*प्रश्न आमचा उत्तर तुमचे*
या प्रश्नाची उत्तरे सर्वांनी ५ मार्च पर्यंत पाठवावीत 🙏🙏
१. कर्म योग म्हणजे काय?
२. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी का प्रवृत्त केले?
३. श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणा द्वारे स्पष्ट केले?
Ans.१. कल्पना बागडे नताई लिहितात .....
प्र 1 ला ः कर्मयोग म्हणजे काय?
अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्मानुसार युद्ध (कर्म) करण्यास सांगितले आणि त्या नंतर ज्ञान श्रेष्ठ आहे असे भगवंत म्हणतात तेव्हा अर्जुनाने भगवंताना प्रश्न विचारला कि जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मला हे युद्ध करण्याचे(कर्म ) करण्यासाठी घोर पाप ओढवून घेण्यासाठी का प्रर्वुत्त करत आहात ते पाप का करायला लावत आहात तेव्हा भगवंत म्हणतात कर्म दोन प्रकारे केली जातात 1) कर्तव्य विज्ञान 2) योग विज्ञान 2/31 ते 37 कर्तव्य कर्म करण्यापासून लाभ / हानी काय होते हे सांगितले आहे 2/38 ते 53 श्लोकात भगवंतांनी समतेचा विचार सांख्ययोग कर्मयोग दोन्ही साधना प्राप्त होवू शकतो शरीर आणि शरीरी जाणून अकर्तव्याचा त्याग आणि कर्तव्याचे पालन करणे हा कर्मयोग आहे मनुष्याला मायेने उत्पन्न झालेल्या सर्व गुणच गुणांत वावरत असतात मन इंद्रिय व शरीर च्या सहाय्याने होणाऱ्या सर्व क्रियांना कर्तेपण ( मी कर्ता भाव ) सोडून सर्वव्यापी सच्चिदानंद परमात्माशी एकरुप होऊन राहावे हा सांख्ययोग फळाची किंवा आसक्तीचा त्याग करून भगवंतांच्या आज्ञेनुसार केवळ भगवंतांसाठीच समत्व बुद्धीने कर्म करीत राहाणे म्हणजे निःष्काम कर्मयोग आहे
प्रश्न 2 रा श्रीकृष्णाने अर्जुनाला युध्दासाठी का प्रर्वुत्त केले?
अर्जुनाने आप्त स्वकीय गुरुजनांना पुजनिय व्यक्तींना ज्यांच्या सोबत जीवनातील अनेक प्रसंग व्यतीत केले या सर्वांना युद्ध भूमित समोर पाहून अर्जुनाच्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडले सर्वांगाला कंप सुटला आणि तो रथातून उतरून खाली बसला यांच्या बरोबर युद्ध करणखर नाही असे म्हणला तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितले कि त्याने युद्ध केले पाहिजे 2/11 तु ज्यांच्या साठी शोक करु नये अशा माणसांसाठी तू शोक करत आहेस पण ज्यांचे प्राण गेले आहेत आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्या साठी कोणतीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत 2/12 मी कोणत्याही काळी नव्हती तछ ही नव्हता हे राजेही नव्हते असे नाही या पुढेही आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही 2/18 तेव्हा या नाशरहीत मोजता न येणाऱ्या नित्यस्वरुप जीवात्म्यांची शरीरे नाशवंत आहेत म्हणून हे अर्जुना तू तुझ्या क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी युद्ध कर
प्रश्न क्रमांक 3 श्रीकृष्णाने आत्मा नित्य अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणा द्वारे स्पष्ट केले ?
2/20 आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाला तर पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण आत्मा जन्म नसलेला नित्य सनातन प्राचीन आहे शरीर मारले गेले तरीही हा मारला जात नाही 2/22 ज्या प्रमाणे माणूस जूनी वस्त्रे टाकून देतो दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो त्याच प्रमाणे जीवात्मा जूनी शरीरे टाकून नव्या शरीरात जातो 2/2 हा आत्मा कापता न येणारा जाळता न येणारा भिजवता न येणारा वाळवता न येणारा तो नित्य ,सर्वव्यापी, अचल स्थिर राहाणारा आणि सनातन आहे आत्मा अव्यक्त अचिन्त्य आणि विकाररहीत आहे या उदाहरण द्वारे स्पष्ट केले आहे 🙏🙏🙏 जय श्रीकृष्ण
Ans. 2. अश्विनी पैठणकर यांनी लिहिले ....
*१. कर्मयोग म्हणजे काय?*
कर्मयोग हा भगवद्गीतेतील एक महत्त्वाचा योगमार्ग आहे, जो निष्काम कर्मावर (फलाची अपेक्षा न करता कर्म करणे) आधारलेला आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की, माणसाने कर्तव्य करावे, पण त्याच्या फळाची इच्छा ठेवू नये.
गीतेच्या (अध्याय २, श्लोक ४७) मध्ये श्रीकृष्ण म्हणतात:
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥"
अर्थ:
तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण कर्माच्या फळावर नाही. म्हणून कर्म फळाच्या आशेने करू नकोस आणि आळशीपणे कर्म करण्यास टाळाटाळ करू नकोस.
कर्मयोगाची वैशिष्ट्ये:
1. निष्काम कर्म: कर्म करताना त्याचा लाभ किंवा तोटा याचा विचार न करता कर्म करणे.
2. कर्तव्यभाव: कर्म ही केवळ ईश्वराची सेवा आहे, असे समजून निस्वार्थपणे कार्य करणे.
3. सामान्य जीवनात कर्मयोग: रोजच्या जीवनातील प्रत्येक कार्य मनापासून आणि निःस्वार्थपणे करणे हे कर्मयोगाचे उत्तम उदाहरण आहे.
4. मोक्षप्राप्तीचा मार्ग: निःस्वार्थ कर्माने मन शुद्ध होते आणि आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करता येतो.
*२. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी का प्रवृत्त केले?*
महाभारताच्या युद्धाच्या वेळी, अर्जुन आपल्या नातेवाईकांशी, गुरुजनांशी आणि मित्रांशी युद्ध करायचे म्हणून मनातून विचलित झाला. त्याने आपले धनुष्य खाली ठेवले आणि युद्ध करणार नाही, असे सांगितले.
त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे उपदेश दिले आणि त्याला धर्मयुद्धासाठी प्रवृत्त केले.
श्रीकृष्णाने दिलेली मुख्य कारणे:
1. अर्जुन क्षत्रिय होता: क्षत्रियाचे कर्तव्य म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणे. युद्ध टाळणे म्हणजे स्वधर्माचा त्याग करणे होईल, जे त्याला पापमय करेल
2. आत्मा अमर आहे: शरीर नश्वर आहे, आत्मा कधीही मरत नाही. त्यामुळे कोणालाही मारण्याच्या भीतीत अडकण्याची गरज नाही.
3. धर्मयुद्ध अपरिहार्य आहे: अधर्माचा नाश करणे आणि धर्माची स्थापना करणे हे भगवंताचे कार्य आहे.
4. निष्काम कर्म: अर्जुनाला हे सांगण्यात आले की, त्याने हे युद्ध स्वतःसाठी नव्हे, तर धर्माच्या रक्षणासाठी लढले पाहिजे
5. कायरपणा नको: युद्ध सोडणे म्हणजे कर्तव्याचा त्याग करणे. तसे केल्यास अर्जुनाला अपयश आणि लज्जेला सामोरे जावे लागेल.
३. श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले?
*श्रीकृष्णाने आत्मा नित्य, अविनाशी आणि शाश्वत आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणे दिली.*
१) वस्त्रपरिधानाचे उदाहरण (गीता – अध्याय २, श्लोक २२)
"वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यानि संयाति नवानि देही॥"
अर्थ:
जसे मनुष्य जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.
२) शस्त्र, अग्नी, पाणी आणि वारा आत्म्याला नुकसान करू शकत नाहीत (गीता – अध्याय २, श्लोक २३)
"नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः॥"
अर्थ:
आत्म्याला कोणतेही शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. तो अविनाशी आहे.
३) आत्मा अजन्मा आणि अमर आहे (गीता – अध्याय २, श्लोक २०)
"न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूयः।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे॥"
अर्थ:
आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि मरत नाही. तो सदैव आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि तो कधीही नष्ट होत नाही. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही.
निष्कर्ष:
श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की, आत्मा हा अमर, नित्य आणि अविनाशी आहे. त्यामुळे शरीराच्या नाशाने चिंता करण्याची गरज नाही. युद्ध हे धर्मासाठी आवश्यक आहे, म्हणून अर्जुनाने त्याच्या कर्तव्याला विसरू नये आणि कर्मयोगाचा स्वीकार करून धर्मयुद्धात सहभागी व्हावे.
Ans.3. राजेश्वरी कोंडावार ताई लिहितात...
*१)_ ३ ऱ्या अध्यायाच्या सुरवातीला अर्जुन भगवंताला प्रश्न करतो की जर बुद्धि योग कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तू मला हे युद्धासारखे भयंकर कर्म करण्यास का सांगत आहे?*
*तेव्हा भगवंत त्याला बुद्धियोगा इतकाच कर्मयोग सुद्धा महत्वाचा असतो हे समजावून सांगितले.*
*भक्तिपूर्ण ,आसक्ती रहित,समर्पित कर्म सर्वश्रेष्ठ असते.माणूस कर्म केल्याविना जगू शकत नाही.देहासाठी त्याला कर्म करावेच लागते.स्वधर्माला अनुसरून ,मन आणि इन्द्रियांचे नियमन करून जे कर्म घडते त्यालाच कर्मयोग म्हणतात.*
*२)_कर्म असे करावे की इतरांनी त्या व्यक्तीचे अनुकरण करावे.जेव्हा पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन,कर्माचे फल ईश्वराला अर्पण करून ,फळाची आसक्ती सोडून कर्म घडते तेव्हा ते कर्म करूनही न केल्यासारखे च होते.म्हणून अर्जुना,या युद्ध करण्यामुळे तुला पाप प्राप्त होईल हा विचार सोडून दे.हे कर्माचे फळ तू मला अर्पण कर आणि युद्धाला सामोरा जा.युद्ध कर.*
*३)_ श्लोक ३८ आणि ३९ मधे शुद्ध आत्मा किंवा शुद्ध ज्ञान नित्य आणि अविनाशी असते परंतु झाकले गेले असते हे सांगितले आहे.*
*पहिलं उदाहरण अग्नीचं,दुसरं आरशाचं आणि तिसरं गर्भाचं दिलं आहे.*
*धुरामुळे अग्नी आच्छादित होतो दृष्टीला सर्वप्रथम धूर दिसतो ,परंतु त्यामुळेच अग्नीचे अस्तित्व लक्षात येते.तसेच आरशावर धुळ साठली तरी आरसा स्वच्छ करता येतो आणि गर्भाला जरी वारेचे वेष्टन असले तरी त्यातच गर्भाचे अस्तित्व असते.*
*तसेच शुद्ध ज्ञान किंवा शुद्ध आत्म्यावर मायेचे किंवा प्रकृति चे आवरण असल्याने त्याचे सहजी दर्शन होत नाही.हा आत्मा नित्य व अविनाशी असतो.*
Ans 4. माधुरी आपटे....
प्रश्न. कर्म योग म्हणजे काय?
उत्तर. कर्म योग म्हणजे समर्पित कर्मा चा योग. श्रीकृष्णाने दुसर्या अध्यायात अर्जुनाला समजावले कि प्रत्येक मनुष्याला कर्म करावेच लागते. प्रत्येक कर्म मनातून निर्माण झालेल्या इच्छेप्रमाणे घडते तेव्हां अनावश्यक गोष्टी मनातून काढून टाक. मनाला व इन्द्रियांना ताब्या ठेवता आले पाहिजे त्याज बरोबर कर्माला मध्ये आसक्ती ठेवू नकोस आणि समत्व बुद्धी ने युद्ध कर. त्याच बरोबर स्थितप्रज्ञा चि लक्षणे सांगून मनुष्याला मनःशांती लाभून ब्रह्म स्थिती कशी प्राप्त करु
शकतो हे पण सांगितले.
कर्म योग आणि ज्ञान योग या मधे कर्मयोग श्रेष्ठ आहे त्यामुळे निश्र्ययात्मिका बुद्धी ठेवून युद्ध कर असे ही सांगितले.
अर्जुन श्रीकृष्णा चा सखा असल्यामुळे त्याच्या मनात उत्पन्न झालेले प्रश्र्न तो श्रीकृष्णाला निर्धास्तपणे विचारु शकतो म्हणून तिसर्या अध्यायाचा सुरवात अर्जुनाने प्रश्र्न विचारुन केली. त्यानी विचारले कि तु मला पहिले युद्ध हे तुझे कर्तव्य आहे असे सांगितले आणि नंतर ज्ञान योग कर्म योगा हून श्रेष्ठ आहे असेही सांगितले त्यामूळे माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे कि तु मला ज्ञान योग श्रेष्ठ असून ही युद्ध करण्यास का प्रवृत्त करत आहेस. मला स्पष्ट सांगित कि मी काय करावे ?
या प्रश्र्न ाच्या उत्तरा करता भगवंतांनी कर्म योग सांगितला.
श्रीकृष्णाने तिसर्या (लोकेस्मिन द्वीवीधा नीष्ठा____कर्म योग्य योगीनां) या श्र्लोकात सांगितले कि मी आधी पण तुला दोन्ही प्रकारच्या नीष्ठा सांगितल्या आहेत त्या पैकी ज्ञानी लोकांची नीष्ठा ही ज्ञान योग आणि योग्याची नीष्ठा ही कर्म योग आहे. चौथ्या श्र्लोकात (न कर्मणा_ _समधी गच्छती)भगवंत सांगतात तुम्हाला जर परमेश्वरा पर्यंत पोहचायचे असेल तर तुम्हाला कर्म करावेच लागेल. जसे आपल्याला शेतात पिकवलेले धान्य हवे असल्यास कापणी करावीच लागेल. नंतरच्या श्र्लोकात (नहीकश्र्चित क्षण_ _सर्वःप्रकृतिर्जैगुणै) भगवंत सांगतात मनुष्य प्रत्येक क्षण कर्म करतच असतो नुसता बसून असला तरी श्रीवास्तव तरी घेत असतोच बसण्याचे कर्म करतो अशी अनेक कर्मे तो करतच असतो. मनुष्य सत्व ,रज आणि तम हे तीनही गुण घेऊन जन्माला येतो आणि तीनही गुणांचा सान्निध्यात तो कर्म केल्या शिवाय राहु शकत नाही. 6व्या श्र्लोकात भगवंत सांगतात कि जो मनुष्य बलपूर्वक इन्द्रियांना रोखून कर्माचा त्याग करतो तो मूढात्मा आहे कारण त्याचे मन कर्मात अडकलेले असते. सातव्या श्र्लोकात भगवंत सांगतात तू मनापासून इन्द्रियांना कर्मा पासून दूर केलेस अर्थात आसक्ती शिवाय कर्म केलेस तर तुला परमेश्वर प्राप्ती होईल. या पूढे भगवंत सांगतात कि मनुष्याने नियत कर्म करावीत कर्म न करण्या पेक्षा कर्म करणे केव्हाही चांगले. मनुष्याने यज्ज्ञार्थ कर्म करावीत इथेच गीता यज्ञकर्म म्हणजे काय हे शिकवते. यज्ञ म्हणजे इदं न मम म्हणजे माझे या कर्मात काही कर्तुत्व नाही कर्ता करविता परमेश्र्वर आहे. अशी भावना असल्याने कर्म बंधन रहात नाही, अहंकार नाहीसा होतो.
अशा रीतीने कर्म करता करता मनुष्य कर्म योगी होतो आणि हळूहळू ज्ञान योग ही साधू शकतो.
भगवंत पूढे सांगतात (नमेपार्थास्ति _ _वर्त एवच कर्मणि ) मला या तीनही लोकांत काही कर्तव्य नाही तरीही मी कर्म करत असतो कारण श्रेष्ठ लोकांना बघून इतर त्यांचे अनुकरण करत असतात.
हे सर्व ऐकल्यावर अर्जुन पून्हा विचारतो मनुष्य स्वतः ची इच्छा नसताना ही पापाचे आचरण का करतो? तेव्हा भगवंत सांगतात काम आणि क्रोध हे माणसाचे शत्रू आहेत ते माणसाला ज्ञाना पासून दूर ठेवतात इन्द्रियामन बुद्धी ही त्यांची निवास स्थाने आहेत. जो मनुष्य यांच्या वर ताबा मिळवू शकेल तो काम क्रोधा वर ताबा मिळवेल. स्वकर्म स्व कर्तव्य नियत आणि विहीत कर्म करणारा कर्म योगी श्रेष्ठ आहे.
प्रश्न 2.श्रीकृष्णा ने अर्जुनाला युद्धा साठी का प्रवृत्त केले?
उत्तर. श्रीकृष्णा ने अर्जुनाला युद्धा साठी प्रवृत्त केले कारण
1.कौरव अधर्मी होते आणि कृष्णाला धर्म राज्य स्थापन करायचे होते.
2. अर्जुन स्वधर्म विसरला होता त्याला स्वधर्माचि आठवण करून द्यायची होती.
3. द्रौपदी ला श्रीकृष्ण बहीण मानत होता आणि तिचा भर सभेत अपमान झाला होता.
4. श्रीकृष्ण ने युद्धा आधी दोन्ही पक्षात समेट व्हावी यासाठी प्रयत्न केला होता पण दुर्योधनाने 5 गावे देण्यास ही नकार दिला आणि उलट श्रीकृष्णा ला बंदी करण्याचा प्रयत्न केला.
या सर्व कारणांमुळे श्रीकृष्णा ने अर्जुनाला युद्धा साठी प्रवृत्त केले.
प्रश्न ३.चे उत्तर ---श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणाने सांगितले?
उत्तर. श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे 2र्या अध्यायाच्या श्र्लोक क्रमांक 17ते25पर्यंत सांगितले. भगवंत म्हणतात आत्म्याला तु अविनाशी समज ती नित्य स्वरूप आहे ती कधी ही नष्ट होणार नाही हे समजून तु युद्ध कर. ही अविनाशी आत्मा ज्या शरिरात आहे ते शरिर कधी ना कधी संपणार आहे. मनुष्य या आत्म्याला मरणारा किंवा मारणारा समजतोपण आत्मा मारत नाही किंवा मारत ही नाही. आत्मा नित्य , शाश्वत आणि पुरातन आहे. शरीर मेले तरीही आत्मा मरत नाही ज्या प्रकारे मनुष्य वस्त्रे बदलतो त्या प्रमाणे आत्मा शरीर बदलते. आत्मा न शस्त्राने कापली जाऊ शकते न आग तीला जाळू शकते नाही भिजवून शकते किंवा वायू वाळवून शकते. आत्मा शाश्वत, सर्वव्यापी, अविकारी आणि अविनाशी आहे.
Ans. 5. शरयू क्षीरसागर यांचे उत्तर..
A,,,,,ऊत्तर ,,,,सर्व काही भगवंताचे आहेअसेसमजून यशापयशात समभाव ठेवून कोणतेही कर्म आसक्ती ईच्छासोडूनकरने ही भगवंताची अज्ञा आहे ,त्यासाठीच आहेत ,अशी समर्पन भावना असणे (अध्याय 2 श्लोक 48 ,अ 5 श्लोक 10)
तसेच,श्रद्धा भक्तीपूर्वक मन वाणी ,शरीराने सर्वसी भगवंतालाशरण जाऊन त्याचेच नाम,गुण,लिला सगुण स्वरुपाचे अंखड चितन करणे म्हणजे ,कर्म योग,होय अर्थात, प्रपंचात राहूनही प्रपंच करणे सर्व काही भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही अशी
दृढ श्रद्धा म्हणजे कर्म योग
B,,,ऊत्तर ,,,,श्रीकृष्ण, अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतात कारण
1,,,शास्रविहीत कर्तव्य कर्म करणे हेश्रेष्ठ आहे ,तुक्षत्रीय आहेस युद्ध करणे हे कर्तव्य आहे ,
2,,,दृष्ट प्रवृत्तीचा नाश करणे
3,,,भगवंताची आज्ञेनुसार करणे योग्य आहे
4,,,जय पराजय,फायदा,तोटा आणि सुखदुःख समान मानूनच युद्धाला तयार हो,तुला पाप लागणार नाही म्हणुन युद्ध कर (अध्याय 2श्लोक 38)
C,,,ऊत्तर ,,,,श्रीकृष्ण, आत्मा नित्यवअविनाशी आहे स्पष्ट करताना मानवी जीवनाचे ऊदाहरण देतात ,बाल्य, तरूण वृद्धत्व या अवस्था आहेत मनुष्य मृत्यू पावतो त्यावेळी शरीर मृत होत ,आत्मा हा अविनाशी आहे तो दुसर्या शरीरात प्रवेश करतात अमर आहे
अध्याय 2 श्लोक23 ,,,,नैनं,,,,,,
छिन्दन्ति शस्त्रानी
आत्म्यांला शस्त्र ने कापता येत नाही विस्तव जाळू शकत नाही ,पाणी भिजवू शकत नाही ,आणि वारा वाळवू शकत नाही
Ans. 6. अरुषा एरंडे ताई लिहितात....
अध्याय ३ कर्मयोग (भगवद्गीता)
१. कर्म योग म्हणजे काय?
भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कर्मयोग म्हणजे निष्काम कर्माची साधना जसे निस्वार्थपणे , फलाची अपेक्षा न करता, ईश्वरारपण बुद्धीने केलेले कर्म आहे .श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे महत्त्व सांगतात. कोणताही मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या प्रकृतीनुसार कर्म करावे लागते. मनुष्याने निष्काम कर्म करावे म्हणजे कर्म करताना त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नये. कर्म स्वतःचे कर्तव्य म्हणून करावे.
मनुष्याने आपले कर्म यज्ञभावनेने करावे. संपूर्ण विश्व यज्ञाच्या नियमाने चालते. यज्ञ म्हणजे परस्पर साहाय्य म्हणजेच देव आणि मनुष्य एकमेकांना मदत करून उन्नती साधतात. ज्ञानी पुरुष (योगी) समाजाच्या हिताचा विचार करतो व त्यासाठी झटतो, कर्तव्यनिष्ठ राहतो आणि इतरांना योग्य मार्ग दाखवतो. त्याचप्रमाणे मनुष्याने ज्ञानी पुरुषाचा आदर्श अनुसरावा. दुसऱ्याच्या धर्मापेक्षा स्वतःचा स्वधर्म श्रेष्ठ असतो, जरी तो अपूर्ण वाटला तरी. म्हणून मनुष्याने स्वधर्माचे पालन करावे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याच्या फळावर तुझा हक्क नाही. त्यामुळे कर्माच्या फळाची अपेक्षा करू नकोस आणि कर्म करण्यासही कंटाळू नकोस. अशा प्रकारे कर्मयोगाचा संदेश अतिशय मार्मिक शब्दात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिला आहे जसे की कर्म करत राहणे हेच योग्य आहे. निस्वार्थ भावनेने कार्य करणे ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. कर्तव्यपालन हे मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक आहे. कर्मयोग म्हणजेच जीवनाचा योग्य मार्ग, जो कर्तव्यपरायणतेच्या आधारे आत्मविकास घडवतो.
विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे मराठी रूपांतर "गीताई" या ग्रंथात केले आहे. त्यांनी गीताईमध्ये कर्मयोगावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या मते, कर्मयोग हा जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग आहे. विनोबा भावे सांगतात की, आपण कर्म करताना त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नये. कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे, त्याचे फळ देणे हे ईश्वराचे काम आहे. माणसाने आपले कर्तव्य मनापासून करावे आणि त्यातून समाजसेवा व परमार्थ साधावा.कर्म करताना अहंकार न ठेवता, ईश्वरारपण भाव ठेवून काम करावे. कर्मयोग म्हणजे शिस्तबद्ध आणि साध्या जीवनशैलीत कार्यरत राहणे. विनोबा भावे यांच्या विचारांनुसार, स्वावलंबी होऊन समाजासाठी सेवा करणे हेच खरे कर्मयोग होय. कर्मयोग हे फक्त शारीरिक श्रम नव्हे, तर मानसिक समर्पण आणि निरपेक्ष सेवाभाव आहे. विनोबा भावे यांनी गीताईतून कर्मयोगाचा सुलभ आणि स्पष्ट अर्थ समजावून सांगितला आहे, जो आजही प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करणारा आहे.
२. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी का प्रवृत्त केले?
महाभारतातील कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन मोह आणि संकोचामुळे युद्ध करण्यास नकार देतो. त्याला आपल्या नातलगांविरुद्ध युद्ध करणे पाप वाटते. यावर श्रीकृष्ण त्याला कर्मयोग शिकवतात आणि युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य आहे, असे समजावतात. श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याच्या संकोचावर विजय मिळविण्यास सहाय्य केले जसे की अर्जुनाच्या मनात मोह, ममता आणि कर्तव्य ह्यांचा गोंधळ निर्माण झाला होता. त्याला वाटले की, युद्ध केल्याने तो आपल्या कुटुंबाचा आणि गुरुजनांचा संहार करेल. श्रीकृष्णाने त्याला सांगितले की, हा मोह त्याच्या क्षत्रिय धर्माला साजेसा नाही. श्रीकृष्णांनी कर्मयोग आणि कर्तव्यनिष्ठा ह्यांचा परस्पर संबंध अर्जुनास सांगितला. युद्ध म्हणजे त्याचे स्वधर्म (कर्तव्य) आहे. अर्जुन क्षत्रिय असल्याने युद्ध करणे हेच त्याचे कर्तव्य आहे. त्याने निष्काम कर्मयोगाचा अवलंब करावा .त्याने फळाची चिंता न करता कर्तव्य करणे योग्य आहे.अर्जुनाने कर्तव्य टाळणे योग्य नाही कारण कर्तव्यापासून पळ काढणे हा अधर्म आहे.अर्जुनाने लोककल्याण आणि धर्मरक्षणासाठी युद्ध करणे गरजेचे आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावले की, जर त्याने युद्ध टाळले, तर अधर्म वाढेल आणि समाजातील संतुलन बिघडेल. स्वतःच्या धर्मात (कर्तव्यात) मरण आले तरी ते चांगले; परधर्म भयावह आहे. अर्जुनाचे युद्ध करणे म्हणजे ईश्वरी नियमानुसार कर्तव्य पार पाडणे.फळाचा विचार न करता कर्तव्य बजावणे हेच कर्मयोग आहे. अधर्म नष्ट करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी युद्ध करणे आवश्यक आहे. अशा तऱ्हेने श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे अर्जुनाला कर्तव्याचा बोध होतो आणि तो युद्ध करण्यास सिद्ध होतो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी "श्रीमद्भगवद्गीता - गीता रहस्य" या ग्रंथात भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान विषद केले आहे. त्यांनी कर्मयोगाला महत्त्व देत गीतेचा एक क्रांतिकारी अर्थ सांगितला. कर्मयोग हा गीतेचा मूळ संदेश तर टिळकांच्या मते भगवद्गीतेचा मुख्य संदेश हा निष्काम कर्मयोग आहे. म्हणजेच फळाची अपेक्षा न करता, आपले कर्तव्य करत राहणे. टिळक म्हणतात की, भगवद्गीतेचा अर्थ संन्यास किंवा वैराग्य घेणे असा नाही. समाजात राहून कर्तव्य करणे हेच खरे धर्माचे पालन आहे. टिळकांनी गीतेचा उपयोग स्वातंत्र्यलढ्यात केला. त्यांच्या मते, गीता फक्त आध्यात्मिक नाही, तर ती राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारी आहे.
टिळक सांगतात की, गीतेत सांगितलेला युद्धाचा अर्थ केवळ शस्त्रयुद्ध नाही, तर तो अन्याय, अधर्म, आणि दुष्ट शक्तींविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. टिळकांनी ‘गीता रहस्य’मध्ये हे अधोरेखित केले की, भगवद्गीता कर्मप्रधान जीवनाचा संदेश देते. त्यामध्ये निष्क्रियतेपेक्षा सक्रियतेवर भर दिला आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करून त्याला धर्मसंस्थापनेसाठी उभे राहण्याचा आदेश दिला. लोकमान्य टिळकांनी ‘गीता रहस्य’मध्ये हेच सांगितले की, निष्क्रिय होणे किंवा संन्यास घेणे हा गीतेचा संदेश नसून, समाजात राहून कर्मयोगाचा अवलंब करणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे हेच खरे जीवनाचे ध्येय आहे.
३. श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणा द्वारे स्पष्ट केले?
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मा नित्य, अविनाशी आणि शाश्वत आहे हे पटवून देण्यासाठी विविध उदाहरणे देतात. कपड्याच्या उदाहरणाने ते आत्म्याचे स्वरूप सांगतात जसे एखादा मनुष्य जुने कपडे टाकून नवे कपडे परिधान करतो, तसेच आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या नवीन शरीरात जातो. आत्मा कधीही नष्ट होत नाही, फक्त शरीर बदलतो. शस्त्र, अग्नी, पाणी आणि वारा आत्म्याला प्रभावित करू शकत नाहीत. आत्म्याला कोणतेही शस्त्र तोडू शकत नाही.आत्मा अग्नीने जळत नाही. पाणी त्याला भिजवू शकत नाही. वारा त्याला वाळवू शकत नाही. यातून हे स्पष्ट होते की आत्मा नित्य, अविनाशी आणि अपरिवर्तनीय आहे. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आत्मा आहे जसे आत्मा जन्माला येत नाही आणि मरत नाही. शरीराचा नाश झाला तरी आत्मा अमर राहतो.श्रीकृष्णाचा आत्म्याविषयी संदेश असा आहे की आत्मा कधीही मरत नाही, तो अमर आहे.शरीर नष्ट होते, पण आत्मा नित्य असतो.कपड्यांप्रमाणे शरीर बदलले जाते, पण आत्मा शाश्वत राहतो. आत्म्याला कोणतेही भौतिक तत्त्व नष्ट करू शकत नाही. या उदाहरणांद्वारे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतात, कारण शरीर नाशवंत आहे, पण आत्मा अमर आहे.
विनोबा भावे यांनी आत्म्याच्या नित्यत्वाचा विचार "गीताई" ग्रंथात मांडला आहे. विनोबा भावे म्हणतात की, आत्मा म्हणजे सर्वत्र असणारी एक अद्वितीय शक्ती आहे. तो अमर आहे आणि संपूर्ण विश्वात अस्तित्वात आहे. त्यांचा मते शरीर हे आत्म्याचे एक साधन आहे, जे एका टप्प्यावर निरुपयोगी होते आणि आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो.आत्मा अमर आहे, त्यामुळे कर्म करताना माणसाने स्वतःला आत्मरूपात पाहावे आणि अहंकार सोडावा. आत्म्याचे नित्यत्व हे माणसाला मुक्ती आणि शांतीच्या मार्गावर नेते. जो आत्म्याचे सत्य जाणतो, तो जीवनात कशालाही घाबरत नाही.
लोकमान्य टिळकांनी ‘गीता रहस्य’ ग्रंथात आत्म्याच्या नित्यत्वाविषयी विस्तृत विचार मांडले आहेत. टिळक म्हणतात की, जर आत्मा नित्य आणि अमर असेल, तर माणसाने मृत्यूला न घाबरता आपले कर्तव्य करावे.आत्म्याचे अमरत्व हा विचार माणसाला धैर्य आणि आत्मनिर्भरता शिकवतो. त्यामुळेच टिळकांनी हा विचार भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी म्हणून वापरला. आत्म्याचे नित्यत्व हे निष्क्रियतेचा संदेश देत नाही. उलट, हे जाणूनही माणसाने कर्मयोगात राहावे आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार, आत्मा आणि शरीर यांचा भेद समजून घेतला तर जीवनातील मोह, भय आणि आसक्ती दूर होते. श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मा नित्य, अविनाशी आणि अपरिवर्तनीय असल्याचे सांगण्यासाठी कपड्यांचे आणि नैसर्गिक शक्तींचे उदाहरण दिले. विनोबा भावे यांनी आत्म्याचा आध्यात्मिक अर्थ समजावला, तर लोकमान्य टिळकांनी कर्तव्य भावना आणि राष्ट्रसेवा याचाशी त्याची सांगड घातली. गीतेचा हा विचार आजही प्रत्येकाच्या जीवनाला निश्चितच दिशा देतो आणि देत राहील.
Ans 7. मेधा पोफळी ताई लिहितात.....
कर्मयोग, ज्ञानकर्मसंनयासयोग
1.क़र्मयोग म्हणजे काय?
उत्तर निःस्वार्थपण कर्तव्य पार पाडण्याचा मार्ग म्हणजे कर्मयोग. जे लोक श्रध्दाळु बुध्दीने मत्सर टाकुन माझ्या मताप्रमाणे नित्यशः वर्तन करतात.जे दोष दृष्टिरहित होऊन श्रध्दापूर्वक सतत माझ्या मतानुसार चालत असतात हाच कर्मयोग होय
2.श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धास का प्रवृत्त केले?
उत्तर कारण की धर्माची रक्षा करण्यासाठी आणी अधर्माचा नाश करण्यासाठी प्रवृत्त केले म्हणजे धर्माची स्थापना होईल.कौरवांचे अत्याचार आणि अधर्म समाप्त होईल आणि धर्माची पुनःसथापना होईल.
3.श्रीकृषणाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणांनी सांगितले?
उत्तर आत्मा हाआजन्मा शाश्वत आणि अविनाशी आहे.आतमा कधीही मरत नाही आणि मारलाही जाऊ शकत नाही आत्मा हे देहातील तत्व आहे.
1.आतमा सर्वव्यापी आहे
2.आतमा तहान भुक नसलेला आहे.आतमा पाप रहित आहे
3.आतयाला जन्म मरण नाही. तो अविनाशी असल्यामुळे त्याचा नाश कोणीही करु शकत नाही.
4.आतमायाला शस्त्रे तोडु शकत नाही, पाण्याने भिजुही शकत नाही, आणि हवेने सुकु शकत नाही. आत्मा पुरातन आहे .म्हणुन आत्माला नित्य व अविनाशी म्हटले आहे.
Ans.8. ज्योती साठे ताई......
🙏🙏
प्रश्न क्र. 1 कर्म योग म्हणजे काय❓
उत्तर: एक उत्तम रहस्यमय व गुप्त ठेवण्या जोगा असा हा अविनाशी हा कर्म योग जो भगवंतांनी प्रथम सुर्याला सांगीतला सूर्याने आपला पुत्र मनु याला सागींतला मनुने त्याचा पुत्र इक्ष्वाकु याला सांगीतला व नंतर भगवंतांनी त्यांचा ट्रीय सखा व भक्त अर्जुन यांस सांगीतला अध्याय क्र. 4मध्ये भगवंतांनी कर्मयोग व त्याचा प्रभाव सांगीतला आहे
प्रश्न क्र. 2 श्री कृष्णाने अर्जुनाला युध्दा साठी का प्रवृत्त केले
उत्तर:भगवंत म्हणतात हे अर्जुना युध्द करणे हे तुझे कर्म आहे क्षत्रियांचा धर्म युध्द करणे आहे कारण तुला हे कर्म करावे लागेल तु जर युध्द केले नाही तर लोक तुझी निंदा करतील तुझी अपकीर्ती सांगतील तर तु तुझे कर्म कर
प्रश्न क्र. 3: श्री कृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणा द्वारे स्पष्ट केले
उत्तर: आत्म्याला कोणी मारु शकत नाही कोणी जाळु शकत नाही वारा वाळवु शकत नाही कोणते शस्त्र कापु शकत नाही कारण तो नित्य व अविनाशी आहे ज्या प्रमाणे माणूस जुने वस्त्र टाकून दुसरे नवे वस्त्र घेतो तसाच आत्मा हा जुने शरीर टाकून नवीन शरीरात प्रवेश करतो श्लोक क्रमांक 22 अध्याय 2
Ans 9. भारती शेटे ताई. .......
*प्रश्न आमचा उत्तर तुमचे*
१. कर्म योग म्हणजे काय?
फळाचा आणि आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे केवळ भगवंतासाठी समत्व बुद्धीने कर्म करीत राहणे म्हणजे निष्काम कर्मयोग, कर्मयोग म्हणजे कर्म तर करायचं आहेच पण त्या कर्मा बद्दल आपल्याला स्वतःला अपेक्षित अशी कोणतीही फळाची इच्छा ठेवायची नाही म्हणजेच काय तर 2-47 मध्ये दिल्याप्रमाणे "कर्मण्येयवाधिकारअसते मा फलेशू कदाचन | मा कर्म फल हेतुर्भुर्मा ते संगो $ स त्व कर्मणि|| तसेच हे कर्म केल्याने ही गोष्ट, जसे आपण म्हणतो की, "मी शिक्षण घेतलं तर मला उत्तम नोकरी मिळेल" हा विचार चुकीचा आहे. मी शिक्षण घेतलं, माझं जीवन सुधारण्यासाठी, त्याचा उद्देश नोकरीच मिळाली पाहिजे हा चुकीचा आहे. शेवटी सर्व कर्म ही भगवंताला अर्पण करूनच केली पाहिजेत. आपले शिक्षण हे भगवंताला अर्पण करावे म्हणजेच तो कर्मयोग होईल. कोणतेही कर्म करताना त्या कर्माबद्दल कर्मापासून निर्माण होणारे पाप पुण्य सुख दुःख या गोष्टींचा विचार करू नये. कर्म योग्य की अयोग्य, फक्त या गोष्टीचा विचार करून भगवंताला स्मरून ते कर्म करत राहावे म्हणजे कर्मयोग आपोआपच साधल्या जातो
२. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी का प्रवृत्त केले?
माणसाचा फक्त कर्मावरच अधिकार आहे जरी एखादी व्यक्ती म्हणाली की मी कोणत्याही कर्म करत नाही तरीसुद्धा देहाच्या चलनवलनासाठी त्याला कर्मही करावेच लागतात. खाणे पिणे, शरीराच्या प्राथमिक क्रिया यामध्येही कर्म आपोआपच होतात पण नुसते एवढेच कर्म केले तर तो मनुष्य पापीच म्हटला जातो कारण हा देह काहीतरी कारणासाठीच व्यक्तीला मिळालेला आहे. म्हणून ठराविक, ठरलेले कर्म करणे ही मनुष्याची इच्छा असली पाहिजे. पापा पासून मुक्त होण्यासाठी आपल्याला नियोजित कर्मच पार पाडले पाहिजे. तिसरे अध्यायात 14 व 15 या श्लोकामध्ये म्हटले आहे की अन्नापासून प्राणी उत्पन्न होतो अन्न निर्मिती पावसापासून होते पाऊस येण्यामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडते कर्म समुदाय वेदापासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहेत असे समजले तरी सर्वव्यापी परमात्मा हा नेहमीच यज्ञात प्रवेशित असतो या परंपरेने जो मनुष्य वागत नाही तो निश्चितच पापी असला पाहिजे म्हणूनच आत्म्यास तृप्त राहण्यासाठी या विश्वात कर्म करणे हेच श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ पुरुषांचे आचरणच इतर लोकही करतात त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो त्यासाठी आपण सर्व कर्म करत राहिले पाहिजे. क्षत्रिय असल्यामुळे तुझे महत्त्वाचे कर्म हे युद्ध ठरते म्हणून तू युद्धआला तयार हो. नातेवाईक गुरुजन यांचा जो मोह तू करत आहेस तो क्षणायक आहे. मोह, माया ममता या सर्व सोडून द्यायच्या आहेत आणि प्राप्तव्य कर्म भगवंताला स्मरून त्याला अर्पण करून करावयाचे आहे सध्या युद्धभूमीवर तू उभा असल्याने युद्ध करणे हेच तुझे प्राप्तव्य कर्म आहे नाहीतर हेच तुझे नातेवाईक तुला घालून पाडून बोलतील लज्जास्पद बोलतील आणि तुला तोंड लपवायला जागा राहणार नाही थोडक्यात पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेही सांगतात की, परित्राणाय साधून विनाशायत दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे म्हणजेच तुझे आणि माझे मागे किती एक जन्म होऊन गेले आहेत पण आता सध्या दुर्योधन आणि दुःशासन यांनी केलेले अत्याचार हे खूप वाढले आहेत आणि या अत्याचाराला तोंड देण्यासाठी त्यांचा त्या दुष्टांचा निऱदलान करण्यासाठी आपण येथे उभे आहोत आणि त्यांना, त्यांच्याशी युद्ध करून मारणे आवश्यक आहे म्हणून तो युद्धाला तयार हो
३. श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणा द्वारे स्पष्ट केले?
दोन बावीस ते दोन 24 या तीन श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आत्मा अमर नित्य आणि अविनाशी आहे हे समजावून सांगितले आहे कसे ते थोडक्यात पुढील प्रमाणे,
ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने जीर्ण झालेले कपडे वस्त्र फेकून देतो त्याप्रमाणे आत्मा सुद्धा आपले शरीर जुने म्हणजे अकार्यक्षम झाले म्हणजे वृद्ध झाले जर्जर झाले की हे शरीर सोडून जातो आत्मा अमर आहे फक्त तो हे शरीर बदलत असतो हे सांगताना ते पुढे सांगतात की आत्मा वाऱ्याने वाहून नेल्या जात नाही अग्नीने जळत नाही शस्त्राने तुटत नाही. जशा मानवाच्या बालपण तारुण्य आणि वृद्ध या अवस्था आहेत व्यक्ति मात्र तीच राहते.
या उदाहरणाद्वारे श्रीकृष्णांनी आत्मा नित्य व अविनाशी आहे हे स्पष्ट केले आहे
Ans 10. राजस बंगाळे ताई लिहितात....
प्रश्न 1= कर्म योग म्हणजे काय? उत्तर कर्म योग म्हणजे कृतीचा योग, किंवा कर्माचा योग.कर्म योग म्हणजे समर्पित कर्माचा योग.कर्मयोगाचे सार म्हणजे परिणामांपासून अलिप्त राहून कर्तव्य पार पाडणे.कर्मयोग हे योगाच्या चार शाळांपैकी एक आहे.कर्मयोग म्हणजे कोणतेही कर्म करण्याचा मार्ग किंवा पध्दती. कर्मयोग म्हणजे दैनंदिन कार्ये पूर्ण समर्पणाने पार पाडण्याचा सराव.कर्मयोग म्हणजे वैयक्तिक फायद्यावर लक्ष न देता कार्य करणे म्हणजेच अध्याय 2 मधील श्लोक 47 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भूः.मा ते संगोस्त्वकर्मणि.आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफळावर तुझा अधिकार नाही.आपल्या कर्मफळास तू कारणीभूत आहेस असे तू कधीही समजू नकोस. आणि आपले कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस.निष्कर्म हे पापमय आहे.यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी कर्मयोग होता.यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून युद्ध कर असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो तो अर्जुनासाठी कर्मयोग.श्रकृष्णाने अर्जुनाला तू युद्ध कर म्हणजेच तू तुझे कर्म कर हाच अर्जुनासाठी कर्मयोग.योग म्हणजे कौशल्य.कर्मयोग म्हणजेच सर्व कर्मातील कौशल्य.कर्मयोग.
प्रश्न 2= श्रीकृष्णाने अर्जुनाला युध्दासाठी प्रवृत्त का केले? उत्तर अर्जुन हा क्षत्रिय होता.क्षत्रियाचे कर्तव्य अधर्माविरुध्द लढणे.अन्याया विरुद्ध लढणे.आणि येथे धडधडीत पांडवांवर अन्याय होत असूनही अर्जुन युद्ध करायला तयार होत नाही,हे युद्ध टाळणे म्हणजेच स्वधर्माचा त्याग करण्यासारखे होईल आणि हे युद्ध न करणे म्हणजे अर्जुनाला पापमय होईल. आत्मा हा अमर आहे, त्याला ना जन्म ,ना मृत्यू.असे असताना युध्दात कोणाला मारण्याच्या भितीत अडकणे हे योग्य नाही. अधर्माविरुध्द लढणे हे क्षत्रियाचे प्रथम कर्तव्य आहे..,असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात.श्रीकृष्ण म्हणतात हे युद्ध तू स्वतः साठी नाही तर धर्मासाठी करीत आहेस.अधर्माचा नाश करण्यासाठी हे अर्जुना तू हे युद्ध करीत आहेस.अर्जुना,हा भित्रेपणा सोडून दे.युध्द करुन कर्तव्याचे पालन कर.कर्तव्याचे पालन करणे म्हणजेच कर्मयोग.तुझे कर्तव्य पार पाडत, युद्ध कर.सर्वांच्या नजरेत तू अपयशी ठरु नकोस.तू जर युद्ध केले नाही तर अपयश आणि लज्जा यांना सामोरे जावे लागेल. हे अर्जुना, धर्माच्या रक्षणासाठी तू हे धर्मयुद्ध कर. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथात सांगितलेले आहे, निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची आशा न धरता कर्तव्य करीत राहणे. अधर्म, अन्याय आणि दुष्ट शक्तींविरुध्द लढणे म्हणजेच कर्मयोग.आणि हा निष्काम कर्मयोग करण्यास भगवंताने अर्जुनाला सांगितले आहे.अधर्माविरुध्द लढून धर्मसंस्थापना करण्यास श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.अन्यायाविरुध्द लढणे हाच कर्मयोग.
प्रश्न 3 =श्रीकृष्णांनी आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणांनी स्पष्ट केले आहे? उत्तर= आत्मा हा अमर आहे.त्याला ना जन्म,ना मृत्यू. तो अविनाशी आहे.ज्याप्रमाणे आपण जिर्ण वस्त्र टाकून नविन वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे आत्मा जूने शरीर त्याग करून नविन शरीरात प्रवेश करतो.आत्मा हा आजन्म, सनातन, नित्य आहे.शरीराचा नाश झाला तरी आत्मा नाश पावत नाही.पूर्वि एखादा माणूस मरण पावला आणि त्याच वेळेला जर त्याच घरात बाळ जन्माला आले तर लोक म्हणायचे म्हातारा पोटी आला म्हणजेच म्हातार्याच्या आत्म्याने नविन शरीरात प्रवेश केला.आत्म्याचे अविनाशी असल्याची उदाहरणे गीतेंच्या श्लोक 22,23 अध्याय 2 मध्दे दिली आहेत.आत्म्याला कोणतेही शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही तसेच वारा सुकवू शकत नाही.कारण आत्मा हा अविनाशी ,अमर आहे.
Ans. 11. # नाव __मालती मधुकर जोशी
____प्रश्न आमचा उत्तर तुमचे ___
# प्रश्न पहिला__कर्मयोग म्हणजे काय?
# उत्तर __गीता अध्याय दोन व तीन मध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला आहे धृती इती धार येते आत्म्याने जे शरीर धारण केले आहे त्याचे जे कर्म असेल ते करणे म्हणजे मुलाने आई-वडिलांना संभाळणे सेवा करणे पत्नीने पतीची सेवा करणे मुलांचे संगोपन नातलगांची देखभाल करणे आई-वडिलांनी मुलांना सुसंस्कृत बनवून त्यांचे संगोपन करणे क्षत्रियाने युद्ध करणे राज्य करणे प्रजेचा सांभाळ करणे गुरुजींनी विद्यादान करणे अशी वेदाने सांगितलेली शरीर धर्माप्रमाणे वर्णाप्रमाणे जे कर्तव्य असतात ती कोणतीही आसक्ती न ठेवता पार पाडून आत्म्याची परमात्म्याशी जवळीक साधने म्हणजे कर्मयोग जेव्हा निष्काम बुद्धीने कर्म केले जाते तेव्हा मनुष्य स्वतःला कर्माच्या बंधनातून मुक्त करू शकतो कर्मयोगामध्ये नेमलेले कर्तव्य करण्याच्या अधिकार आहे पण कर्मफलाचा अधिकार नाही तरीही कर्तव्य करण्यात नावड कधीही असू नये यश अपयश याची आसक्ती टाकून योगात स्थिर होऊन मनाच्या समतोल पणाने केलेल्या कर्माला योग म्हणतात कृष्ण भावनेला शरण जाऊन निष्काम कर्म करावे भक्तीत रममाण होऊन निष्काम कर्म करणारे कर्मफलाच्या त्याग केल्याने जन्म आणि मृत्यू यांच्या चक्रातून स्वतःला मुक्त करतात निष्काम कर्म करून परमात्म्यात विलीन होणे म्हणजे कर्मयोग ( अध्याय 2 श्लोक 39, 47 ,48, 49 अध्याय 3 श्लोक 4 ,5 ,7, 8) मध्येही कर्मयोगाच्या खुलासा केलेला आहे
# प्रश्न दुसरा ___श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धास का प्रवृत्त केले?
# उत्तर __युद्धासाठी समोर आपलेच भाऊ गुरुजन पितामह श्वसुर उभे पाहून अर्जुन गलित गात्र झाला मी युद्ध करणार नाही असे म्हणू लागला ही गोष्ट एका क्षत्रीयाला शोभणारी नव्हती तथापि अर्जुनाने युद्धाच्या निर्णयाची सर्व जबाबदारी भगवंतांच्या वर टाकली मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्हीच काय ते ठरवा असे त्याने भगवंतांना सांगितले भगवंतांच्या विषयी काय बोलायचे ! ते अर्जुनाला योग्य तेच मार्गदर्शन करणार .भगवान म्हणतात शरीरातील आत्मा शाश्वत आहे तो मारला जात नाही त्यामुळे शोक करू नकोस क्षत्रियांना युद्धापेक्षा अधिक चांगला व्यवसाय नाही प्रयत्न न करता तुला युद्धाची संधी मिळाली आहे त्यामुळे स्वर्गद्वारे तुझ्यासाठी खुली आहे धर्मयुद्ध न केल्याने कर्तव्यात हयगय केल्याचे पाप लागेल योद्धा म्हणून तुझी कीर्ती गमावशील दुष्कीर्ती मरणापेक्षा अधिक वाईट आहे योद्धा म्हणून लौकिक असलेला तू भीतीने रणांगणातून पळालास म्हणून लोक तुला भित्रा म्हणतील तुला तुच्छता आणि उपहासाला सामोरे जावे लागेल यापेक्षा अधिक दुःख कोणते? जय पराजयाची आसक्ती न ठेवता युद्ध कर जिंकलास तर राज्य प्राप्त करशील आणि हरलास तर स्वर्ग प्राप्त करशील निष्पाप होशील स्वतःच्या बुद्धीने कर्म करशील तेव्हा कर्मबंधनातून मुक्त होशील तुला फक्त नेमलेले कर्तव्य करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे कर्मयोगाचे महत्त्व पटवून देऊन भगवंतांनी अर्जुनाला युद्धास प्रवृत्त केले
#प्रश्न 3__कृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले?
# उत्तर __आत्मा नित्य आणि अविनाशी आहे हे सांगताना भगवान म्हणतात मनुष्य जसे कपडे बदलतो तसे आत्मा आपले शरीर बदलतो आत्मा मारणारा किंवा मारला जाणारा नाही आत्म्याला जन्ममृत्यू नाही तो आजन्म, नित्य ,शाश्वत ,पुरातन आहे शरीराचा वध झाला तरी तो मारला जात नाही आत्म्याला शस्त्राने कापता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही ,पाण्याने भिजवता येत नाही, वाऱ्याने सुकवता येत नाही , तो न तुटणारा, न भिजणारा ,न विरघळणारा, न जळणारा ,अक्षय ,सर्वव्यापी ,न बदलणारा ,निश्चल आणि शाश्वत आहे न दिसणारा अकल्पनिय ,अविकारी आहे अशाप्रकारे आत्मा नित्य व अविनाशी आहे हे स्पष्ट केले आहे (गीता अध्याय दोन श्लोक २०, २२, १९ ,२४ ,२३)
ही उत्तरे लिहिताना भगवद्गीता जशीच्या तशी या पुस्तकाचा ,युट्युब आणि google याचा आधार घेतलेला आहे
Ans. 12. माणिक थोरात ताई लिहितात......
प्रश्न १ कर्मयोग म्हणजे काय ?
फलाची अपेक्षा न करता आसक्तिविरहित होऊन परिणामाची चिंता न करता आपले विहित शास्त्रसंमत कर्म करणे व ते कर्म ईश्वराला अर्पण करणे कर्माच्या परिणामाविषयी निःश्चिंत्य असणे यालाच कर्मयोग म्हणतात
तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही (२/४७) भगवंताने अर्जुनाला निष्र्किय न होता कर्मफलेच्छारहितआपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला आहे जो कर्मफलावर असक्त असतो तो आपल्या कर्मास कारणीभूत असतो परिणामी दुःख भोगतो
तुमचे नित्य नैमित्तिक कर्म शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छाविरहित कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते फलाची अपेक्षा ठेऊन केलेले कर्म बंधनकारक ठरते यशापयश हार जीत या दोन्हीमध्ये समभावाने फलाची अपेक्ष न करता आपले कर्म करणे म्हणजेच निःष्काम कर्मयोग होय
२ श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी का प्रवृत्त केले ?
स्वकियांना युद्धभूमीवर पाहून अर्जुन मोहग्रस्त होतो त्याची मनःस्थिति द्विधा होते युद्ध करावे की न करावे अशा संभ्रमात अर्जुन असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अरे ज्यांना युद्धात तुला मारणे अशक्य वाटते ते काय सर्व चिरंजीव राहणार आहेत का? ते सर्व मरणारे अन् तू त्यांना मारणारा हाविचार सोडून दे शरीर हे नाशवंत आहे ते नष्ट होणारच तेव्हा त्या शरीरासाठी शोक करणे हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे पण शरीर जरी नाशीवंत असले तरी आत्मा हा अविनाशी अमर्याद शाश्वत आहे जीवात्मा कधीही मारला जात नाही तेव्हा तू निःशंक होऊन युद्ध करण्यास तयार हो
तसेच अर्जुन हा क्षत्रीय योद्धा आहे युद्ध करणे हा क्षत्रीयाचा स्वधर्म आहे क्षत्रीयाने युद्धापासुन पलायन करणे हे त्याच्या प्रतिष्ठेला हनिकारक आहे त्याने आजवर जो एकशूर योद्धा धनुर्धारी अर्जुन म्हणून जी त्याला मान्यता मिळाली आहे ती युद्ध न करण्याच्या निर्णयाने मातीमोल होईल हेच आप्तस्वकीय भित्रा म्हणून अर्जुनाची अवहेलना करतील एका क्षत्रीयाला त्याची अवहेलना मृत्यूपेक्षाही भयंकर वाटते तेव्हा हा नसता शोक आवर अन् युद्धास तयार हो
३ श्रीकृष्णाने आत्मा नित्य वअविनाशी आहे हे कोणत्या ऊदाहरणाद्वारे स्पष्ट केले
(२/२०)आत्म्याला कोणत्याही काळी जन्म अथवा मृत्यू नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी आत्मा हा अविनाशी असतो शस्त्र त्याला कापू शकत नाही अग्रि त्याला जाळू शकत नाही पाणित्याला भिजऊ शकत नाही वारा त्याला वाळऊ शकत नाही (२/२३)
ज्याप्रमाणे आपण जून्या वस्त्रांचा त्याग करुन नविन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा जून्या शरीराचा त्याग करुन नविन शरीर धारण करतो यालाच आपण जन्म मृत्यू म्हणतो जन्ममृत्यू शरीराशी संबंधीत आहे आत्मा तर अजन्मा अविनाशी आहे जन्मापूर्वी व मृत्यूनंतर तो अव्यक्त असतो व मध्ये तो व्यक्त असतो
Ans. 13. सुभाष कुलकर्णी.......
प्रश्न १ -- कर्म योग म्हणजे काय?
उत्तर -- कर्म योग याचा सरळ सोपा अर्थ काम (कार्य) कर्तव्य. कर्म योग फार जुना योग आहे. तशी कर्माची व्याख्या फार कठीण आहे. कर्म योग समजायला खूप अवघड आहे. मानव प्राणी जन्माला आला की त्याच्या सोबत कर्म आपोआप येते. तेव्हा पासूनच त्याचे कर्म सुरू होते. मूल जन्माला आले कि त्याचे सुध्दा कर्म
सुरु होते जसे कि श्वासोश्वास, डोळ्याची उघडझाप, हात पाय हलविणे, शरिराची हालचाल म्हणजेच हे सुद्धा कर्म होय. ह्या नैसर्गिक कर्माचा त्याच्या शरीराच्या जाणिवेशी सुध्दा संबंध नसतो. अध्याय ३ श्लोक क्रमांक ५ मध्ये भगवंत म्हणतात
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत
कार्ये ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै:
नि:संशय पणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुध्दा काम न करता राहात नाही. प्रकृती पासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे मानुस पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडल्या जातो.
ज्या माणसिक अथवा शारीरिक क्रियेशी मनुष्य आपला संबंध मानतो त्याच सर्व क्रिया कर्म होउन त्याला बांधणाऱ्या होतात, दुसऱ्या क्रिया नव्हे. मानसाची अशी एक समजूत झाली आहे की अपत्य संगोपन तसेच उदरनिर्वाहाची साधने, व्यापार नौकरी अध्यापन इत्यादीलाच कर्म समजतात आणि त्या व्यतिरिक्त खाणे - पिणे, बसणे - उठणे, झोपणे, चिंतन करणे इत्यादीना कर्म माणीत नाहीत. याच कारणाने कित्येक जण व्यापार इत्यादी कर्माचा त्याग करून असे समजतात की मी कर्म करीत नाही परंतु ही त्यांची फार मोठी गैर समजूत आहे. शरीर निर्वाहा संबंधी स्थूल शरीराच्या क्रिया झोप चिंतन इत्यादि, सूक्ष्म शरीराच्या क्रिया आणि समाधी इत्यादि शरिराच्या क्रिया ही सर्व कर्मच आहेत. जो पर्यंत शरिरा विषयी अहंता ममता आहे तोपर्यंत शरिरा कडुन होणाऱ्या सर्व क्रिया कर्मच होतात. कारण शरिर प्रकृतीचे कार्य आहे आणि प्रकृति कधी अक्रिय राहात नाही. म्हणुन शरिरा विषयी अहंता ममता असताना कोणीही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणभर सुध्दा कर्म केल्या शिवाय राहु शकत नाही मग ती अवस्था प्रवृत्तीची असो वा निवृत्तीची.
शरीर वाणी आणि मनाने केलेली क्रिया कर्मच असते.
कर्म दोन प्रकारची असतात. सत्कर्म आणि दुष्कर्म. मानुस त्याच्या प्रकृती व प्रवृत्ती प्रमाने ते तो करतो. वृत्ति पासुन स्वभाव तयार होतो आणि प्रकृति पासुन गुण निर्माण होतात. काळानुसार स्वभावाची व गुणांच्या प्रवृत्तिची उत्पत्ती होउन मानुस त्या नुसार कर्म करतो व भोग भोगतो.
सदंर्भ ग्रंथ -- साधक संजीवनी
प्रश्न २ -- श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी कां प्रवृत्त केले?
उत्तर -- कौरवांनी पांडवावर अन्यायाची पराकाष्ठा केली. द्युतात कपट कारस्थान करुन इंद्रप्रस्थचे राज्य घेतले. १२ वर्ष वनवास व १ वर्ष अज्ञातवास भोगण्यास भाग पाडले.
द्रोपदीची विटंबना केली. वारवानातील लक्षात गृहास आग लावून जिवंत जाळण्याचे कारस्थान केले. तसेच पांडवास राज्यातील ५ गांवे देण्यास नकार दिला. पांडवांशी द्युत खेळताना दुर्योधनाने शर्त ठेवली कि, जर तुम्ही द्युता मध्ये हरले तर तुम्हाला १२ वर्ष वनवास व १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल. तेरा वर्षांनंतर आपल्याला आपले राज्य मिळेल.परंतु अज्ञातवासात जर आम्ही तुम्हाला ओळखले तर तुम्हाला पुन्हा १२ वर्ष वनवास व १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल.द्युताच्या अटी नुसार पांडवांनी १२ वर्षाचा वनवास व १ वर्षाचा अज्ञातवास भोगला. त्या नंतर रितसर पांडवांनी आपल्या राज्याची मागणी केली तेव्हा दुर्योधन म्हणाला मी युध्द केल्या शिवाय सुईच्या टोकावर बसेल इतकीही जमीन देणार नाही. तरीही पांडवांनी वारंवार संधीचा प्रस्ताव मांडला पण दुर्योधनाने त्याचा स्विकार केला नाही. दुर्योधनाला पांडवा बद्दल पराकोटीचा व्देषभाव व मत्सर होता. ही सगळी कारणे युद्ध होण्यास कारणीभूत ठरली. म्हणुन भगवंत अर्जुनाला अध्याय २ श्लोक क्रमांक ३२ मध्ये म्हणतात
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गव्दारमपावृतम
सुखिन: क्षत्रिया: पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्
हे युद्ध तुम्हाला आपोआप प्राप्त झाले आहे आपोआप प्राप्त झालेल्या धर्ममय युद्धात जे क्षत्रिय शूर वीरतेने लढत असता प्राणास मुकतात त्यांच्या साठी स्वर्गाचा दरवाजा खुला असतो. असे धर्ममय युद्ध ज्याला प्राप्त होते ते भाग्यवान असतात. कर्तव्याचे पालन करण्यात जे सुख आहे ते सुख सांसारिक भोगांना भोगण्यात नाही. सांसारिक भोगांचे सुख तर पशू पक्षी यांना ही होते म्हणून कर्तव्य पालनाची संधी मिळाली त्यांना भाग्यवान समजावे.
संदर्भ ग्रंथ -- साधक संजीवनी
प्रश्न ३ -- श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणाने स्पष्ट केले?
उत्तर -- भगवंतानी आत्मा नित्य अविनाशी आहे हे अध्याय २ श्लोक क्रमांक २३ व २४ मध्ये स्पष्ट केले आहे. आत्मा हा जन्म नसलेला नित्य अविनाशी सनातन प्राचीन आहे नाश रहित आहे.
नैनं छिन्दन्ति शस्राणि नैनं दहति पावक:
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:
आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवून शकत नाही.
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च
नित्य: सर्वगत: स्थाणुरचलोऽयं सनातन:
आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि नि: संशय वाळवता न येणारा आहे तसेच आत्मा नित्य सर्व व्यापी अचल स्थिर राहणारा अविनाशी सनातन आहे.
ज्या प्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकुन देउन नवी वस्त्रे परिधान करतो त्याच प्रमाणे जीवात्मा जुने शरिर टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो.
आत्मा अव्यक्त आहे अचिन्त्य आहे आणि विकार रहित आहे असे आत्म्या विषयी भगवंतानी अर्जुनाला स्पष्ट केले.
Ans.14. स्वाती राजापूरकर ताई लिहितात.....
प्रश्न पहिला कर्मयोग म्हणजे काय?
उत्तर:- या प्रश्नाचे उत्तर भगवद्गीते मध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत कर्मयोग म्हणजे काय हे अर्जुनाला सांगतात सांगतात.
कर्म म्हणजे कृती करणे आणि त्याचा योग कृतीचा योग किंवा त्याला कर्माचा मार्ग असे सुद्धा म्हणतात,
कोणतेही कर्म करण्याची पद्धत त्याला कर्मयोग असं म्हटलं आहे कर्मयोग हे दैनंदिन कार्य पूर्ण समर्पणाने शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने पूर्ण करणे कारण कोणताही मनुष्य कोणताही मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्म केल्याशिवाय क्षण मात्र सुद्धा राहू शकत नाही म्हणून ते कर्म परिणामांचा विचार न करता अलिप्त राहून कर्तव्य पार पाडणे कर्मयोगामध्ये धर्मशास्त्रात वेदांमध्ये विहित असलेली कर्म हीच युक्त कर्म असे मानलेले आहे भगवद्गीते मध्ये भगवंत म्हणतात फळाची चिंता न करता आपले कर्तव्य करा यासाठी भगवंत श्लोक सांगतात,
* कर्मण्येवाधिकारस्ते माफलेश कदाचन |मा कर्मफल हेतुर्भुमा हे तुर्भुमी ते संगोसत्व कर्मणी||
भगवंत भगवंत श्रीकृष्ण कर्मयोगासाठी चार सूत्र सांगतात 1) कर्त्याचा अधिकार कर्म करण्या पुरताच मर्यादित आहे म्हणजेच कर्म क्रियमन कर्म जीवाच्या म्हणजे कर्त्याच्या स्वाधीन आहे इतर योनीमध्ये क्रियामान कर्म साधता येत नाही फक्त जीवाला क्रमानकर्माचा अधिकार आहे इतर योनी ज्या आहेत त्या योनीमध्ये आहार, निद्रा ,भय, मैथुन एवढेच कर्म आहे, हे मनुष्याला सुद्धा आहे पण धर्म आणि धर्माने दिलेले ज्ञान सदाचार, स्वस्वरूपाला जाणण्याचे ज्ञान मनुष्याला विशेष रूपाने आहे म्हणून मनु
ष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, इतर प्राण्यांमध्ये कर्माची स्वातंत्रता नाही, इतर प्राणी आहार भयनिद्राम इथून यांच्यात गुंतून राहतात पण त्या पलीकडे फक्त माणसाला जाता येते अगदी गंधर्व यक्ष किन्नर या योनी मे आल्या तरी सुद्धा त्यांचे पुण्य संपले की त्यांना भूतलावर येऊन जन्म घ्यावा लागतो तिथे त्यांना कर्माची स्वतंत्रता नाही कृमी कीटकांचा जन्म मिळाला तर सगळे दुःख भोगून पुन्हा पुढच्या जन्माला जायचे असते मनुष्याचा जन्म असा आहे की जिथे क्रियमान कर्म आपल्या हातात आहे सात्विक क्रियामानकरमा तून आत्म उन्नतीचा ,मोक्षाचा मार्ग असतो.यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात* परी कर्म फळी आस न करावी |आणि कुकर्मी संगती न व्हावी |हे सत क्रियाची आचरावी| हेतूविन|| असे ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले आहे.
2) जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा त्या कर्माच्या फळावर कर्त्याचा अधिकार नसावा कारण केलेल्या कर्माचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळतेच असे नाही कधी जास्त मिळते किंवा कधी कमी सुद्धा मिळू शकते अपेक्षा केली की अपेक्षाभंगाचे दुःख होते म्हणून अपेक्षाच करू नये.
3) कर्म करणाऱ्याच्या मनात कर्माच्या फळाची आसक्ती किंवा इच्छा नसावी कारण कर्म कर्माच्या फळावर एकट्याकर्त्याचा अधिकार कधीही नसतो पाच घटकांनी कर्माची सिद्धी होत असते अधिक अधिष्ठान करता करण प्रयत्न आणि दैव हे ते पाच घटक आहेत त्यामुळे मी करता आहे असे बंधन असणे अज्ञान अविधेचे प्रतीक आहे.
4) कर्मफळाचे असती आणि कर्म फळावर अधिकार या दोन्ही गोष्टी कर्त्याच्या मनात येणे चुकीचे आहे मी कर्मच करणार नाही ही भावना करू नये कर्म करण्यातील कर्त्याची कर्तव्य तत्परता कधीही कमी होऊ देऊ नये
अर्जुनाच्या मनात कर्तव्याभिमानची मलिनता आली होती ती काढण्यासाठी भगवंतांनी कर्मयोग सांगितला आहे निष्काम कर्मयोग करण्यासाठी ज्ञानयुक्त बुद्धीची आवश्यकता आहे ज्ञानयुक्त बुद्धीने केलेला कर्म योग श्रेष्ठ असतो असे भगवंत सांगतात त्याकरता ते 40 व्या श्लोकामध्ये सांगतात*
* नेहाभिक्रमणासोस्ती प्रथयवायोग नविद्याते | स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भयात||*
* निष्काम कर्माचे परमार्थिक फळ मिळते ते कसे तर निष्काम कर्म करायला सुरुवात केली आणि ते मध्ये सोडले तर वाया जात नाही जितके आपल्या हातून घडलेले आहे तेवढ्या कर्माचे फळ आपल्याला मिळते म्हणजेच त्याच्यापासून थोडीफार चित्तशुद्धी होते चित्तशुद्धी हे निष्काम कर्माचे फळ आहे.
* निष्काम कर्मापासून चित्तशुद्धी आणि ज्ञानप्राप्ती असा दुहेरी लाभ होतो त्यातून मोक्षप्राप्ती होते आणि संसाराच्या महा भयापासून साधकाचे रक्षण होते निष्काम कर्म मोक्षाची सिद्धी करून देते म्हणजेच याचाच अर्थ कर्म करावे पण कर्म फळाची अपेक्षा ठेवू नये.
* या श्लोकामध्ये अस्य धर्मस्य हे शब्द महत्त्वाचे आलेले आहेत तर असे म्हणजे निष्काम कर्मयोग रुपी स्वधर्म शास्त्राने सांगितलेले धर्म नीती न्याय या स्वधर्माचारणाने चित्तशुद्धी होते चित्तशुद्धी झाल्यानंतर आत्मा , स्वस्वरूप जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण होते आणि नंतर जीव श्रवण- मननाचा अधिकारी होतो.
* . निष्काम कर्मयोग केल्यामुळे कर्तुत्व अभिमान ,कर्माची आसक्ती ,आणि कर्मफलाची इच्छा हे तिन्ही दोष नाहीसे होतात.
प्रश्न क्रमांक दोन:-
श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी का तयार केले?
उत्तर:- दुसऱ्या अध्यायामध्ये 31 ,32 आणि 33 या श्लोकामध्ये भगवंत श्रीकृष्णाला सांगतात, क्षत्रियाला आपल्या धर्माचे रक्षण करता यायला पाहिजे ,मग क्षत्रियाचं धर्म काय आहे तर युद्धाला भिऊ नकोस, धर्माला अनुसरून असणाऱ्या युद्धा हुन दुसरे कोणतेही चांगले कल्याण कारक कर्तव्य नाही .युद्ध हे समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे आहे दार आहे ,असे हे युद्ध फक्त भाग्यवान क्षत्रियांनाच मिळते आणि तू किती भाग्यवान आहेस की तुला याचा लाभ झालेला आहे आणि जर तू हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. मग क्षत्रिय कोण आहे तर जो पिडा होण्यापासून प्रजेचे रक्षण करतो तो., क्षत्रिय आहे. हे धर्मयुद्ध तू केलेस तर स्वधर्म आणि कीर्ती दोन्हीही प्राप्त होतील. अर्जुनाने युद्ध केले नाही तर तो नरकाला प्राप्त होईल, त्याची कीर्ती आणि नावलौकिक धुळीला मिळेल. म्हणून तू युद्ध कर. युद्धातून पळून जाऊन दुष्कृती प्राप्त होण्यापेक्षा मरण बरे.
सर्व लोक तुझी खूप काळपर्यंत अपकीर्ती सांगत राहतील आणि अपकीर्ती ही सन्माननीय नाव असणाऱ्या पुरुषाला खूप अपमानास्पद असते, मरणाहून सुद्धा दुःखदायक असते आणि जे लोक तुला आदरणीय मानतात त्यांच्या दृष्टीने तू पळपुटा आणि तुच्छ ठरशील, युद्धाला भिऊन युद्धातून काढता पाय घेतला असे चांगले महारथी लोक म्हणतील ,समजतील.शत्रु तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील पुष्कळ से लोग नको, नको वाटेल ते बोलतील याहून अधिक दुःखदायक प्रसंग नाही.
युद्धामध्ये अर्जुन मरणाला घाबरला, युद्धाला घाबरला असे शत्रूला वाटू नये असे भगवंतांना वाटत होते .
युद्धामध्ये झालेली हत्या झालेला संवाद क्षम्य असतो म्हणून अर्जुनाने युद्ध करावे ,छात्र धर्म पाळावा अर्जुन जर युद्धात मारला गेला तर स्वर्गात जाशील आणि युद्धात जिंकला तर पृथ्वीचे राज्य भोगशील . आणि खरं म्हणजे युद्धामध्ये जय पराजय फायदा तोटा आणि सुखदुःख समान मानले पाहिजे ,अशा रीतीने तू जर युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही, असा विचार श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला, म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तयार हो अशी आज्ञा केली.
प्रश्न नंबर तीन:- श्रीकृष्ण आत्मा नित्य आणि अविनाशी हे कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट करतात?
उत्तर:- भगवंत सांगतात आत्मा नित्य आहे याचे उदाहरण देताना 22 व्या श्लोकामध्ये वासांची गिरणी यथाविहाय नवा आणि गृहियाती नरोप राणी तथा शरीराने विहायजेरणा ज्ञान्यानी संयती नवा आणि देही म्हणजेच म्हणजे जसे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो तसेच जीव मृत्यूनंतर जीर्ण शरीर सोडून दुसरे नवीन शरीर धारण करतो कनिष्ठ देह टाकून श्रेष्ठ देह धारण करतो दुसऱ्या स्थळी जातो दुसऱ्या स्थळी प्रकट होतो. मात्र तो अनंत आणि अनादी आहे कारण अज्ञानाचे जेवढे संस्कार माणसाच्या मनावर बुद्धीवर अंतकरण चतुष्टयावर राहतात चित्त प्रवृत्तीवर राहतात ते घेऊन तो पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा ते नवीन शरीररुपी वस्त्र आत्मा धारण करत असतो आणि जुने फेकून देतो म्हणजेच आत्मा नवीन देह धारण करतो त्याला वस्त्राची उपमा दिलेली आहे नवीन वस्त्र धारण करणे हे माणसाला आनंददायी असते
Ans. 15. मीरा ओक
१) कर्मयोग म्हणजे काय?
उत्तर : कर्मयोग हा भगवद्गीतेतील
महत्वाचा योगमार्ग आहे. जो निष्काम कर्मावर आधारित आहे.
निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे. अर्जुन हा क्षत्रिय आहे त्यामुळे रणांगणात आल्यानंतर त्याने कर्तव्य भावनेने म्हणजे कर्म ही ईश्वर सेवा मानून निःस्वार्थी पणे लढणे हा कर्मयोग.
निस्वार्थ कर्माने मन शुद्ध होते आणि आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्ष प्राप्ती होते.
कर्म दोन प्रकारची सांगितली आहेत.१) कर्तव्य विज्ञान व २) योग विज्ञान.
शरीर आणि शरीरी जाणून अकर्तव्याचा त्याग व कर्तव्याचे पालन हा कर्मयोग आहे. इंद्रिये आणि शरीर यांच्या सहाय्याने होणाऱ्या सर्व क्रियांमधील ' मी कर्ता ' हा भाव सोडून सर्व व्यापी सच्चिदानंद परमात्म्याशी एकरूप होऊन रहावे हा सांख्ययोग, फळाचा किंवा आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेनुसार केवळ भगवंता साठीच समत्व बुद्धिने कर्म करीत राहणे म्हणजे निष्काम कर्मयोग होय.
२). श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी का प्रवृत्त केले?
उत्तर : अर्जुनाने युद्ध भूमीवर आपले आप्त, स्वकीय, नातेवाईक, मित्र, बंधू, गुरुजन पाहिले आणि त्याचे अंग कापू लागले, थरकाप उडाला, त्याच्या हातून गांडीव धनुष्य गळून पडले. त्याची मन:स्थिती विचलीत झाली. योग्य काय अयोग्य काय हा विचार न करणारी झाली. तो रथातून खाली उतरला आणि हे युद्ध मी करणार नाही असे म्हणाला. तेव्हा भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला आणि युद्धाला प्रवृत्त केले.
भगवान सांगतात अर्जुना, तू क्षत्रिय आहेस त्यामुळे तुझे स्वधर्म कर्म आहे की तू रणांगणात धैर्याने, शौर्याने लढावं पण त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार तू करू नको. स्वधर्मामध्ये स्वार्थ असेल तर ते कर्म दूषित होत. पण युद्ध टाळणं म्हणजे स्वधर्माचा नाश करण होईल. स्वतःच्या कर्तव्यात मरण आलेले चांगलं.
आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे. त्यामुळे कोणी कोणाला मारण्याच्या भीतीत तू अडकू नकोस. तू जरी कोणाला मारले नाही तरी ते तुला मारतील निमित्त काहीही होईल पण शेवटी सर्वजण मलाच प्राप्त होतील. त्यामुळे अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करण्यासाठी, समाजातील संतुलन राखण्यासाठी तू युद्ध कर.
३). श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे?
उत्तर : भगवद्गीतेमधे श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मा नित्य, शाश्वत, अविनाशी आहे हे पटवून देण्यासाठी विविध उदाहरणे दिली.
शरीर जाणार आहे परंतु त्याच्यात राहून ज्याचा नाश होत नाही असा जो आत्मा आहे त्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही . तो पूर्वी होऊन गेला अस नाही. त्यामुळे तो नित्य, शाश्वत आणि सनातन आहे. छायेवर शस्त्र मारले असता छायेवर त्याचा परिणाम होत नाही तसे देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. मनुष्य जसा जुने वस्त्र झाले की टाकून देतो तसा जीवात्मा देह जीर्ण झाला अथवा अन्य कारणांनी टाकावा लागला तर तो देह टाकतो व पुन्हा नवीन देह धारण करतो.
त्यामुळे शस्त्राने तो चिरता येत नाही, अग्निने जळत नाही, पाण्याने विझत नाही, वाऱ्याने सुकत नाही. अशा कोणत्याही गोष्टीचा परिणाम आत्म्यावर होत नाही. तो अचिंतनीय आहे कारण तो अव्यक्त आहे, दिसत नाही पण सदा सर्वकाळ आहे .
Ans. 16. सौ.निलिमा चौधरी ताई लिहितात.....
प्रश्न १ : कर्मयोग म्हणजे काय ?
कर्मयोग म्हणजे आपले निहित कर्म करत जावे .योगचा अर्थ जोडणे .कर्मयोगचा अर्थ कर्माद्वारे श्री भगवान यांना जोडणे .
आपण जे पण कार्य करणार त्यात भगवंताचे नामस्मरण झाले पाहिजे .आपण जे काही काम करणार ते भगवंतासाठी करत आहोत अशी भावना ठेवली पाहिजे .जे पण कर्म करत आहोत ते आपण भगवंतासाठीच करत आहोत तेच आपल्या कडून सर्व कर्म करुन घेत आहे .असा विचार करुन जर कार्य( कर्म) केले तर या कर्माद्वारे आपण भगवंताशी जोडले जातो .हाच कर्मयोग आहे . आपल्या कामांमुळे (कार्यामुळे ) सर्वांचे हित साधले गेले पाहिजे .सर्वांचे कल्याण झाले पाहिजे . असा विचार मनात ठेवला पाहिजे .या भावना ठेऊन जर कर्म केले तर हाच कर्मयोग आहे .
कोणत्याही गोष्टीचा मोह ठेवायचा नाही .कर्मयोग म्हणजे जो आपला स्वधर्म आहे . तो निष्ठेने करत जावे .
हे सर्व कर्म भगवान आपल्या कडून करुन घेत आहे. असा विचार ठेवावा .असा विचार करुन जर कर्म केले तर तो कर्मयोग आहे .यातच सर्वांचे कल्याण होईल .
जर आपल्या मनात 'मी ' पणाचा भाव असेल तर तो कर्मयोगी म्हटला जात नाही .
फळाची किंवा आसक्ती चा त्याग करुन भगवंताच्या आज्ञेनुसार केवळ भगवंतासाठी च समत्व बुध्दीने कर्म करीत राहणे म्हणजे निष्काम कर्मयोग .
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सग्ङोस्त्वकर्मणि ।।2 .47।।
कर्म करतांना त
याचा किंवा तोटा याचा विचार न करता कर्म करणे .कर्म ही केवळ ईश्वराची सेवा आहे असे समजून निस्वार्थपणे कार्य करणे . रोजच्या जीवनातील प्रत्येक कार्य मनापासून आणि निस्वार्थपणे करणे हे कर्मयोगाचे उत्तम उदाहरण आहे .
प्रश्न 2 : श्रीकृष्णाने अर्जुनाला युध्दासाठी का प्रवृत्त केले ?
स्वकियांना युध्द भूमीवर पाहून अर्जुन मोहग्रस्त होतो त्याची मनःस्थिती द्विधा होते युध्द करावे की न करावे अशा संभ्रमात अर्जुन असतांना भगवान श्रीकृष्ण समजवतात अर्जुन क्षत्रिय होता क्षत्रियाचे कर्तव्य म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणे .युध्द टाळणे म्हणजे स्वधर्माचा त्याग करणे होईल, जे अर्जुनाला पापमय करेल शरीर नश्वर आहे .आत्मा कधीही मरत नाही ,त्यामुळे कोणालाही मारण्याच्या भीतीत अडकण्याची गरज नाही ,अधर्माचा नाश करणे आणि धर्माची स्थापना करणे हे भगवंताचे कार्य आहे .अर्जुनाला सांगण्यात आले की ,त्याने युध्द स्वतः साठी नव्हे ,तर धर्माच्या रक्षणासाठी लढले पाहिजे .युध्द सोडणे म्हणजे कर्तव्याचा त्याग करणे .तसे केल्यास अर्जुनाला अपयश आणि लज्जेला सामोरे जावे लागेल .अधर्म नष्ट करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी युध्द करणे आवश्यक आहे .अशा तर्हेने श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे अर्जुनाला कर्तव्याचा बोध होतो आणि तो युद्ध करण्यास सिद्ध होतो .
प्रश्न 3 : श्रीकृष्णाने आत्मा नित्य व अविनाशी आहे हे कोणत्या उदाहरणांनी सांगितले ?
भगवंतानी आत्मा नित्य व अविनाशी आहे हे अध्याय 2 श्लोक क्रमांक 17 ते 25 पर्यंत विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे .
आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही आणि कोणाकडून मरतही नाही .तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा पुन्हा उत्पन्न होणार नाही .कारण हा जन्म नसलेला नित्य , सनातन ,आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी मारला जात नाही ,हा "आत्मा नाशरहित नित्य न जन्मणारा व न बदलणारा आहे ."
वासांसि जीर्णानि यथा विहाय ,
नवानि गृह्नाति नरो S पराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही ।।22।।
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो , त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो.
नैनं छिन्दति शस्त्राणि ,नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।23।।
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत , विस्तव जाळू शकत नाही , पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
अच्छेद्योsयमदाह्योsयम अक्लेद्योsशोष्य एव च ।
नित्य :सर्वगतःस्थाणुःअचलोSयं सनातनः।।24।।
कारण हा आत्मा कापता न येणारा ,जाळता न येणारा , भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे तसेच हा आत्मा नित्य ,सर्वव्यापी ,अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे
हा आत्मा अव्यक्त आहे ,अचिन्त्य आहे आणि विकाररहित आहे .असे आत्म्याविषयी भगवंतानी अर्जुनाला स्पष्ट केले.
Comments
Post a Comment
तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा