आपल्यावरणाश्रमाचा धर्म बाहेरून पाहता गुणांनी कमी असेल त्याचे पालन करणे कठीण असेल, पालन करण्यात मन लागत नसेल, धन वैभव सुख सुविधा मान प्रतिष्ठा इत्यादी मिळत नसतील आणि त्याचे पालन करताना जीवनभर कष्ट सहन करावे लागले तरीसुद्धा त्याच धर्माचे निष्काम भवाने पालन करणे परिणामी कल्याणकारक आहे म्हणून मनुष्याने कोणत्याही स्थितीत आपल्या धर्माचा त्याग करू नये तर निष्काम निर्मम आणि अनासक्त होऊन स्वधरमाचे पालन करावे. 🙏🙏

Ans 2. राजश्री कोंडावर ताई लिहितात. .....

प्रश्न आमचा उत्तर तुमचे यातील १ ल्या प्रश्नाचे उत्तर. निष्क्रियता म्हणजे कर्म न करणे. पण देह जगविण्यासाठी कर्म करावीच लागतात. जसे श्वास घेणे, भोजन करणे व शयन करणे. म्हणजेच माणूस निष्क्रिय राहू शकत नाही.परंतु जीवनावश्यक कर्माबरोबर उचित , नियत कर्म करायला हवीत. शिवाय स्वधर्म पण पाळायाला हवा. हाच निष्क्रियता व कर्माला फरक आहे.

 प्रश्न क्र. २ चे उत्तर. यासाठी - तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर कारण कर्म न करण्याच्या अपेक्षेने कर्म करणे श्रेष्ठ आहे तसेच कर्म न केल्यास तुझा शरीर निर्वाह सुद्धा सिद्ध होणार नाही. यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्मांन र्व्यतिरिक्त दुसऱ्या कर्मांमध्दे (गुंतलेला) हा मनुष्यांचा समुदाय कर्मानी बांधला जातो (म्हणून) हे अर्जुना (तू) आस्कति - रहित होऊन त्या यज्ञासाठी कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे कर. कल्पाच्या पूर्वी यज्ञाच्या बरोबर प्रजा निर्माण करून प्रजापती ब्रह्मदेव (त्यांना) म्हणाला तुम्ही लोक या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष प्राप्त करून घ्या ( आणि) हा यज्ञ तुम्हा लोकांना इष्ट भोग देणारा होवो. आणि - या यज्ञाचे द्वारा देवतांना तुम्ही उन्नत करा (आणि) त्या देवता तुम्हां लोकांना उन्नत कारोत आश्याप्रकरे (नि:स्वार्थ भावनेने) एकमेकांना उन्नत करीत परम कल्याण तुम्ही प्राप्त करून घ्याल. तसेच - यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हा लोकांना (न मागता) इष्ट भोग निश्चितपणे देत राहतील (अष्याप्रकरे) त्या देवतांनी दिलेले भोग जो पुरुष त्यांना न देता (स्वता:च) भोगतो तो चोरच आहे. 

 प्रश्न क्र. ३ चे उत्तर. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या गुणरहित स्वता: चा धर्म अति उत्तम आहे आपल्या धर्मात मरणे हे सुध्दा कल्याणकारक आहे (आणि) दुसऱ्याचा धर्म भय निर्माण करणारा आहे.

Ans 3. मेधा पोफळी ताई लिहितात .....

प्रश्नोत्तरे क्रमांक  5 
प्रश्न  1 अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला?  निष्क्रियता आणी कर्म या मधे काय फरक आहे?  
उत्तर अर्जुन युद्धास तयार व्हावा म्हणून भगवंतानी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन कर्मयोग समजावून सांगीतला अर्जुन सवजनांचया होणाऱ्या मृत्यू मुळे विचलीत झाला होता.  पापचरणाची त्याला भीती वाटत होती. तेव्हा भागवतांनी अर्जुनाला अभूतपूर्व असे ज्ञान दिले. आणी आत्म्याचे स्वरुप समजावून सांगितले. आत्मा अविनाशी आहे, अविकारी आहे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात येत नाही. आत्मा हा नित्य सनातन प्राचीन आहे. आत्मा हा चैतन्य आहे तो मारला जात नाही. आत्मयाविषयी भागवतांनी अर्जुनाला जे ज्ञान दिले आणि ज्ञानाची महती सांगीतली ती ऐकून अर्जुन गोंधळून गेला. ज्ञान जर श्रेष्ठ आहे तर मग मला युद्धासारखे घोर कर्म मला काकरायला सांगत आहे असे अर्जुनालावाटते. अर्जुन म्हणतो भगवंत मला योग्य असा निर्णय सांगा. मोहापासून मलामुक्त व्हायचे आहे .भगवंत ही तुमची काय योजना आहे असे अर्जुनालावाटते परंतु या योजनेवरअर्जुनाचा विश्वास ही आहे की भगवंत मला जे काय सांगतील ते योग्य च सांगतील. नंतर मग अर्जुन भगवंताला शरण आलेला आहे. भगवंत अर्जुनाला समजावतात की, ज्ञानयोगी हे विचारप्रधान व चिंतनशील असतात. त्याची निष्ठा  ज्ञानामधे अधिक असते. तर कर्मयोगी नेहमी काहीना काही कर्म करत असतात. त्याची निष्ठा कर्मामधे अधिक असते. अशा प्रकारे कर्मयोग भगवंताने अर्जुनाला समजावला. 
2 उत्तर निष्क्रियता म्हणजे काम न करणे. आणि कर्म म्हणजे कृती करणे अमलात आणलेले कृत्य पुर्ण करणे जसे की भगवंत अर्जुनाला म्हणतात की तु कर्म न करणे योग्य नाही कर्म केल्याशिवाय शरीराचा उदर निर्वाह होऊ शकत नाही. शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्य कर्म तु कर सुषटी चक्राच्या रक्षणाकरीता सवकर्तवयाचे पालन करणे मानवा करीता फार जरुरीचे आहे. तु जर कर्तव्याचे पालन केले नाही तर तु निष्क्रिय ठरशील. आणि इंद्रियवाटे विषय भोगणारा आणि पापमय आयुष्य घालवणारा मनुष्य ठरशील तेव्हा तु या सुषटीचक्राचया सुरक्षेकरीता सवकर्तवयाचे पालन कर. 

प्रश्न  2. निष्काम कर्म म्हणजे काय? क़र्मबंधनातुन मुक्ती अशी मिळते? 
उत्तर निरपेक्ष पणे कर्म करणे म्हणजे निष्काम कर्म होय. आणी हे माववाचे कर्तव्य आहे. आपल्या कर्माचे फळ तर आपलयाला मिळेलच कर्मफल सिध्दांत हा भारतीय वैदिक तत्व ज्ञानाचा आधार आहे. अशा प्रकारे निसर्वाथ ,निःस्पृह, निष्काम व अनासक्त भावनेने पवित्रशुधद आणि सत्याधारीत कर्मशिलता अंगीकारलयास मानव सर्व प्रकारच्या दुःख बंधनातून मुक्त होऊन धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थचे उच्च ध्येय गाठु शकतो. 

प्रश्न  3 रा स्वधर्म पाळण्याचे महत्त्व काय? परधर्म का टाकून  टाळावा? 
उत्तर स्वधर्म पाळलयाने आपण कर्म बंधनातुन मुक्त होतो लक्ष केंद्रीत होते आणि आपण जिवनाचा पुर्ण अनुभव घेऊ शकतो.  त्यामुळे आपले कल्याणचहोईल स्वधर्म पाळल्यास शारीरिक, भावनिक, मानसिक आणि अध्यात्मिक असा सर्वांगीण विकास होतो. स्वधर्ममामुळे वातावरणात सुसंवाद प्रस्थापित होण्यास मदत होते. स्वधर्म वयकतीला तयाचया जिवनातील उद्देशाकडे मार्गदर्शनकरतो.  स्वधर्म पाळल्याने मन शांत राहते आणी बुध्दी सतर्क राहते. 
परधर्म पाळल्याने आपले नुकसान होते. परधर्माचा एक अर्थ असा ही होतो की दुसऱ्याचे अनुकरण करणे. परधर्म पाळल्याने आपल्यामधे अस्थिरता आणी भीती निर्माण होते. आणी आपण आपल्या धर्मा पासुन वंचित राहतो आणि आपण आपल्या कर्तव्या पासुन दुर जातो. परधर्माचे आचरण करणे हे भयावह असते. म्हणुन परधर्म टाळावा आपला धर्म पाळत असतांना मरण जरी आले तरी ते सुखप्रदच असते.

Ans 4. कल्पना बागडे ताई लिहितात.....

प्रश्न आमचा उत्तर तुमचे प्रश्न मालिका क्रमांक 5               अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला ? निष्क्रियता आणि कर्म  यामध्ये काय फरक आहे ?        उत्तर ः- गीते मधील अध्याय क्रमांक 3  मध्ये ज्ञानयोग  व निष्काम कर्मयोग  आसक्ती न बाळगता नेमलेले कर्म  करण्या चे श्रेष्ठत्व सांगत आहेत . अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की ,भगवंत आपण मला सांगितले की  कर्मयोगा पेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे तर या युद्ध करण्यास का सांगत आहात की त्यामुळे मला सर्वत्र विनाषच दिसत आहे माझे आप्त स्वकीय ,श्रेष्ठ वंदनीय गुरुजन मित्र इ० सर्वांना मारुन  मला जरी विजय प्राप्त झाला तरी या सर्वांशिवाय मीआनंद कसा उपभोगु शकतो  ? भगवंतांना असे वाटत होतं की आपला प्रिय मित्र  भौतिक दुःखाच्या महासागरात बुडाला आहे त्याला या अवस्थेतून बाहेर काढुन अर्जुनाला स्वधर्माची  , निष्कामकर्माची  आठवण करुन देतात  सांगतात की,  भौतिक जीवनात शरीर ,मन ,बुद्धी च्या सहाय्याने तुझे तु कर्म तुझा क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी केलेच पाहिजे  ते सर्व कर्म तु मला  अर्पण कर आणि अहंभावाचा  त्याग करुन फळाची  अपेक्षा करु नकोस त्याच्या परिणामांचाही विचार करु नकोस       निष्क्रियता आणि कर्म म्हणजेः- अकर्म आणि कर्म : चालणे बोलणे खाणे पिणे उठणे बसणे इ० क्रीया करणे कर्म आहे आणि अकर्मः- तो स्वतः काही कर्म करीत नाही ; पण त्याच्या केवळ अस्तित्वाने साऱ्या जगतालाकर्म साठी प्रेरित  करतो जसे की, सुर्यात अपार  प्रेरक शक्तीआहे त्याच्या उदयाबरोबर जो तो आपापली कर्मे सुरु करतो निष्क्रियतेत अनंत कार्यांना लागणारी आवश्यक शक्ती भरलेली असते आपल्या अंतरंगात जो साक्षी रुपाने बसला आहे तो द्रुश्य रुपात उभा राहीला तर त्याचे सर्वशक्तीशाली परमात्म्याशी तादात्म्य होते आणि त्याने काहीही न करता तो सर्व करतो  तो हवेला खेळवित असतो , झाडांची वाढ करतो फुलांनाही तोच फुलवित असतो झाडाखाली शांत बसला असला तरीही चंद्रसुर्याला चलायमान करीत असतो  , कर्म म्हणजे ः स्विभाविकरित्या स्वधर्म समजून केलेले नियम आणि शास्त्रविहीत कर्म जे शुद्ध बुध्दीने व्यवसायात्मिक बुद्धी च्या स्फुरणाने प्रेरीत असते ते कर्म    

 प्रश्न 2 रा ः-निष्काम कर्म म्हणजे काय ? कर्मबंधनातुन मुक्ती कशी मिळते ?                         उत्तर ः-जे कर्म शास्त्रविहित आहे धर्माच्या मर्यादेत राहुन प्रिती,व्देष रहीत भावनेने केले आहे ज्यात कर्तेपणाचा लेशमात्रही अभिमान नसतो व जे समष्टीच्या  ,जगाच्या कल्याणासाठी केलेले असते त्यात करणाऱ्या चा लेशमात्र छुपा स्वार्थ नसतो  श्लोक क्रमांक 2/47  फळ मिळणार असेल तरच कर्म करीन अशी भावना माणसाने ठेऊ नये परंतु कर्तव्य बुद्धी ने आपल्या अंतरात्म्याच्या समाधानासाठी भगवत् प्रित्यर्थ कर्म केले जाते ते निष्काम कर्म  समजतात  . उदाः-सुर्यनारायण एक महान निष्काम कर्म योगी आहे  आकाशात सुर्य उगवला की संपूर्ण अंध;काराचा नाश होतो ही गोष्ट आपण त्याला सांगायला गेलो की तुझ्या उगवण्याने अंध;काराचा नाश होतो व आम्ही आमची सर्व दैनंदिन कर्मे सुरु करतो तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत तेव्हा सुर्यनारायण म्हणेल कि मी काही अंध:काराचा नाश करण्यासाठी उगवत नाही अंध:कार मला माहित नाही केवळ माझ्या अस्तित्वाने अंध:कार नाहीसा झाला असेल. कर्म बंधनातून मुक्ती कशी मिळते ः-   
 श्लोक क्रमांक 3 /31     ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवा:श्रद्धावन्तो~न सुयन्तो मुच्यते ते~पि कर्मभि:       अर्थ ~जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि आदेशांचे व्देशरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकामकर्माच्या बंधनातून मुक्त होतात भगवंत अर्जुनास(मानवास)उपदेश करतात की माझ्या आदेशावर जो श्रद्धा ठेवून(जरी तो आदेशपालन करण्यास असमर्थ असला) तरी तो कर्मबंधनातुन पुर्णपणे मुक्त होऊ शकतो पराभव निराशा  या बाबत चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो तोच स्वतः ला कर्म बंधनातुन मुक्त करून घेऊ शकतो           
              
  प्रश्न क्रमांक 3 स्वधर्म पालनाचे महत्त्व काय ? परधर्म का टाळावा ?          उत्तर ः- भगवंतांनी अर्जुनाला समजून सांगितले आहे श्लोक क्रमांक 1/36 हे अर्जुना भिक्षेवर उदरनिर्वाह करणे हा भिक्षूकाचा स्वधर्म आहे आणि तो तुझ्या साठी परधर्म आहे तु एक गृहस्थी, क्षत्रिय आहेस धर्मयुद्ध न केल्याने तु तुझा स्वधर्माला आणि कीर्ती ला गमावून पापाला प्राप्त होशील नंतर 2/33 मध्ये भगवंत सांगतात कीजय पराजय लाभहानी सुख दु:ख यांना समान समजून युद्ध केल्याने रागव्देष रहित होऊन तुझ्या कर्तव्याचे(धर्माचे) पालन  केल्याने तुला पाप लागणार नाही म्हणजेच भगवंत अर्जुनाला युद्ध रुपी स्वधर्माचे केले पाहिजे भगवंतांच्या अथवा शास्त्राच्या आज्ञेनुसार निष्काम भावनेने केले पाहिजे ते करताना त्यापासून त्रास झाला तर ते एक प्रकारचे तप घडते  या कामी आपला देह जरी ठेवला तर त्याला धर्मात्मा पुरुष म्हणून ओळखले जातात आणि त्यांची प्रशंसा  करतात त्याचा महिमा सदैव वर्णीला जातो                        परधर्म का टाळावा ?      परधर्म दुसऱ्यांसाठी कर्तव्य बुद्धीने केल्या गेलेल्या कर्माला परधर्म संबोधले जाते  परधर्म हा प्राप्त झालेल्या शरीर इंद्रिये मन बुद्धी  देश काल वस्तु व्यक्ती इ०आवश्यकता आहे या सर्वांचे परतंत्र आहे शरीरादीच्या सहाय्यते वाचुन परधर्माचे पालन होऊ शकत नाही  स्व हा परमात्म्याचा अंश आहे  तर शरीर संसाराचा अंश आहे जेव्हा मनुष्य परमात्म्याला आपले समजतो  तेव्हा त्याच्या साठी स्वधर्म होतो आणि जेव्हा शरीर संसाराशी आपला संबंध समजतो तेव्हा त्याच्यासाठी परधर्म होतो       परधर्मातसर्व प्रकारची दुःख शोक चिंता इ०उपलब्ध होतात परधर्माच्या संबंधामुळे  कितीही सुख सुविधा मिळाल्या  तरी  तो भयावह आहे कारण त्यामध्ये आपण जन्ममुत्यु च्या चक्रात अडकतो    उदा:०सत्व गुणात असणारा ब्राह्मण अहिंसक असतो तर क्षत्रिय राजसिक गुणांचा असल्याने तो हिंसक असला तरी  चालतो ब्राह्मणाला क्षत्रिय व क्षत्रियाला ब्राह्मण होऊन चालणार नाही ते त्यांच्या साठी परधर्म आहेत  म्हणून स्वधर्मात मरण आले तरी ते श्रेयस्कर आहे परधर्म भयावह आहे

Ans 5.अरुषा एरंडे ताई लिहितात.....

प्रश्न 1: अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला? निष्क्रियता आणि कर्म यामध्ये काय फरक आहे?
भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात (कर्मयोग) श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग शिकवला कारण अर्जुन युद्धाच्या प्रसंगी मोह आणि संकोचाने ग्रस्त झाला होता. अर्जुनाला वाटत होते की आपल्या बंधूंशी आणि गुरुजनांशी युद्ध करणे अयोग्य आहे आणि त्याने निष्क्रियता स्वीकारावी. अशा परिस्थितीत अर्जुनाने निष्क्रियतेचा विचार केला, पण श्रीकृष्णाने त्याला कर्मयोगाचा मार्ग दाखवला.
अर्जुनाला कर्मयोग शिकवण्याची अनेक कारणे आहेत जसे की कर्तव्याची त्यास जाणीव व्हावयास हवी. अर्जुन क्षत्रिय होता आणि त्याचे कर्तव्य (स्वधर्म) युद्ध करणे होते. कर्मयोगानुसार, आपल्या कर्तव्याचे पालन करणे हेच श्रेष्ठ आहे.
अर्जुनाने निष्क्रियतेचा दोष ओळखणे गरजेचे आहे जसे निष्क्रियता किंवा कर्मत्याग हा कर्तव्य टाळण्याचा मार्ग आहे, जो आत्मिक उन्नतीसाठी अयोग्य आहे. निष्क्रियतेमुळे अज्ञान वाढते आणि जीवनाचा उद्देश पूर्ण होत नाही.
अर्जुनाने फलाश्रयाचा त्याग करून युद्ध करणे गरजेचे आहे. कर्मयोगात कर्म करायचे असते, पण त्याच्या फळावर आसक्ती ठेवायची नसते. हा दृष्टिकोन अर्जुनाच्या आत्मिक समृद्धीसाठी आवश्यक आहे.
युद्धास सज्ज होऊन अर्जुनाने समाजकल्याण साधावे असे श्रीकृष्णाला वाटते.   मनुष्याने आपले कर्तव्य करत राहणे समाजहितासाठी आवश्यक आहे. निष्क्रियतेमुळे समाजात अव्यवस्था आणि अधर्म वाढतो.
निष्क्रियता आणि कर्म यामधील फरक खालीलप्रमाणे आहे:
निष्क्रियता म्हणजे कोणतेही कर्म न करणे. कर्म म्हणजे कर्तव्यभावनेने आणि फलाश्रयाचा त्याग करून कृती करणे.
निष्क्रियता आत्मविकासासाठी हानिकारक असते. कर्म हे आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक असते.
निष्क्रियता आळस, भीती किंवा कर्तव्य टाळण्याचे लक्षण आहे. कर्मयोग हे कर्तव्यपूर्तीचे साधन आहे.
निष्क्रियता समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण करते. कर्म समाजहित आणि धर्मपालनासाठी आवश्यक आहे.
निष्क्रिय व्यक्ति मध्ये ज्ञान आणि अनुभव यांचा अभाव असतो. कर्मयोगी व्यक्तीच्या ज्ञानाची वृद्धी होते आणि आत्मबळ वाढते.
श्रीकृष्णाने अर्जुनाला हे पटवून दिले की, निष्क्रियतेच्या मार्गाने जाण्याऐवजी त्याने कर्मयोग स्वीकारून युद्ध करावे. कर्तव्य बजावणे हेच त्याचे धर्मपालन होईल.
अर्जुन युद्धभूमीवर मोहग्रस्त झाला होता आणि त्याला कर्तव्य आणि पाप यामधील गोंधळ वाटत होता. अशा वेळी श्रीकृष्णाने त्याला निष्काम कर्मयोगाची शिकवण दिली, म्हणजेच फलाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करणे.
विनोबा भावे आणि लोकमान्य टिळक यांनी कर्मयोगावर महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. 
विनोबा भावे यांनी गीता प्रवचने ग्रंथात कर्मयोगाची व्याख्या सुस्पष्ट केली आहे. विनोबाजी सांगतात की व्यक्तीने कर्तव्यकर्माचा स्वीकार करावा. ते म्हणतात की कर्मयोग म्हणजे कर्तव्यभावनेने कर्म करणे. त्याग आणि सेवा याला ते कर्मयोगाचा गाभा मानतात. त्यांचे मत होते की मनुष्याने कर्म करताना त्यामध्ये अहंकार ठेवू नये. विनोबाजी सांगतात की गुरूला जी गुरुदक्षिणा द्यायची ती श्रद्धेने द्यावी. शिष्याच्या मनात देताना गुरूच्याप्रती भक्तीभाव असणे आवश्यक आहे कारण मनात अहंकार असेल तर शिष्याची चित्तशुद्धी होत नाही.  
व्यक्तीने निष्क्रियतेचा त्याग करावा असे विनोबाजी सांगतात. निष्क्रियता म्हणजे कोणतेही कर्म न करणे हे चुकीचे आहे. विनोबा भावे यांच्यानुसार निष्क्रियता ही आत्मविकासासाठी अडथळा ठरते. समाजाची उन्नती आणि स्वतःचा विकास यासाठी कर्म करणे आवश्यक आहे.व्यक्ति जेव्हा सूर्यनमस्कार घालतो तेव्हा त्याने नमस्कार उपासना म्हणून घालावेत म्हणजे त्यास आरोग्य प्राप्त होते आणि त्याच्या बुद्धीच्या कक्षा रुंदावतात व तो स्वतःचा विकास त्यायोगे साधू शकतो. कर्मयोगी शेतकरी समाज अन्नधान्याने समृद्ध करण्यासाठी व त्याच्या कल्याणासाठी कर्म करतो. त्याच्या निष्काम कर्मयोगाने तो समाजाची उन्नती साधू शकतो.    
कर्मात भक्तिभाव असणे आवश्यक आहे असे विनोबाजी सांगतात. ते कर्मयोगाला भक्तियोगाशी जोडतात. जेव्हा मनुष्य फलाश्रयाचा त्याग करून कर्तव्य करतो, तेव्हा तेच ईश्वरप्रेमाचे सर्वोच्च रूप ठरते. विनोबाजी कर्मामध्ये भक्तीभावाचे महत्व सांगण्यासाठी गोष्ट सांगतात, जसे सुदामदेव श्रीकृष्णाकडे मूठभर पोहे घेऊन गेले.त्या पोह्याची किंमत कमी असली तरी ते अमोल होते कारण त्यामध्ये सुदामदेवांचा भक्तीभाव ओतप्रोत भरला होता. कर्मयोगी, देवाची पूजा झाल्यावर अनन्य भक्तिभावाने परमेश्वर दर्शनाचे फळ मागतो. त्याला कोणत्याही सांसारिक अथवा भौतिक गोष्टींची लालसा नसल्याने तो त्याबद्दल देवाजवळ काहीही मागत नाही. 

लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य या ग्रंथात कर्मयोगावर सखोल विचार मांडले आहेत. टिळक यांचे मत होते की कर्मयोग म्हणजे समाजसेवा म्हणजेच समाजासाठी नि:स्वार्थीपणे कार्य करणे. त्यांच्या मते भगवद्गीता केवळ आत्मज्ञानासाठी नसून तो  कर्मप्रधान ग्रंथ आहे.
टिळक यांनी निष्क्रियतेचा विरोध केला आहे व निष्क्रियतेला पळवाट मानले आहे. त्यांचे म्हणणे होते की, कोणत्याही परिस्थितीत निष्क्रिय राहणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि त्या टाळण्याचा प्रयत्न हा पापासारखा आहे.
टिळकांनी स्वराज्य आणि कर्मयोग ह्यांची योग्य सांगड घातली. टिळक यांनी गीतेच्या कर्मयोग तत्वाचा उपयोग स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणा म्हणून केला. त्यांना वाटत होते की निष्काम कर्मानेच समाजात परिवर्तन घडवता येते.

निष्क्रियता आणि कर्म यामधील फरक समजण्यासाठी  विनोबा भावे आणि टिळक यांचे दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे. 
विनोबा भावे म्हणतात की निष्क्रियता म्हणजे आळस आणि कर्तव्य टाळणे. टिळक म्हणतात की निष्क्रियता म्हणजे कर्तव्यापासून पळ काढणे.
विनोबाजी म्हणतात की कर्मयोग म्हणजे निःस्वार्थीपणे कर्तव्य करणे. टिळक म्हणतात की कर्मयोग म्हणजे समाजहितासाठी कार्य करणे.
विनोबाजी सांगतात की प्रत्येक कर्म ईश्वरप्रेमाने करावे. टिळक सांगतात की कर्म हे समाजाची सेवा म्हणून करावे.
व्यक्तीच्या आत्मोन्नतीसाठी कर्मयोग उपयुक्त आहे असे विनोबा भावे यांचे मत आहे. टिळकांच्या दृष्टीने देशसेवा आणि स्वातंत्र्यसंग्रामासाठी कर्मयोग प्रेरणादायी आहे.
विनोबाजी म्हणतात की निष्क्रियता ही आत्मविकासाला अडथळा ठरते तर टिळक सांगतात की निष्क्रियतेमुळे समाजाचे नुकसान होते.
अशा तऱ्हेने विनोबा भावे आणि लोकमान्य टिळक यांचे विचार कर्मयोगाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात. विनोबा भावे आत्मोन्नतीसाठी कर्मयोगाचा पुरस्कार करतात, तर लोकमान्य टिळक कर्मयोगाला राष्ट्रसेवेचे साधन मानतात. अर्जुनाला निष्क्रियतेच्या मोहातून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने कर्मयोग शिकवला आणि त्याला कर्तव्यप्रधान जीवनाचा मार्ग दाखवला, जो काळानुसार विनोबाजी आणि टिळक ह्यांच्या शिकवणीतून अजूनही जनमानसात प्रेरणेचे स्त्रोत म्हणून प्रख्यात आहे.

प्रश्न 2: निष्काम कर्म म्हणजे काय? कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते? निष्काम कर्म म्हणजे काय?
भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात निष्काम कर्म ही संकल्पना केंद्रस्थानी आहे.निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून कर्म करणे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्या कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही.
केवळ कर्म करावे व कर्माचे फळ ईश्वरावर सोपवावे. कोणतेही कर्म निःस्वार्थी भावनेने, कर्तव्य म्हणून करावे आणि त्याच्या यश आणि अपयशाची चिंता करू नये.
व्यक्तीने कर्म करताना आसक्तीचा त्याग करावा. निष्काम कर्म करणारा मनुष्य कर्म करत असला तरी त्याला त्यामध्ये आसक्ती नसते. निष्काम कर्मयोग हे उदाहरण वाचून आपण समजू शकतो जसे ,एखादा शेतकरी मेहनत करून पीक घेतो, पण पावसावर आणि हवामानावर त्याचा काहीही ताबा नसतो. तरीही तो आपले कर्तव्य म्हणून शेती करतो. हा निष्काम कर्माचा आदर्श आहे.
भगवद्गीतेनुसार, कर्मबंधन म्हणजे कर्माच्या फळाच्या अपेक्षेमुळे होणारे बंधन. जर एखादा मनुष्य कर्माच्या फळावर आसक्त असेल, तर त्याला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतात.
कर्मबंधनातून मुक्ती मिळवण्याचे मार्ग आहेत जसे व्यक्तीने निष्काम भावाने कर्म करणे जरूरी आहे. जेव्हा मनुष्य फलाची इच्छा न ठेवता फक्त कर्तव्य म्हणून कर्म करतो, तेव्हा तो कर्मबंधनातून मुक्त होतो.
कर्म करताना त्याच्याशी मनाने जोडले जाणे म्हणजे आसक्ती होय.व्यक्तीने आसक्तीचा त्याग करावा जसे, ही आसक्ती सोडली तर मनुष्य मोकळा होतो.
सुख-दुःख, यश-अपयश यांना समान मानणे म्हणजे समत्वबुद्धी. व्यक्तीने अशी वृत्ती ठेवली की कर्मबंधन निर्माण होत नाही.
व्यक्तीने ईश्वरार्पण बुद्धी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या सर्व कर्मांचे समर्पण ईश्वराला करणे ही गीतेत सांगितलेली श्रेष्ठ भावना आहे. असे कर्म करताना अहंकार निर्माण होत नाही.
ज्ञानयोग आणि भक्तियोगाचा स्वीकार व्यक्तीने करावा. कर्म करताना आत्मज्ञान आणि भक्ती यांचा आधार घेतला, तर मनुष्य कर्मफळांच्या बंधनातून मुक्त होतो.
शिक्षकाचे उदाहरण आपण घेऊ शकतो जसे की शिक्षक ज्ञानदान करतो, परंतु विद्यार्थ्यांच्या यश-अपयशाची त्याला आसक्ती नसते. त्याचे उद्दीष्ट फक्त शिकवणे असते. त्यामुळे तो कर्मयोगी होतो.
हयातून हे स्पष्ट आहे की निष्काम कर्म म्हणजे अपेक्षारहित कर्तव्यपालन. कर्मबंधनातून मुक्ती म्हणजे कर्म करत असतानाही त्याच्या फळाशी न जोडले जाणे. हे तत्व स्वीकारल्यास मनःशांती, आत्मसंतोष आणि मुक्ती प्राप्त होते.
श्रीकृष्ण अर्जुनाला याच मार्गाने जाण्याचा उपदेश देतात, ज्यामुळे तो आपल्या कर्तव्याचे पालन करून मोहमुक्त होऊ शकतो.

विनोबा भावे यांनी ‘गीता प्रवचने’ या ग्रंथात निष्काम कर्मयोगावर सखोल विवेचन केले आहे. त्यांनी कर्माचा आध्यात्मिक दृष्टिकोन मांडला आहे. त्यांचे म्हणणे होते की कर्म योग साधनेसारखे आहे. फळाच्या अपेक्षेशिवाय केलेले कर्म हे आत्मशुद्धीचे साधन ठरते.
त्यांच्या दृष्टीने कर्म करताना सेवा आणि त्याग हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यांनी निष्काम कर्माचा अर्थ सेवाभावाने कर्तव्य करणे असा सांगितला आहे. व्यक्ती जेव्हा समाजसेवा किंवा परमार्थासाठी कार्य करते, तेव्हा ती कर्मबंधनातून मुक्त होते.
विनोबाजी म्हणतात की कर्म करताना स्वावलंबन आणि समर्पण हे महत्वाचे घटक आहेत. निष्काम कर्म करताना मनुष्याने स्वावलंबी असावे आणि ईश्वरार्पणाची वृत्ती बाळगावी. ह्याचे उदाहरण म्हणजे स्वतः विनोबा भावे यांनी सर्वोदय चळवळीत निष्काम कर्मयोगाचा अंगीकार करून ग्रामस्वराज्याचे कार्य केले.

लोकमान्य टिळक यांनी ‘गीता रहस्य’ या ग्रंथात निष्काम कर्मयोगावर त्यांची स्पष्ट मते मांडली आहेत. टिळकांच्या मते कर्मयोग म्हणजे राष्ट्रसेवा आहे. निष्काम कर्म म्हणजे केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नव्हे, तर समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आहे.
टिळक ह्यांनी कर्म आणि स्वातंत्र्यलढा ह्यांची योग्य सांगड घातली आहे. त्यांनी निष्काम कर्मयोगाचा उपयोग स्वराज्यलढ्यात प्रेरणा म्हणून केला. त्यांच्या मते निष्काम कर्म म्हणजे कर्तव्यपूर्ती असून त्यातूनच समाजसुधारणा शक्य आहे.
टिळकांनी गीतेच्या आधारे निष्क्रियतेला विरोध केला. कर्म न करणारे आणि परिस्थितीला दोष देणारे लोक कधीच मुक्त होऊ शकत नाहीत.

व्यक्तीच्या ठायी कर्तव्यनिष्ठा आणि त्याग असणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की निष्काम कर्मयोगी व्यक्ती कोणत्याही अपेक्षेशिवाय कर्तव्य बजावते आणि त्यागभावनेने कार्य करते.
टिळकांचेच ज्वलंत उदाहरण निष्काम कर्मयोग विषद करते जसे त्यांनी निष्काम कर्मयोगाच्या प्रेरणेने ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही घोषणा दिली आणि समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले.
अशा तऱ्हेने विनोबा भावे यांनी निष्काम कर्मयोगाला आध्यात्मिक शुद्धी आणि समाजसेवेचे माध्यम मानले. लोकमान्य टिळक यांनी निष्काम कर्मयोगाचा उपयोग स्वातंत्र्य चळवळीत केला आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श दिला. दोघांच्याही मते, कर्मबंधनातून मुक्ती ही निष्काम कर्माच्या माध्यमातूनच साधता येते. फलाश्रयाचा त्याग, समत्वबुद्धी, आणि कर्म ईश्वरार्पण करणे हाच मुक्तीचा मार्ग आहे.

प्रश्न 3: स्वधर्म पाळण्याचे महत्त्व काय? परधर्म का टाळावा?
स्वधर्म पाळण्याचे महत्त्व आणि परधर्म टाळण्याचे कारण हे भगवद्गीता अध्याय ३ मध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे. भगवद्गीतेतील स्वधर्म म्हणजे आपल्या स्वभावानुसार, गुणधर्मानुसार आणि स्थितीनुसार ठरलेले कर्तव्य. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, क्षमता आणि सामाजिक जबाबदारी वेगवेगळी असते. श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की स्वधर्माचरण म्हणजेच आपले कर्तव्य निभावणे हेच खरे धर्माचरण आहे. श्रीकृष्ण म्हणतात की स्वधर्म वाईट रीतीने आचरला गेला तरी परधर्माच्या उत्तम पालनापेक्षा श्रेष्ठ आहे.
श्रीकृष्णाने स्वधर्म पाळण्याचे महत्त्व स्पष्ट सांगितले आहे जसे  कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यपूर्ती म्हणजे आपले कर्तव्य पार पाडणे हाच सर्वोच्च धर्म आहे.
स्वधर्म पालन करण्याने आत्मोन्नती होते जसे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होतो आणि त्याची आत्मशुद्धी होते.
स्वधर्माचे पालन केल्याने मानसिक समाधान व मनःशांती मिळते आणि कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग सुलभ होतो.
जेव्हा प्रत्येकजण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करतो, तेव्हा समाजहित साधता येते व  समाजाची प्रगती होते.

श्रीकृष्ण अर्जुनाला परधर्माचा अर्थ आणि परधर्म का टाळावा हयाबद्दल सांगतात जसे परधर्म म्हणजे दुसऱ्याचे कर्तव्य किंवा भूमिका स्वीकारणे, जे आपल्या स्वभावाला अनुरूप नाही. परधर्माचे अनुकरण केल्याने व्यक्ती स्वतःचा नैसर्गिक विकास थांबवते. परधर्म पाळताना भीती, असंतोष आणि अपयश याचा सामना करावा लागू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, स्वधर्माचे पालन करताना मृत्यू आला तरी ते उत्तम आहे; परधर्माचे आचरण भयंकर आहे.

विनोबा भावे यांनी ‘गीता प्रवचने’ मध्ये स्वधर्म आणि परधर्माविषयी सखोल विचार मांडले आहेत-
विनोबाजी सांगतात की स्वधर्म म्हणजे आत्मोन्नतीचा मार्ग. स्वधर्माचे पालन केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती साधता येते.
व्यक्तीने स्वभावधर्माचे पालन करावे जसे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि अंतःप्रेरणा वेगळी असते. म्हणूनच स्वधर्म हे स्वतःच्या अंतरात्म्याचे ऐकणे आहे. जसे गृहस्थ व्यक्तीला संन्यास घेणे व संन्यसत जीवनातील नियमांचे पालन करणे अवघड वाटू शकते कारण येथे त्या व्यक्तीचा आसक्त स्वभाव त्यास संन्यासी होण्यास अडथळा आणू शकतो.   
विनोबा भावे म्हणतात की जेव्हा व्यक्ती स्वतःच्या स्वधर्मानुसार कार्य करते, तेव्हा तिला आत्मिक समाधान, मनःशांती आणि आत्मसंतोष प्राप्त होतो.
स्वधर्म हे स्वार्थत्याग, सेवा आणि परमार्थाचा मार्ग आहे. विनोबा भावे यांनी स्वधर्माला सेवा धर्माशी जोडले आहे. विनोबाजी उदाहरण देण्यासाठी काही गोष्टी सांगतात जसे एखाद्या व्यक्तीला सूर्याचा प्रकाश आवडतो म्हणून तो पृथ्वी सोडून सूर्यावर राहू शकणार नाही. त्याला पृथ्वीवरच राहून आत्मोन्नती साधता आली पाहिजे. शिक्षक मुलांना अवघड विषय समजावण्यासाठी फक्त सूचना देऊ शकतो. ज्याने त्याने स्वतः धडपड करणे अपेक्षित आहे. 

लोकमान्य टिळक यांनी ‘गीता रहस्य’ मध्ये स्वधर्म आणि परधर्मावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. टिळक यांचे मत होते की स्वधर्म म्हणजे कर्तव्य पालन व कर्तव्यभावनेने केलेले कर्म. व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या तर समाज आणि राष्ट्राची प्रगती होते.
लोकमान्य टिळकांनी स्वधर्म आणि राष्ट्रसेवा ह्यांची योग्य सांगड घातली आहे. टिळक यांनी गीतेच्या उपदेशाचा उपयोग स्वातंत्र्यलढ्यासाठी केला. त्यांच्या मते, स्वधर्म पाळणे म्हणजे स्वतंत्रतेसाठी संघर्ष करणे.
त्यांच्या दृष्टीने परधर्म म्हणजे पलायन करणे. परधर्माचे पालन म्हणजे कर्तव्य टाळण्याचा मार्ग. टिळक म्हणतात की दुसऱ्याच्या कर्तव्याचे अनुकरण केल्याने समाजावर परिणाम होतो.
त्यांचे म्हणणे आहे की स्वधर्मात स्थैर्य आहे. स्वधर्म पाळताना जरी संकटे आली तरी त्यांचा सामना केल्याने मनोबल वाढते आणि आत्मबळ निर्माण होते.

अशा तऱ्हेने विनोबा भावे यांचा दृष्टिकोन आत्मिक उन्नतीवर केंद्रित आहे. त्यांच्यानुसार स्वधर्माचे पालन म्हणजे आध्यात्मिक प्रगती आणि सेवाभाव आहे, तर लोकमान्य टिळक यांचा दृष्टिकोन समाजसेवा आणि राष्ट्रसेवेला प्रोत्साहन देणारा आहे. त्यांच्यासाठी स्वधर्म म्हणजे कर्तव्यभावनेने समाज आणि राष्ट्रासाठी काम करणे.
गीतेच्या शिकवणीनुसार, स्वधर्माचे पालन केल्याने व्यक्ती स्वतःची उन्नती साधते आणि कर्मबंधनातून मुक्ती मिळवते. परधर्माचे आचरण टाळले पाहिजे, कारण ते भीती आणि असंतोष निर्माण करते. अशा प्रकारे, स्वधर्म पाळणे हेच खरे धर्मपालन आहे आणि तेच आत्मोन्नतीसाठी आणि समाजहितासाठी आवश्यक आहे.

Ans. 6. माणिक थोरात ताई लिहितात......

 प्रश्न 1—अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला ?निष्र्कियता आणि कर्म यात काय फरक आहे ?
उत्तर—ऐन युद्धाचे वेळेस उभय पक्षात आपलेच आप्त स्वकिय पाहून अर्जुन मोहग्रस्त झाला युद्ध करावे की न करावे अशी द्विधा मनस्थिती अर्जुनाची झाली युद्ध करणे म्हणजे आपल्याच माणसांना मारणे होय तेव्हा यांना मारुन त्रैलोक्याचे राज्य जरी मिळाले तरी मी त्या राज्यभोगांनी सुखी होणार नाही या विचाराने अर्जुन युद्ध करण्यास जेव्हा नकार देतो तेव्हा अर्जुनासारख्या शूर यो द्ध्याचा स्वधर्म काय आहे युद्ध करणे हे अर्जुनाचे  कर्तव्य  आहे कोणत्याही फळाचीअपेक्षा न करता ते कर्म त्याने केलेच पाहीजे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला क्षात्रिय धर्माला अनुसरुन आपले कर्म करावे यासाठी कर्मयोग शिकवला 
      निष्क्रियता म्हणजे काहीही काम नकरणे अकर्म व कर्म म्हणजे आपल्या स्वधर्मानुसार  प्राप्त झालेले कर्म करणे अन् हेच कर्म फलाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे करुन इश्वराला अर्पण करणे मी काहीही केले नाही ही भावना ठेउन कर्म करणे हाच निष्कामकर्मयोग होय 
     माणूस निष्क्रिय राहूच शकत नाही कर्म केल्याशीवाय जीवनव्यवहार चालूच शकत नाही श्वास घेणे हे सूद्धा कर्म आहे विचार करणे हेही मानसिक कर्मच आहे 
  प्रश्न 2—निष्काम कर्म म्हणजे काय ?कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते ?
उत्तर—कोणत्याही फलाची अपेक्षा नकरता अहंकारविरहीत होउन कर्म करणे व ते इश्वराला अर्पण करणे म्हणजे निष्काम कर्मयोग होय जो मनूष्य फलाची अपेक्षा नकरता दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने आपल्या स्वधर्मानुसार प्राप्त झालेले नियत कर्म प्रामाणिकपणे   करतो नात्य नैमीत्तिक कर्म करताना त्यात लिप्तहोत नाही ईन्द्रिय आपल्या विषयांतर्गत कर्म करतात ती मी करत नाही आशा साक्षी भावाने जो कर्मे करतो व ती सर्व कर्मे मला अर्पण करुन कर्मयोगाच्या तत्वाचे पालन भक्तीभावाने व श्रद्धेने  करतो  ममत्व अहंकारविरहित होउन कर्मे करतो अशा कर्मयोग्याला कर्मबंधानातून मुक्ती मिळते
 प्रश्न 3—स्वधर्म पाळण्याचे महत्व काय? परधर्म का टाळावा ?
उत्तर—स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य विहीत कर्माचरण कर्तव्य कर्न होय भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरुन सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्मे  वअध्यात्मिक गुरुने आपल्या परम कल्याणासाठी सांगीतलेली कर्मे म्हणजे अध्यात्मिक कर्मे प्रत्येकाने आपल्या स्वधर्मानुसार प्राप्त विहित कर्माचेच आचरण करावे आपल्या पूर्वजांनी चार आश्रम व चार वर्णांची निर्मिती केली आहे वत्याप्रेत्येकाची कर्मे ठरउन दिलेली आहेत जसे ब्रह्मचर्य आश्रमात शिक्षण घेणे ,तर गृहस्थाश्रमात अर्थार्जन करणे कुटूंबाची काळजी घेणे  ,तर संन्यासाश्रमात संसारातून अलीप्त राहणे उदाः विद्यार्थ्याने जर आपल्या स्वधर्मानुसार जर ज्ञानार्जन केले नाही तर पुढे त्याला व परिणामी समाजाला ते घातक ठरेल तो पुढे ज्ञानाअभावी योग्य अर्थार्जन करु शकणार नाही समाजाप्रती वआपल्या कुटूंबाप्रती आपली जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडू शकणार नाही तसेच वर्णानुसार ब्राह्मण ज्ञानार्जन करणे समाजाला योग्य अध्यात्मिक मार्गदर्शन करणे क्षत्रीयाचे कर्तव्य समाजाचे नेतृत्व करणे  समाजाचे रक्षण करणे वैश्याचे कर्तव्य व्यापार वशेती व्यवसाय करुन समाजाचे पालन पोषण करणे तर शुद्राचे सेवा करणे हे वर्णाप्रमाणे त्यांचे स्वधर्म आहेत त्याचे योग्य पालन केले तरच हा समाजरुपी रथ व्यवस्थित चालणार आहे त्यातच स्वकल्याण कुटूंबकल्याण व परिणामी समाज कल्याण आहे एखाद्या क्षत्रीयाने जर व्यापार करायचा ठरवीला तर त्याला तो नीटसा जमणार नाही कारण त्यासाठी लागणारी चलाखी आपला माल विकण्यासाठी करावी लागणारी खोटी स्तूती त्याला जमणार नाही परिणामी व्यापारात तूट येण्याची शक्यता तेव्हा प्रत्येकाने आपला स्वधर्न पाळणेच श्रेयस्कर परकी स्त्री कीतीही चांगलीअसली तरी तीला आपले म्हणणे जसे अयोग्य आहे शूद्राघरचे अन्न कीतीही रुचकर असले तरी ते खाणे जसे आयोग्य (ज्ञानेश्वरी)तसे आपला स्वधर्म पाळणेश्रेयस्कर  आहे परधर्म पाळणे सर्वथा अयोग्य आहे

Ans 7. अजय कुमार महाजन दादा लिहितात.....


प्रश्न  1 अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला?  निष्क्रियता आणि कर्म या मध्ये काय फरक आहे?  
उत्तर :- युद्धासाठी अर्जुन टाळाटाळ करीत होते. त्यांना युद्धासाठी प्रवृत्त केले करण्यासाठी व भगवंतानी अनेक प्रकारची उदाहरणे दिली. व  त्यांना कर्मयोग  सांगीतला. प्रत्यक्षात अर्जुन स्व जनांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे विचलीत झाला होता.   त्याला पाप घडण्याची भीती वाटत होती. तेव्हा भागवतांनी अर्जुनाला  आत्म्याचे स्वरुप समजावून सांगितले. 
आत्मा अविनाशी आहे, अविकारी आहे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात येत नाही. आत्मा नित्य सनातन प्राचीन आहे. आत्मा  चैतन्य आहे तो कापता येत नाही.
आत्म्या विषयी भगवतांनी अर्जुनाला  ज्ञान दिले आणि ज्ञानाची महती देखिल सांगीतली.
 ती ऐकून अर्जुन गोंधळून गेला. ज्ञान जर श्रेष्ठ आहे तर  युद्धासारखे घोर कर्म  करायला का सांगतात? असे अर्जुनाला वाटते. अर्जुन म्हणतात भगवंत मला योग्य  निर्णय सांगा. मोहापासून मला मुक्त व्हायचे आहे .भगवंत तुमची काय योजना आहे असे अर्जुनाला वाटते परंतु या योजनेवरअर्जुनाचा विश्वास ही आहे की भगवंत मला जे काय सांगतील ते योग्यच सांगतील. नंतर अर्जुन भगवंताना शरण जातात. 
भगवंत अर्जुनाला प्रेमाने समजावतात की, ज्ञानयोगी हे विचार करणारे व चिंतन करणारे असतात. त्याची निष्ठा  ज्ञानामधे अधिक असते. 
तर कर्मयोगी नेहमी काहीना काही कर्म करतात . त्याची निष्ठा कर्मामधे अधिक असते. अशा प्रकारे  भगवंतानी अर्जुनाला कर्मयोग समजवून सांगितला.
तसेच 
 निष्क्रियता म्हणजे कोणतेही काम न करणे. आणि कर्म म्हणजे कृती करून कृत्य पुर्ण करणे जसे की भगवंत अर्जुनाला म्हणतात की तु कर्म न करणे योग्य नाही.
 कर्म केल्याशिवाय शरीराचा उदर निर्वाह होऊच शकत नाही. शास्त्रविधीच्या नियमा प्रमाणे नियत  कर्तव्य कर्म तु करच तसेच सृष्टी चक्राच्या रक्षणा साठी कर्तव्य देखिल करणे मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे. 
भगवंत अर्जुनाला सांगतात की,
तु जर कर्तव्याचे पालन केले नाही तर तु निष्क्रिय ठरशील. आणि इंद्रियांकडून  विषयांचा भोग भोगणारा आणि पापी आयुष्य घालवणारा मनुष्य ठरशील .
तेव्हा तु या सर्व सृष्टी करीत व तिच्या सुरक्षा करण्यासाठी कर्तव्याचे पालन नक्कीच कर. 

#प्रश्न क्रमांक २:-निष्काम कर्म म्हणजे काय? क़र्मबंधनातुन मुक्ती अशी मिळते? *
उत्तर:- फळाची अपेक्षा न करता कर्म करणे म्हणजे निष्काम कर्म होय.
 तसेच ते मानवाचे कर्तव्य आहे. आपल्या कर्माचे फळ तर आपलयाला मिळेलच. अशा प्रकारे स्वार्थ न ठेवता, निष्काम व अनासक्त भावनेने पवित्र आणि सत्यावर आधारित  कर्म केल्यानेच मानव सर्व प्रकारच्या दुःख बंधनातून मुक्त होऊन धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त करू शकतो 

*प्रश्न  ३ रा :-
स्वधर्म पाळण्याचे महत्त्व काय? परधर्म का   टाळावा? *
उत्तर:-
 स्वधर्म केल्याने ,
(१) आपण कर्मबंधनातुन मुक्त होतो व आपण जिवनाचा पुर्ण आनंद प्राप्त करू शकतो. 
 त्यामुळे आपले भले होईल.
 (२) स्वधर्म पाळल्याने आपले सर्वांगीण , (भावनिक, मानसिक,शारीरिक आणि अध्यात्मिक)  विकास होतो. 
(३) स्वधर्ममा मुळे वातावरणात सुसंवाद प्रस्थापित साधायला मदत होते.
(४)  स्वधर्म प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतः च्या जिवनातील उद्देशांचे मार्गदर्शन देखिल करतो. 
(५) स्वधर्म पाळल्याने मन शांत राहते तसेच आपली बुध्दी सतर्क राहते. 
परधर्म कधीच स्वीकारू नये.कारणं 
(१) त्यामुळे आपले नुकसान होते.
 (२)परधर्मा मुळे आपणं  दुसऱ्याचे अनुकरण केल्या सारखे आहे.
(३)  आपल्यामध्ये अस्थिरता व भीती निर्माण होते.
(४)  आपण आपल्या स्वधर्मा पासुन वंचित होतो.
(५) आपल्या कर्तव्या पासुन आपणच दुर जातो
(६) परधर्माचे आचरण करणे हे भयावह आहे.
म्हणुन परधर्म टाळावा.
 आपला धर्म पाळत असतांना मरण जरी आले तरी ते सुख देणारेच असते.
*जय श्रीकृष्ण*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Ans 8. Hemangini didi ....


प्रश्न 1: अर्जुन को कर्मयोग क्यों सिखाया गया? निष्क्रियता और कर्म में क्या अंतर है?
भागवत गीता में भगवान श्रीकृष्ण ने अर्जुन को कर्म योग के बारे में सिखाया क्योंकि:
अर्जुन युद्ध के मैदान में खड़ा था और उसके सामने उसके ही परिवार के लोग और मित्र खड़े थे। वह युद्ध करने से हिचकिचा रहा था और अपने कर्तव्य को पूरा करने में असमर्थ महसूस कर रहा था।
भगवान श्रीकृष्ण ने अर्जुन को समझाया कि कर्म योग के माध्यम से वह अपने कर्तव्य को पूरा कर सकता है और अपने लक्ष्यों को प्राप्त कर सकता है। 
भगवान श्रीकृष्ण ने अर्जुन को कर्म योग के सिद्धांतों के बारे में सिखाया, जैसे कि:
- कर्म को बिना किसी मोह या आसक्ति के करना।
- कर्म के परिणाम की चिंता न करना।
- कर्म को अपने कर्तव्य के रूप में करना।
- कर्म को भगवान की सेवा के रूप में करना

निष्क्रियता और कर्म में निम्नलिखित अंतर हैं:
 कर्म में व्यक्ति किसी भी कार्य या गतिविधि में भाग लेता है, जबकि निष्क्रियता में व्यक्ति किसी भी कार्य या गतिविधि में भाग नहीं लेता है। 
कर्म में व्यक्ति किसी भी कार्य या गतिविधि में रुचि लेता है और उसमें प्रेरित रहता है, जबकि निष्क्रियता में व्यक्ति किसी भी कार्य या गतिविधि में रुचि नहीं लेता है और उसमें प्रेरित नहीं रहता है।
कर्म के परिणामस्वरूप व्यक्ति को सफलता और संतुष्टि प्राप्त होती है, जबकि निष्क्रियता के परिणामस्वरूप व्यक्ति को असफलता और असंतुष्टि प्राप्त होती है।
कर्म व्यक्तिगत विकास को बढ़ावा देता है, जबकि निष्क्रियता व्यक्तिगत विकास को रोकती

प्रश्न 2: निष्काम कर्म क्या है? कर्मबंधन से मुक्ति कैसे प्राप्त होती है?
निष्काम कर्म एक ऐसा कर्म है जो बिना किसी व्यक्तिगत लाभ या फल की इच्छा के किया जाता है। 
 निष्काम कर्म में व्यक्ति किसी भी फल या परिणाम की इच्छा नहीं रखता ह ,  अपने कर्तव्य के लिए कार्य करता है।
 निष्काम कर्म में व्यक्ति किसी भी चीज़ से मोह या आसक्ति नहीं रखता है,
 व्यक्ति सेवा की भावना से कार्य करता है।
निष्काम कर्म से व्यक्ति को आत्म-शांति प्राप्त होती है।

कर्म बंधन से मुक्ति प्राप्त करने के लिए 
कर्म की समझ होना आवश्यक है। हमें यह समझना होगा कि कर्म क्या है, कर्म के क्या परिणाम होते हैं, और कर्म से कैसे मुक्ति प्राप्त की जा सकती है।

निष्काम कर्म करना आवश्यक है। निष्काम कर्म से हम कर्म के बंधन से मुक्त हो सकते हैं। 
 हम किसी भी कर्म को करते हैं, तो हमें उसके परिणाम की इच्छा नहीं करनी चाहिए। इससे हम कर्म के बंधन से मुक्त हो सकते हैं।
आत्म-ज्ञान प्राप्त करना आवश्यक है। आत्म-ज्ञान से हमें यह समझ में आती है कि हम कौन हैं, हमारा उद्देश्य क्या है, और हम कर्म के बंधन से कैसे मुक्त हो सकते हैं।
ध्यान और योग का अभ्यास करना आवश्यक है। ध्यान और योग से हम अपने मन को शांत कर सकते हैं और आत्म-ज्ञान प्राप्त कर सकते हैं। इससे हम कर्म के बंधन से मुक्त हो सकते हैं।
इन बातों का पालन करके, हम कर्म बंधन से मुक्ति प्राप्त कर सकते हैं और अपने जीवन को अधिक अर्थपूर्ण और सार्थक बना सकते हैं।

प्रश्न 3: स्वधर्म का पालन करने का महत्व क्या है? परधर्म से क्यों बचना चाहिए?

स्वधर्म का पालन करना बहुत महत्वपूर्ण है। स्वधर्म का अर्थ है अपने कर्तव्यों और जिम्मेदारियों का पालन करना। 
स्वधर्म का पालन करने से आत्म-संतुष्टि प्राप्त होती है। जब हम अपने कर्तव्यों और जिम्मेदारियों का पालन करते हैं, तो हमें आत्म-संतुष्टि  और  आत्मविश्वास की अनुभूति होती है ,हम धार्मिक और नैतिक मूल्य का पालन कर सकते हैं 

परधर्म से बचना चाहिए क्योंकि:
परधर्म का अर्थ है किसी दूसरे के धर्म या कर्तव्य का पालन करना। यह एक ऐसी स्थिति है जहां व्यक्ति अपने स्वयं के धर्म या कर्तव्य को छोड़कर किसी दूसरे के धर्म या कर्तव्य का पालन करता ह
 परधर्म का पालन करने से व्यक्ति का आत्म-विश्वास कम हो सकता  है, अपने स्वयं के धर्म या कर्तव्य की उपेक्षा कर सकता है  , 
व्यक्ति नैतिक और धार्मिक मूल्यों का उल्लंघन कर सकता है।
 व्यक्ति का व्यक्तिगत विकास कम हो सकता है।

Ans 9 सौ.निलिमा चौधरी ताई .....

प्रश्न. 1.---अर्जुनाला कर्मयोग का शिकवला गेला ? निष्क्रियता आणि कर्म यामध्ये काय फरक आहे ?
उत्तर  --  स्वकियांना युध्दभुमीवर पाहून अर्जुन मोहग्रस्त त्याची मनःस्थिती द्विधा होते. युध्द करावे कि न करावे अशा संभ्रमात अर्जुन असतांना भगवान श्रीकृष्ण समजवतात. अर्जुन क्षत्रिय होता क्षत्रियाचे कर्तव्य म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणे .युध्द टाळणे म्हणजे स्वधर्माचा त्याग करणे होईल जे अर्जुनाला पापमय करेल. शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे .त्यामुळे कोणालाही मारण्याच्या भितीत अडकण्याची गरज नाही .अधर्माचा नाश करणे आणि धर्माची स्थापना करणे हे भगवंताचे कार्य आहे.अर्जुनाला सांगण्यात आले की त्याने युद्ध स्वतःसाठी नाहीतर धर्माच्या रक्षणासाठी लढले पाहिजे .युध्द न करणे म्हणजे कर्तव्य ाचा त्याग करणे .तसे केल्यास अर्जुनाला अपयश आणि लज्जेला सामोरे जावे लागेल .अधर्म नष्ट करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी युध्द करणे आवश्यक आहे .अशा रितीने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग शिकवला . श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे अर्जुनाला कर्तव्याचा बोध होतो .
    
 निष्क्रियता आणि कर्म यामध्ये काय फरक आहे ? 
      निष्क्रियता म्हणजे काहीही कर्म न करणे .
भगवंतानी अर्जुनाला दुसर्या अध्यायात ज्ञानयोग आणि कर्मयोग याबद्दल संक्षिप्त माहिती सांगितली .ज्ञान व कर्म या दोन्हीचे महात्म्य सांगितल्यामुळे अर्जुनाची द्विधा मनःस्थिती झाली .ज्ञान प्राप्त करुन जर मी मोक्ष मि।वू शकतो तर युध्दासारखे कठीण काम मी का केले पाहिजे असा प्रश्न अर्जुना ला पडला .
        सांख्य म्हणजे बुध्दी प्रधान ,अभ्यास करून पुस्तके वाचून ,संन्यास घेऊन ,ध्यान, जप करून केवळ ज्ञानमार्गाने परमात्म्याची प्राप्ती करणारे लोक असा आहे . अशा लोकांकरता योग्य मार्ग ज्ञानयोग हा परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता योग्य मार्ग आहे .कारण ज्ञान मार्ग विचार प्रधान मार्ग आहे .दुसरा मार्ग कर्ममार्ग हा क्रिया प्रधान मार्ग आहे .काही लोकांना कर्म करण्यात रुची असते तर काहींना अभ्यास करण्यात .प्रत्येकाने आपापल्या रुचीचा मार्ग निवडला पाहिजे .दोन्ही मार्गाने परमेश्वर प्राप्ती चे ध्येय साध्य होऊ शकते .
" न कर्मणामनारम्भान्  नैष्कर्म्य पुरुषोsश्नुते ।
न च सन्न्यसनादेव सिध्दीं समधिगच्छति ।।
  या श्लोकात' नैष्कर्म्य  ' हा शब्द महत्त्वाचा आहे.
प्रथमदर्शनी आपल्याला असे वाटते की नैष्कर्म्य होणे काही न करणे परंतु असे नाही .नैष्कर्म्य अवस्था म्हणजे सर्व काही करून काहीही न करणे आणि काहीही न करता सर्व काही करणे . 
  एखादे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे कर्म करावे लागते .ही योग्यता मिळविण्याकरिता मनुष्याला प्रथम कर्मच करावे लागते
       एखाद्या कार्यालयात जेव्हा कार्यालयाचे प्रमुख प्रवेश करतात आणि आपल्या कक्षात जाऊन बसतात तेव्हा कार्यालयातील इतर लोक आपल्या आपल्या कामात मग्न होतात आणि आपले काम मनापासून करु लागतात .परंतु त्या प्रमुखांना आपल्या कक्षात बसून वर्तमान पत्र वाचण्याची ही मुभा असते .ते स्वतःकाहीही काम करत नाहीत.तरीही सर्व कामे होतात. परंतु हे पद मिळविण्या करिता त्यांनी पूर्वी कर्म केलेले असते .कर्म केल्याशिवाय नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होत नाही. सर्व कामे करून सुध्दा मी काही च करत नाही तर परमेश्वर हे काम करुन घेत आहे .हा भाव आपल्याला नैष्कर्म्य अवस्था  प्राप्त करुन देतो .याच स्थितीला नैष्कर्म्य स्थिती म्हणतात. ही अवस्था प्राप्त होण्याकरता प्रत्येकाला कर्म करणे अनिवार्य आहे .अवस्था प्राप्त झाली असता पुरुषाचे कर्म अकर्म बनते . म्हणजे ते फल उत्पन्न करु शकत नाही .त्या अवस्थेला निष्कर्मता म्हणतात .
     
"न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत ।
कार्य ते ह्यवशः कर्म सर्वःप्रकृतिजैर्गुणै।।
      या श्लोकात भगवान कर्माचे महत्त्व सांगतात .
ते म्हणतात कोणत्याही माणसाला क्षणमात्र सुध्दा  कर्माचा पुर्णपणे त्याग करणे अशक्य आहे.कोणत्याही वेळी कुठलाही माणूस क्षणभर सुध्दा कर्म केल्यावाचून राहू शकत नाही.
        आपण मनुष्य जीवनात आलो आहे .प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून मनुष्य जन्म होतो .प्रकृतीपासून जड शरीर निर्माण होते तर पुरुषापासून आत्मा निर्माण होतो आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे .प्रकृतीत असलेले तीन गुण सत्त्व ,रज, आणि तम हे आपल्याला त्याच्या कडे खेचत असतात.तमोगुण जरी वाईट वाटला तरी तो आपल्यासाठी  आवश्यक असतो .दिवस भर काम केल्यावर रात्रीची झोप गरजेची असते .एक एक गुणावर काम करुन गुणातीत होऊ शकतो .मनुष्य जन्मात असल्याने कर्म करावेच लागते .रातकिड्यांचा रात्री आवाज कानावर येणे ,पडल्या पडल्या गाड्यांचा  आवाज ऐकणे हे सुध्दा एक कामच आहे.आपल्या मनातील विचारांची शृंखला थांबून जेव्हा आपण विचार मुक्त होतो तेव्हाच आपण विकार मुक्त होऊ शकतो .
      पंचेद्रियाकडून काही ना काही काम चालूच असते .जरी आपण सजग राहिलो तरी कर्म सुरुच असते .सर्व इंद्रिये कर्म करीत असतात कारण मानवी शरीर  प्रकृतीपासून बनलेले आहे .

 प्रश्न 2.   - निष्काम कर्म म्हणजे काय? कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते ? 
       निष्काम कर्म म्हणजे  निस्वार्थीपणे केलेली कृती .निष्काम कर्म ही कोणतीही फळे किंवा परिणामांची अपेक्षा न करता केलेली क्रिया आहे.फळाच्या आणि आसक्ती चा त्याग करुन भगवंताच्या आज्ञेनुसार केवळ भगवंतासाठीच समत्त्व बुध्दीने कर्म करीत राहणे म्हणजे निष्काम कर्मयोग. निष्काम कर्माचा शब्दशःअर्थ  "इच्छारहित कर्म " असा होतो .कर्माच्या फलाची आसक्ती न करता विहीत कर्तव्ये पार पाडणे .
     अध्याय 2 मधील  47  क्रमांकाचा श्लोक यात भगवंतानी समजावून सांगितले आहे .कर्म करतांना त्याचा लाभ किंवा तोटा याचा विचार न करता कर्म करणे .कर्म  ही केवळ ईश्वराची सेवा आहे असे समजून निस्वार्थीपणे कार्य करणे .निष्काम कर्माचे फल हे परमात्म्याची प्राप्ती असल्याचे सांगून अनासक्त भावाने कर्म करण्याची अर्जुनास आज्ञा करतात .
" तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुष ।।"
     कर्मबंधन म्हणजे कर्माच्या फळाच्या अपेक्षेमुळे होणारे बंधन .जर एखादा मनुष्य कर्माच्या फळावर आसक्त असेल तर त्याला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतात .
कर्मबंधनातून मुक्ती मिळविण्याचे मार्ग आहेत जसे व्यक्तीने निष्काम भावाने कर्म करणे जरुरी आहे .मनुष्य फलाची इच्छा न ठेवता फक्त कर्तव्य म्हणून कर्म करतो ,तेव्हा तो कर्म बंधनातून मुक्त होतो.
"मयि सर्वाणी कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा ।"
  कोणतेही कर्म करण्यापूर्वी भगवंताला स्मरुन भगवंतासाठी आपल्याला कर्तव्य बुध्दीने भगवंतासाठी हे कर्म करत आहोत, असे स्मरण केल्याने आपल्याला त्या कर्मापासून किंवा त्या कर्मबंधनातून मुक्ती मिळेल असे भगवान श्रीकृष्ण येथे सांगतात.  जे कोणी मानव दोषद्दष्टी टाकून श्रध्दायुक्त अन्तःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात ,तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात.

प्रश्न 3 .-  स्वधर्म पाळण्याचे महत्त्व काय ? परधर्म का टाळावा ? 
   
" श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।" 3.35 
      चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे .आपल्या धर्मात तर मरणेही कल्याण कारक आहे ,पण दुसर्याचा धर्म भय देणारा आहे .
श्रेयान्स्वधर्मो विगुणः     आपला धर्म गुणरहित असला तरी ही अतिशय उत्तम आहे.माता मुलाचे संगोपन करते तो मातृधर्म,पिता पालन करतो तो पितृधर्म ,आपण स्वतः चे कर्तव्य पार पाडतो तो स्वधर्म असतो .माझे स्वतः चे कर्तव्याचे मी नीप पालन करणे .यात माझे कल्याण आहे .
साँफ्टवेयर मध्ये काम करणाऱ्या लोकाचे चांगले आहे.ते दिवस भर एसी कार्यालयात बसून काम करतात पण मला मात्र ऊन ,पाऊस याची पर्वा न करता बांधकामाच्या ठिकाणी बाहेर काम करावे लागते असे एखाद्याला वाटेल पण ज्याने त्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म नीट पार पाडणे  महत्त्वाचे असते .मला माझ्या स्वधर्मानुसार जे कर्म प्राप्त झाले आहे ते मी नीट पार पाडेन असा विचार करावा .
स्वधर्मे निधनं श्रेयः      
निसर्गाने महिलांना काही विशिष्ट जबाबदार्या दिल्या आहेत.केवळ महिलाच मुलांना जन्म देऊ शकते .बालकाचे संगोपन कर्तव्य भावनेने माता करत असते .तिला आपल्या मुलाकडून कोणतीच अपेक्षा नसते .भगवंत म्हणतात ,आपले कर्तव्यकर्म करत असताना जर मृत्यू आला तर तो कल्याणकारी आहे असे समजावे .
परधर्मो भयावह  - दुसर्याचे काम कितीही चांगले वाटले तरी ते भयावह असते .एखाद्या बालकाची आई कुरुप असली तरी त्याला त्याची आईच हवी असते.ज्ञानेश्वर महाराजांनी यासाठी अठराव्या अध्यायात छान दाखला दिला आहे.ते म्हणतात, तुपात पाण्याहून कितीतरी अधिक गुण असतात पण असे असुन सुध्दा माशांसाठी पाणीच कल्याणकारी असते .मासा तुपात जगू शकत नाही त्याच प्रमाणे स्वधर्म प्रत्येकासाठी कल्याणकारी असतो. मनुष्याने कोणत्याही स्थितीत आपल्या धर्माचा त्याग करु नये.तर निष्काम ,निर्मम आणि अनासक्त होऊन स्वधर्माचे पालन करावे.परधर्म पाळणे सर्वथा अयोग्य आहे.

शृंखला ५    अध्याय ३
सुभाष अं कुलकर्णी 


प्रश्न -- १ --  अर्जुनाला कर्म योग कां शिकवला गेला ? निष्क्रियता आणि कर्म यात काय फरक आहे ? 
उत्तर --  कुरुक्षेशृंखला ५    अध्याय ३

प्रश्न -- १ --  अर्जुनाला कर्म योग कां शिकवला गेला ? निष्क्रियता आणि कर्म यात काय फरक आहे ? 
उत्तर --  कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचे सैन्य युध्दा साठी उभे असताना अर्जुनाने भगवंताला युद्धास नकार सांगितला. त्याला आपले नातेवाईक, आप्त, स्वकिय, बांधव मित्र यांची आपल्या हातुन हत्या होइल, त्याचे पाप लागेल या भितीने त्याने युद्धास नकार दिला. आपली
त्रावर कौरव पांडवांचे सैन्य युध्दा साठी उभे असताना अर्जुनाने भगवंताला युद्धास नकार सांगितला. त्याला आपले नातेवाईक, आप्त, स्वकिय, बांधव मित्र यांची आपल्या हातुन हत्या होइल, त्याचे पाप लागेल या भितीने त्याने युद्धास नकार दिला. आपली शस्त्रे (बाणा सह धनुष्य) टाकुन देउन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. अर्जुनातला पुरुषार्थ जागविण्यासाठी भिती मुळे युद्ध करणे अधर्म आहे हा गैरसमज दुर करण्याकरिता भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला. अर्जुन आपले क्षत्रिय धर्माचे कर्म (कर्तव्य) विसरला. तो किं कर्तव्यमूढ झाला. त्याला कर्तव्यास जागरुक करण्या करिता कर्म योग शिकवला. कर्तव्य (कर्म योगाची) जाणीव करून दिली. त्याच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. त्याने या धर्म युद्धास तयार व्हावे त्याच्यातला पुरुषार्थ व क्षत्रियभाव जागृत व्हावा ह्यासाठी भगवंतानी अर्जुनाला कर्म योग शिकवला. मनुष्य पशु पक्षी जेव्हा जन्माला येतात तेव्हा काही ना काही मिळविण्याच्या दृष्टीनेच ते कर्म करीत असतात. संपूर्ण कर्माचा संबंध संसाराशी आहे म्हणून प्रत्येक जीव कर्म बंधनाने बांधला जातो मग ते कर्म निष्काम आसक्ती रहित भगवंताला समर्पित असो वा कलासक्त असो. निष्काम आसक्ती रहित समर्पित कर्म थेट भगवंता पर्यंत पोहचते मात्र फलासक्त कर्म निष्क्रिय होते. कर्मात बंधन नसावे, ते जन कल्याणकारी असावे, त्यात परमात्म्य भाव असावा. फळाची अपेक्षा न बाळगता ते फळ परमेश्वरावर सोडावे असा कर्म कर्ता परमेश्वरा जवळ पोहचतो त्याच्यात विषयाची आसक्ती कमी होउन हळू हळू ती लुप्त होते दुसऱ्याच्या आनंदात आनंद दुसऱ्याच्या कल्याणात समाधान मानतो व समत्वाला पोहचतो. ह्या उलट कर्माची निष्क्रियता अधोगतीला नेते. निष्क्रियता कर्मात दोन प्रकारे येते, जसे कि, स्वासोच्स्वास शरिराच्या नैसर्गिक हालचाली व कार्य आणि संसार बंधनात येणारे कर्म. नैसर्गिक कर्मात निष्क्रियता कर्म केल्याने (चांगले अथवा वाईट) येत नाही. उदाहरणार्थ नाक दाबल्याने स्वास रुकतो व गुदमरते ती क्रिया लगेच बंद केली की स्वास लगेच पूर्ववत् होतो ही निष्क्रियता होत नाही. संसार बंधनात असलेली कर्मे अनासक्त उदंड उन्मत्त भावनेने केल्यास त्यात निष्क्रियता येते ते कालांतराने कुणालाही फलदायी ठरत नाहीत, कारण त्यात प्रेम भाव नसतो. त्यात बुद्धी मोह रुपी चिखलात रुतलेली असते, ती निर्विकार नसते त्यामुळे कर्म कर्ता समत्वाला पोहचू शकत नाही.

प्रश्न २ -- निष्काम कर्म म्हणजे काय ? कर्म बंधनातून मुक्ती कशी मिळते?
उत्तर -- निष्काम कर्म म्हणजे कर्म करताना ते निष्ठेने करणे व फळाची अपेक्षा न बाळगता परमेश्वरास अर्पण करणे हे निष्काम कर्म होय.
२ ऱ्या अध्यायाच्या ४७ व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे 
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सग्ङोऽस्त्वकर्मणि
भगवंत सांगतात कर्म करण्याचा अधिकार तुमच्या कडे आहे परंतु त्या कर्माच्या फळांवर तुमचा हक्क नाही फळाची अपेक्षा करुं नका आणि कर्म करण्या पासुन परावृत्तही होऊ नका.
मनुष्याचा प्राप्त कर्तव्य कर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे यात तो स्वतंत्र आहे. मनुष्य योनी कर्म योनी आहे. मनुष्य योनी शिवाय दुसरी कोणतीही योनी नवीन कर्म करण्यासाठी नाही पशू- पक्षी इत्यादी जंगम वृक्ष - लता इत्यादी स्थावर प्राणी नवीन कर्म करु शकत नाहीत. नरकातील जीव देखील भोग योनीत असल्याने आपल्या दुष्कर्माचे फळ भोगतात. नवीन कर्म करु शकत नाहीत. नवीन कर्म करण्याचा अधिकार केवळ मनुष्याचाच आहे. भगवंतानी सेवारुपी नवीन कर्म करुन आपला उध्दार करण्यासाठीच हा अंतिम मनुष्य जन्म दिला आहे. जर जीव आपल्यासाठी कर्म करेल तर बधंनात पडेल आणि कर्म न करता आळस व प्रमादात पडुन राहिल व वारंवार जन्मत - मरत राहील म्हणून भगवंत म्हणतात कि, मनुष्याचा केवळ सेवा रुप कर्तव्य कर्म करण्याचाच अधिकार आहे. म्हणजेच मनुष्य शरिरात दोन गोष्टी आहेत जुन्या कर्माचा फलभोग आणि नविन पुरुषार्थ. दुसऱ्या योनीत केवळ जुन्या कर्माचा फलभोग आहे. एकाने त्रिवेणी संगमात डुबकी लावली आणि त्रिवेणीला विचारले माझी पापं मिळाली का? जमा केलीत का? तिने उत्तर दिले होय! 
त्याने विचारले त्याचे तुम्ही काय करणार
त्रिवेणी गालात खुदकन हसली आणि म्हणाली ती ठेवून घ्यायला मी का वेडी आहे मी ती समुद्रात सोडुन देणार.
त्याने समुद्राकडे चौकशी केली माझी पापं त्रिवेणी कडुन मिळाली का? 
समुद्र म्हणाला होय त्याने विचारले तुम्ही त्याचे काय करणार? समुद्र गंभीरपणे हसला व म्हणाला आम्ही वेडे नव्हेत ते ठेवायला ते ढगाकडे पाठवू.
त्याने ढगाकडे चौकशी केली व विचारले 
समुद्रा कडुन माझी पापं मिळाली का?
ढग म्हणाले होय मिळाली 
त्याने विचारले तुम्ही त्याचे काय करणार.               ढगांनी एकमेकाकडे पाहिले अन् हसून म्हणाले आम्ही का वेडे आहोत आमच्या कडे ठेवायला आम्ही त्याचा खाली पावसा सारखा वर्षाव करु.
त्याने विचारले कुणावर वर्षाव करणार 
ढग खट्याळ हसले अन् म्हणाले कुणावर? अर्थातच तुझ्यावर  
त्याला अचानक जाणीव झाली आपण कुठेही असो कर्म आपल्या मागोमाग येते ही सृष्टी आपल्याला आठवण करुन देते की नितीमान रहा व चांगले वर्तन करा कारण आपले कर्म शेवटी आपल्या पर्यंत परततेच.
अध्याय ३ रा श्लोक क्रमांक ४ मध्ये भगवंत म्हणतात,,
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्य पुरुषोऽश्नुते
न च संन्यसनादेव सिध्दिं समधिगच्छति
मनुष्य कर्म केल्या शिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योग निष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने सिध्दीला म्हणजेच सांख्य निष्ठेला प्राप्त होत नाही. अशी अवस्था प्राप्त झाली असता मनुष्याचे कर्म अकर्म बनते म्हणजे फळ उत्पन्न करु शकत नाही त्या अवस्थेला निष्कर्मता म्हणतात. कर्म योगाचे आचरण करणारा मनुष्य कर्म करीत असतानाच निष्कर्मतेला प्राप्त होतो ज्या स्थितीत मनुष्याचे कर्म अकर्म होते अर्थात बंधनकारक राहात नाही तेव्हा निष्कर्मता येते. निष्काम भावनेने (कर्म योगाच्या दृष्टीने) कर्म करणे आवश्यक आहे. जेव्हा संपूर्ण कर्म दुसऱ्याच्या सेवेसाठी केले जाते आपल्यासाठी नाही तेव्हाच कामनेचा त्याग होऊ शकतो कारण संपूर्ण कर्मचा संबंध संसाराशी आहे. आणि आपला संबंध परमात्म्याशी आहे. आपल्यशी कर्मचा नाही. जो पर्यंत आपल्यासाठी कर्मे केली जातील तो पर्यंत कामनेचा त्याग होणार नाही आणि जो पर्यंत कामणेचा त्याग होणार नाही तो पर्यंत निष्क्रियता प्राप्त होणार नाही. म्हणुन नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म निट करत राहिल्यास आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो कर्म बंधनातून मुक्त होतो.

प्रश्न ३ -- स्वधर्म पाळण्याचे महत्व काय? पर धर्म का टाळावा?
उत्तर -- अध्याय ३ रा श्लोक क्रमांक ३५ मध्ये भगवंतानी सांगितले 
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात
स्वधर्मे निधनं श्रेय:परधर्मो भयावह:
चांगल्या प्रकारचे आचरण असलेल्या दुसऱ्याच्या धर्मा पेक्षा कमी गुण असणारा आपला धर्म श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मात तर मृत्यु होणे ही कल्याणकारक आहे आणि दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. इतर वर्ण आश्रम इत्यादीचा धर्म (कर्तव्य) बाहेरुन पाहता गुण संपन्न असतील त्याच्या पालनात सुध्दा सोपेपणा असेल. पालन करण्यात मनही लागत असेल. धन - वैभव ,सुख - सुविधा, मान - प्रतिष्ठा इत्यादी सुध्दा मिळत असतील आणि जीवनभर सुख आणि आरामात राहावयास मिळत असेल तरी सुद्धा त्या परधर्माचे पालन आपल्या साठी विहीत नसल्याने परिणामी दु:ख आणि भयदायकच आहे.
             या उलट आपल्या वर्णाश्रमाचा धर्म बाहेरुन पाहता कमी असेल, पालन करणे ही कठीण असेल, पालन करण्यात मन देखील लागत नसेल धन -- वैभव, सुख -- सुविधा, मान -- प्रतिष्ठा इत्यादी सुध्दा मिळत नसतील आणि त्याचे पालन करताना जीवनभर कष्ट सुध्दा सहन करावे लागतील तरी सुद्धा स्वधर्माचे निष्काम भावाने पालन करणे कल्याणकारी आहे. म्हणुन मनुष्याने कोणत्याही स्थितीत आपल्या धर्माचा त्याग करु नये तर निष्काम निर्मम आणि अनासक्त होउन स्वधर्माचे पालन केले पाहिजे.
     मनुष्यासाठी स्वधर्माचे पालन स्वाभाविक आणि सहज आहे. मनुष्याचा जन्म कर्मा नुसार होत असतो आणि जन्मा नुसार भगवंतानी कर्म निश्चित केले आहे. (अध्याय १८ श्लोक क्रमांक ४१) म्हणुन आपण नियत कर्माचे पालन केल्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होतो. अर्थात त्याचे कल्याण होते (अध्याय १८श्लोक क्रमांक ४५). दोषयुक्त दिसत असले तरी नियत कर्म अर्थात स्वधर्माचा त्याग करु नये (अध्याय १८ श्लोक क्रमांक ४८)
            अर्जुन युद्ध करण्या पेक्षा भिक्षेवर जगणेच श्रेष्ठ समजत आहे (अध्याय २ श्लोक क्रमांक ५). भगवंत अर्जुनाला समजवतात भिक्षेवर निर्वाह करणे भिक्षूकासाठी स्वधर्म असला तरी तुझ्या साठी परधर्म आहे. कारण तू गृहस्थी क्षत्रिय आहेस भिक्षूक नव्हे. पहिल्या अध्यायात सुध्दा जेव्हा अर्जुनाने म्हटले की युद्ध करण्याने पाप लागेल "पापमेवा श्रयेत" अध्याय १श्लोक क्रमांक ३६) तेव्हा भगवंतानी म्हटले की धर्म युद्ध न करण्याने तू स्वधर्म आणि किर्तीला गमावून पापाला प्राप्त होशील (अध्याय २श्लोक क्रमांक ३३).
         भगवंतानी सांगितले की जय -- पराजय, लाभ -- हानी आणि सुख -- दु:ख यांना समान समजून युद्ध कर. व्देष रहित होउन कर्तव्याचे (धर्माचे) पालन करण्याने पाप लागत नाही (अध्याय २ श्लोक क्रमांक ३८). स्वधर्माचे पालन करताना राग व्देष राहिले तर पाप लागते अन्यथा नव्हे. राग -- व्देष रहित होउन स्वधर्माचे योग्य प्रकारे पालन आचरण करण्याने समतेचा (योगाचा) अनुभव येतो. समतेचा अनुभव झाल्यास दु:खाचा नाश होतो म्हणून भगवंत वारंवार अर्जुनाला राग -- व्देष रहित होउन युद्ध रुपी स्वधर्माचे पालन करण्यावर विशेष भर देत आहेत. 
भगवंत अर्जुनाला समजावित आहेत क्षत्रिय कुळात जन्म झाल्या मुळे क्षत्रिय धर्माच्या नात्याने युद्ध करणे तुझा स्वधर्म (कर्तव्य) आहे. म्हणुन युद्धातील परिणामाला (हार-- जीत) समान समजायचे आणि युद्ध रुपी क्रियेचा संबंध आपल्याशी नाही असे समजून केवळ कर्माची आसक्ती नष्ट करण्यासाठी कर्म करायचे. शरिर, इंद्रिये, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी आपल्या कर्तव्य पालनासाठीच आहेत.
         वर्ण, आश्रम इत्यादी नुसार आपआपल्या कर्तव्याचे निस्वार्थ भावाने पालन करणे हाच स्वधर्म आहे. आस्तिक लोक ज्याला धर्म म्हणतात त्याचेच नाव कर्तव्य आहे. स्वधर्माचे पालन करणे अथवा कर्तव्याचे पालन करणे एकच आहे. कर्तव्य त्याला म्हणतात ज्याला सुगमतेने करता येते, जे अवश्य करण्या योग्य आहे आणि जे केल्याने जे प्राप्त करावयाचे ते प्राप्त होते. हा नियम आहे की धर्माचे योग्य प्रकारे पालन केल्यास मनुष्याला वैराग्य निर्माण होते. 
स्वधर्माचे पालन सुख अथवा दु:काकडे पाहून केले जात नाही तर भगवंताच्या अथवा शास्त्राच्या आज्ञेनुसार निष्कामभावाने केले जाते. स्वधर्म (कर्तव्याचे) पालन करीत असताना जर काही त्रास झाला तर तो त्रास देखील उन्नती कारकच आसतो. तो त्रास नसतो तर ते तप होते. त्या त्रासामुळे फार लवकर उन्नती होते. कारण तप आपल्या साठी केले जाते आणि कर्तव्य दुसऱ्या साठी. जाणून केलेल्या तपाने तेवढा लाभ होत नाही जेवढा लाभ आपोआप झालेल्या त्रासरुपी तपाने होतो. ज्यांनी स्वधर्माचे पालन करताना अत्यंत कष्ट सोसले आणि देह ठेवला ते धर्मात्मा पुरुष अमर झाले. लौकिक दृष्टीने सुध्दा जो पुरुष त्रास झाला तरी आपल्या धर्मापासुण (कर्तव्या) ढळत नाही टिकुन राहतो त्याची जगामध्ये खूप प्रशंसा होत असते. 
       निष्कामभावनेने धर्माचे पालन करीत असताना कष्ट सहन करावे लागले अथवा मृत्युही झाला तरीही त्यामुळे लोकामध्ये प्रशंसा आणि परलोकात कल्याणच होते.



Comments

  1. सगळ्यांची उत्तर खुपच छान वेगवेगळी उत्तरे शब्द रचना वाचायला मिळतात

    ReplyDelete

Post a Comment

तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा