स्थिरप्रज्ञ’ व्यक्तीची लक्षणे Sthitaprajna Yogi ke Lakshan

 *प्रश्न आमचा उत्तर तुमचे*

*प्रश्नोत्तरे क्रमांक ४*  

१. "नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः" या श्लोकाचा अर्थ काय?

२. श्रीकृष्णाने ‘स्थिरप्रज्ञ’ व्यक्तीची लक्षणे कोणती सांगितली? त्यांचे आचरण कसे असावे. 

३. भगवद्गीतेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो?

Ans. 1. अजय कुमार महाजन दादा लिहितात....

१. "नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः" या श्लोकाचा अर्थ काय?

उत्तर:- अध्याय दुसरा (साख्ययोग) मधील सोळावा श्र्लोक आहे.

ह्या श्लोका द्वारें भगवंत देह - देहीचे विवेचन दुसऱ्या शब्दात करतात. शरीर असत आहे जे भूत, भविष्य, वर्तमान ह्या तिन्ही काळात कधीच भाव रूपाने रहात नाही.

जी वस्तू सत आहे तिचा कधीच अभाव होत नाही. देही , जेव्हा देह उत्पन्न झाला नव्हता तेव्हाही होता. देह नष्ट झाल्यावर देखील देही राहिल व वर्तमानात देहाचे परिवर्तन होत असताना सुद्धा देही जसाच्या तसाच आहे. त्या मध्ये काहीही बदल झाला नाही होणारही नाही.

२. श्रीकृष्णाने ' स्थितप्रज्ञ' व्यक्तीची कोणती लक्षणे सांगितली?

उत्तर:- भगवान श्रीकृष्ण यांनी स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे खालील प्रमाणे सांगितली आहेत.

(१) ह्या व्यक्तीची बुध्दी कायम परमात्म्यात स्थित असते .

(२) ह्या व्यक्ती संपुर्ण कामनेचा त्याग करून आपले आपणातच संतुष्ट असतो.

(३) ह्या व्यक्ती नेहमीच दुसऱ्याच्या हिताचे काम करतात त्यामुळे त्या कर्माच्या फलात कोठेही आसक्ती, ममता, कामना निर्माण होणार नाही यात सावधानता बाळगतो. म्हणुन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत त्याचे मन विचलित होत नाही.(श्र्लोक ५६)

(४) सुखाची प्राप्ती झाली तरी ते सुख पुन्हा पुन्हा मिळत रहावे याची इच्छा तो ठेवत नाही.

(५) तो राग, भय, क्रोध यापासून स्वतः ला दूर ठेवतो.

(६) तो स्नेह रहित आहे. त्यांची आपली म्हणवली  जाणारी इंद्रिय,शरीर, मन, बुध्दी , स्री, पुत्र, धन, घर इत्यादी कशातच त्याला आसक्ती आकर्षण नसते.

(७)  प्रारब्धा नुसार शुभ - अशुभ, शोचनीय - अशोचनिय, चांगले - वाईट, अनुकूल - प्रतिकूल, परिस्थिती येते. तो अनुकूलतेे मुळे हर्षित तथा प्रतिकुलतेमुळे त्या परिस्थितीचा द्वेष करीत नाही. त्याची बुद्धी स्थिर, एकरूप, व एकरस असते. ( श्र्लोक ५७).

३. भगवद्गीतेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात उपयोग कसा होवू शकतो?

उत्तर:-१) जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. आत्मा अमर आहे 

(२) माणसाने आपली समाजात अपकिर्ती होईल असे वागू नये.

(३) जय - पराजय, सुख - दुःख, लाभ - हानी, यांना समान मानावे.

(४) कर्तव्य कर्म करीत राहावे कर्म फलाची आसक्ती ठेवू नये.

जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏🙏


Ans. 2. राजश्री कोंडावर ताई लिहितात...

प्रश्न क्र.१ चे उत्तर.

तेव्हा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की 

हे अर्जुना असत् वस्तूला अस्तित्व नसते आणि सत् वस्तूचा अभाव असत नाही अश्याप्रारे या दोहोंचेही तत्व तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिलेले आहे. 

प्रश्न क्र. २ चे उत्तर

यावर भगवान म्हणाले --

हे अर्जुना जेव्हा ( हा पुरुष) मनातील संपूर्ण कमनांचा पूर्णपणे त्याग करतो आणि आत्म्याने आत्म्यामधेच संतुष्ट होऊन राहतो तो पुरुष स्थितप्रज्ञ म्हंटला जातो. 


तसेच --

दु: खाची प्रप्ती झाली असताना जाचे मनात उद्वेग येत नाही सुखांच्या प्रप्तीच्या बाबतीत जो सर्वथा नि:स्पृह आहे तसेच ज्याचीआसक्ती, भय व क्रोध हे नष्ट होऊन गेले आहेत असा मुनी स्थीरबुद्धी म्हंटला जातो. 

आणि --

जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित असून त्या त्या शुभ किंवा अशुभ वस्तू प्राप्त झाल्यावर प्रसन्न होत नाही तसेच द्वेष करीत नाही त्याची बुध्दी स्थिर आहे असे म्हंटले जाते. 

आणि कासव सर्व बाजूंनी (आपले ) अवयव इंद्रियांच्या विष्यांपासून (आपली) इंद्रिये सर्व प्रकाराने आवरून घेतो तेव्हा त्याची बुध्दी स्थिर आहे ( असे समजावे). 

यद्यपि --

इंद्रियांच्या द्वारा विषयांचे ग्रहण न करणाऱ्या पुरुषाच्या बाबतीत ( केवळ) विषयच निवृत्त होतात (परंतु) विषयांतील आसक्ती निवृत्त होत नाही या स्तिथप्रज्ञ पुरुषाची तर आडकतीसुद्धा परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यामुळे संपूर्णपणे निवृत्त होऊन जाते.

आणि --

हे अर्जुना

आसक्तीचा नाश न झाल्यामुळे विक्षुब्ध करण्याचा स्वभाव असणारी इंद्रिये (ही) प्रयत्न करणाऱ्या बुध्दिमान पुरुषाचे मनसुद्धा जबरदस्तीने हरण करून घेतात.


प्रश्न क्र ३ चे उत्तर --


हे कुंतीपुत्र अर्जुना 

थंडी उष्णता व सुख - दू:ख देणारे इंद्रिये आणि विषयांचे संयोग तर उत्पति - विनाश - शील आणि अनित्य ( आहेत) म्हणून हे भारता त्यांना तू सहन कर.

कारण हे पुरुष श्रेष्ठा सुखदू: खाला समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला - हे ( इंद्रियांचे विषयांशी संयोग ) व्याकूळ करीत नाहीत तो (पुरुष ) मोक्षाला योग्य ठरतो.

जय व पराजय लाभ- हानी आणि सुख व दू:ख (यांना) समान मानून - त्यानंतर युद्ध करण्यासाठी तयार हो अश्याप्रकरे ( युद्ध केल्यामुळे) - पाप तुला लागणार नाही.

आणि -

हे अर्जुना वेद ( हे वरील प्रकाराने) तीन गुणांचे कार्य- रूप असे सर्व भोग व त्यांची साधने यांचे प्रतिपादन करणारे आहेत. म्हणून ते भोग व त्यांची साधने यामध्दे आसक्तिरहित - हर्ष - शोक इत्यादी द्वंद्वांनी नित्यवस्तू अश्या परमत्म्याचे ठिकाणी स्थित योग आणि क्षेम यांची इच्छा न करणारा आणि अंन्त: करण ज्याचे स्वाधीन आहे असा तू हो. 

कर्म करण्याविषयीच तुला अधिकार (आहे) (त्याचा) फळांवर कधीही नाही (म्हणून) कर्मांच्या फळांचा हेतू तू होऊ नकोस ( तसेच) कर्म न करण्याबाबत तुझी आसक्ती असू दे नको.

आणि - 

समबुद्धीने युक्त असा पुरुष याच लोकात पुण्य आणि पाप या दोहोंचा ही त्याग करतो म्हणजे त्यांतून मुक्त होऊन जातो म्हणून समत्वरूप योगाला तू लागून राहा (हा) समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.


Ans. 3. अश्विनी पैठणकर ताई लिहितात ....

**प्र.१**: *"नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः" या श्लोकाचा अर्थ काय?*  

**उत्तर**:   

हा श्लोक भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील (श्लोक १६) आहे. याचा अर्थ असा की, असत्याचे अस्तित्व नाही आणि सत्याचे कधीही अभाव होत नाही. म्हणजेच, जे नश्वर आहे, ते कधीच टिकून राहणार नाही, आणि जे खरे आहे, चिरंतन आहे, ते कधीही नष्ट होणार नाही. आत्मा हा नाशिवंत आणि शाश्वत आहे, तर शरीर नश्वर आहे. म्हणूनच, मनुष्याने कायम टिकणाऱ्या आत्म्याला महत्त्व द्यावे आणि नश्वर शरीर व भौतिक गोष्टी यांना अधिक महत्त्व देऊ नये.  


---  

 **प्र.२**: *श्रीकृष्णाने ‘स्थिरप्रज्ञ’ व्यक्तीची लक्षणे कोणती सांगितली? त्यांचे आचरण कसे असावे?*  

**उत्तर**:  

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने 'स्थिरप्रज्ञ' (समाधानी आणि स्थिरचित्त असलेल्या व्यक्ती) ची लक्षणे सांगितली आहेत. स्थिरप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:  


1. **राग-द्वेषाचा अभाव** – अशी व्यक्ती सुख-दुःखांमध्ये समान असते आणि मोह, क्रोध, लोभ यांना बळी पडत नाही.  

2. **इंद्रिय-निग्रह** – जी व्यक्ती आपल्या इंद्रियांना वश ठेवते आणि त्यांचा अतिरेक टाळते, ती स्थिरप्रज्ञ असते.  

3. **सुख-दुःखात समभाव** – संकट आले तरी विचलित होत नाही आणि आनंद आला तरी अहंकार बाळगत नाही.  

4. **त्यागाची वृत्ती** – स्थिरप्रज्ञ व्यक्ती मोह-माया, लोभ-लालसा सोडून जीवनात स्थितप्रज्ञतेने वागते.  

5. **आत्मनिष्ठता** – अशा व्यक्तीचे चित्त आत्म्यामध्ये स्थिर असते आणि ती बाह्य सुख-सोयींवर अवलंबून राहत नाही.  


अशा व्यक्तीने जीवनात शांती, संतुलन, संयम आणि आत्मबळ जोपासावे. त्याच्या कृती निष्काम असाव्यात आणि त्याने आपल्या कर्तव्याचे पालन करावे.  


---  

 **प्र.३**: *भगवद्गीतेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो?*  

**उत्तर**:  

भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील शिकवणी आजच्या जीवनात अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकते:  


1. **मानसिक स्थिरता** – जीवनात अनेक चढ-उतार असतात. सुख-दुःख, यश-अपयश यामध्ये मन स्थिर ठेवण्यासाठी गीतेचा उपदेश मदत करतो.  

2. **कर्मयोगाचा स्वीकार** – निष्काम कर्मयोगाचे तत्त्व सांगते की, फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करावे. हे तत्वज्ञान आजच्या स्पर्धात्मक जीवनात अत्यंत उपयुक्त आहे.  

3. **संतुलित जीवनशैली** – इंद्रियनिग्रह आणि समभाव यामुळे मनुष्य संतुलित जीवन जगू शकतो, जे तणावमुक्त जीवनासाठी आवश्यक आहे.  

4. **स्वतःची ओळख** – गीतेत आत्मा हा नश्वर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. त्यामुळे आपण भौतिक गोष्टींच्या मोहात न अडकता खऱ्या आनंदाचा शोध घ्यायला हवा.  

5. **धैर्य आणि संयम** – संकटे आली तरी घाबरू नये आणि मन शांत ठेवावे. योग्य कृतीने परिस्थितीवर मात करावी.

Ans 4.  डॉक्टर शरयू क्षीरसागर.....

प्रश्न  क्रमांक  4 ,,,,

,1* नासतो विद्यते  भावो  ,नाभावो विद्यते सतः,या श्लोकाचा  अर्थ  काय  ,वरील श्लोक  हा गीतेतील  अध्याय  2 श्लोक  16वा आहे

भगवान  श्रीकृष्ण, अर्जुन  ला सांगतात सत् आणि  असत् याची लक्षणे काय आहेत  असत् वस्तूला अस्ताव्यस्त नाही आणिसत् वस्तूचाअभाव नसतो  अशा प्रकारे  त्यादोन्हीचे ही सत्यस्वरूप  तत्वज्ञानी वज्ञानी  पुरूषाने  पाहिले  पाहिजे  

2,,,*श्रीकृष्ण (स्थिरप्रज्ञ)व्यक्तीची  लक्षणे कोणती सांगीतली  आहेत त्याचे आचरण कसे  असावे,

ऊत्तर,,,,,भगवान श्रीकृष्णाला  अर्जुनाने  चार प्रश्न  विचारले  आहेत अध्याय  2मध्ये याचा ऊल्लेख  आहे 

अर्जुन वाच,,स्थितप्रज्ञ स्य काभाषासमाधिस्थस्य केशव स्थितीत किं प्रभाषेत  किमासित व्रजेत किम् (54)

अर्जुन, विचारतात कि हेकेशवा  जोसमाधीत  परमात्म्याला  प्राप्त   झालेला  आहे,अशास्थिरबुद्धी पुरुषाचे काय लक्षण आहे ,तो कसा बोलतो,कसाचालतो,आणि कसा बसतो,

भगवान सांगतात,(शोल्क 55/2)हे अर्जुन ज्यावेळीपुरूष  मनातील  सर्व  कामना टाकतो आणि  आत्म्यानेच  आत्म्यात संतुष्ट राहतो त्यावेळीच  त्याला स्थितप्रज्ञ  म्हणतात, स्थिरबुद्धी  असलेलामनुष्य हा दुःखामध्ये अनुद्विग्न सुखांच्या निप्सृह  आणि शुभाशुभं प्रसंगात हर्ष  शिकारी द्वंदापासून रहितअसतो  

अर्जुनाचा दुसरा प्रश्न (56/अध्याय 2)दुःखदायक प्रसंगी  ज्याच्या मनालाखेद  वाटत नाही ,सुखांच्या  प्राप्तीविषयी ज्यालामुळीचईच्छा  नाही ,तसेच ज्याचे  प्रिती,भय,व क्रोध  नाहीसे  झाले आहेत असा मुनी,पुरूष, स्थिर बुद्धी  म्हटला जातो जो पुरूष  सर्व बाबतीत  स्नेह शुन्य असून तो कोणावर आनंदी नाही व द्वेष ही करीत नाही कारण त्याची बुद्धी स्थिर  असते 

तिसरा

 प्रश्न, 3,चे ऊत्तर  देताना भगवान  श्रीकृष्ण  कासवाचे  ऊदाहरण देतात (58/2)कासव  सर्व  बाजूंनी  आपले अवयव जसे आत ओढून धरतो, त्याच प्रमाणेच जेव्हा हा पुरूष  इन्द्रियांच्या  विषयापासून  इंद्रियाना सर्व  प्रकारे आवरून  घेतो  तेव्हाच त्याची बुद्धी स्थिर   झाली असे समजावे   विषयापासून  निवृत्ती  झाली तरीआसक्तीची  निवृत्ती होत नाहीतर परमात्म्याची प्राती  योगसाधना होते अध्याय 2श्लोक59 भगवान  सांगतात  ,इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या  पुरूषाची केवळ  विषयच दूर होतात परंतु त्याच्याविषयीची  आवड नाहिशी होत नाही या स्थितप्रज्ञ  पुरूषाची  तर आसक्तीत परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते  म्हणून साधकाने त्या सर्व  इन्द्रियाना ताब्यात ठेवून ,चित्त स्थिर  करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे ,कारण इन्द्रिये ज्या पुरूषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर असते(अध्याय 2श्लोक61)

प्रश्न  3 ,,,भगवद्गीतेतील  या अध्याय चा आजच्या  जीवनात ऊपयोग  कसा होऊ शकतो 

ऊत्तर,,,,गीतेतील  अध्याय  दोन साड्ख्यंयोग नाम आपल्या जीवनात  कसा ऊपयोग  होते हे भगवान  अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात ,मनुष्याने  मानवी जीवनात नेहमी सत्याने  व धर्माने  वागले पाहिजे,सत्कर्म वसत्यवचनी असावे ,स्थिर बुद्धी  ठेवून परमेश्वर  विश्वास  ,श्रद्धाठेवून जवळीक  साधली पाहिजे जेणे करून परमेश्वर  प्राप्तीहोण्याची  गरज आहे हेच मानवी जीवनाचे सार्थक  करणे हेच सत्य आहे ईश्वर  प्राप्ती हेच अंतिम सत्य  आहे या अध्याय  तून शिकले  पाहिजे.


Ans. 5. सरला बोरोळे ताई लिहितात.....

1. चे उत्तर.  नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः.  या श्लोकाचा अर्थ काय .______जी वस्तू असत असते तिला अस्तित्व नसते अ भावाला अस्तित्व नसते कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते. जी वस्तू सत म्हणजे सत्य असते तिला अस्तित्व असते   तिला कोणीही नष्ट करू शकत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी तुला सांगत आहे माझ्याबरोबर ज्यांनी या दोन्ही स्वरूपाचा अभ्यास केला आहे त्यांनीच हा निर्णय श्रीकृष्णांनी येथे पुन्हा सांगितले आहे की श्रीकृष्ण एक तत्त्वज्ञानी महापुरुष होते परम तत्व परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्यामध्ये स्थित असणाऱ्या असणाऱ्यांना तत्त्वज्ञानी म्हटले जाते

(२) 
स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे 
व  आचरण कसे असावे 
मनुष्य जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छांचा त्याग करून तो आपल्यास व स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ असे म्हणतात  सर्व वासनांचा त्याग करून आत्महत्या भगवंताचे दर्शन होते अशा स्थिर बुद्धीच्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात आत्माराम आत्म तृप्त महापुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात नष्ट झालेले असतात तो सर्व गोष्टी त अनासक्त असतो स्थितप्रज्ञ पुरुष अनुकूल परिस्थितीने ना प्रसन्न होतो ना प्रतिकूल परिस्थितीने विषाणू होतो कारण त्याला घडलेल्या गोष्टी भिन्न वाटत नाहीत ज्याप्रमाणे कासव जसे आपले अवयव आवरून घेऊ शकतो त्याचप्रमाणे तीर्थप्रज्ञ व्यक्ती स्थिर असल्यामुळे आपल्या चंचल इंद्रियांना आवरून घेऊ शकतो कासवाचे फक्त एक उदाहरण आहे कारण संकट चढताच कासव आपली इंद्रिय पुन्हा पसरतो स्थितप्रज्ञ महापुरुष इंद्रियांचा निग्रह करणाऱ्या पुरुषाचे विषय निवृत्त होतात श्रीकृष्ण सांगतात की इंद्रियांच्या द्वारे विषय व ग्रहण करणारे पुरुष सुद्धा विषयांपासून निवृत्त होतात परंतु साधने द्वारा परमात्म्याचा साक्षात्कार करून विषया ची आसक्ती ओढ नाहीशी होते जोपर्यंत परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत कर्म करत राहावे

 3.  अत्यंत दुराचारी पापी मनुष्य देखील भजन करून  परमात्मा  बनू शकतो व शांती प्राप्त करू शकतो अशा प्रकारे ज्याने स्वतःला संपूर्ण भगवंताच्या चरणी समर्पित केले आहे तो धर्मात्मा बनू शकतो जो चांगल्या प्रकारे आचरण करतो मनुष्य अत्यंत पापी असला तरी तो शीघ्र धर्मात्मा बनतो एक ओंकार सत्य आहे परंतु सद्गुरु च्या कृपेचा प्रसाद आहे अविनाश अशा परमात्म्याची उपासना करा त्या ईश्वराचे मुख्य नाम ओम आहे ईश्वर कृपा करतो तेव्हा शत्रू मित्र बनतो आणि आपत्ती संपत्ती बनत असते ईश्वर सर्वत्र पाहत असतो
 संसार बंधनातून मुक्त व्हा कर्म करण्याचा अधिकार तुला आहे पण  फळावर तुझ्या मुळीच अधिकार नाही कर्मामध्ये तू श्रद्धा असता कामा नये ते ते करण्यास तू नेहमी तत्पर असला पाहिजे अशा जर वागलास तर परम पुरुषाचा (परमात्म्याचा) तुला साक्षात्कार होईल स्थितप्रज्ञ तिथं  बनशील परम शांती तुला प्राप्त होईल

Ans. 6. मालती जोशी ताई लिहितात ......

 प्रश्न पहिला __नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत :! या श्लोकाचा अर्थ काय?                           
गीता अध्याय 2 श्लोक 16 असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूचा अभाव नसतो अशा रीतीने या दोहोंचही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे 
स्पष्टीकरण __या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने आत्म्याची शाश्वतता आणि निसर्गाची शाश्वतता स्पष्ट केली आहे असं म्हणतात की जी गोष्ट अवास्तव (अस्थाई )आहे ती अस्तित्वात नाही आणि जे सत्य ( शाश्वत) आहे त्याला अंत नाही                       
अर्थ ___"नासतो विद्यते भावो" अवास्तविकतेचे खरे अस्तित्व नाही असत म्हणजे जे नाशिवंत किंवा तात्पुरते आहे ही जगाची ,वस्तूची आणि सजीवांच्या शरीराची अवस्था आहे त्याला कायमस्वरूपी अस्तित्व नाही "नाभावो विद्यते सत "जे सत्य (शाश्वत) आहे ते कधीही संपत नाही सत म्हणजे आत्मा जो सदैव स्थिर आणि शाश्वत असतो आत्म्याला अंत नाही कारण तो जन्म मृत्यू चक्राच्या पलीकडे आहे" उभयोरपी   दृष्टोन्नस्तवनयोसत्वदर्शीभी " तत्त्वदर्शनी अवास्तव आणि वास्तविक या दोन्हीचे गुण पाहिले आहेत अवास्तवचा अंत असतो आणि वास्तविक नेहमी स्थिर राहते तत्त्वदर्शी किंवा जाणकारांनी ही वस्तुस्थिती स्पष्टपणे पाहिली आणि समजून घेतली सारांश या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने जीवनातील तात्पुरते आणि शाश्वत भेद स्पष्ट केले आहे की भौतिक वस्तू आणि शरीर तात्पुरते आहेत आणि त्यांचे अस्तित्व नष्ट होते तर आत्मा शाश्वत आहे अशा प्रकारे आत्म्याचे अस्तित्व समजून घेऊन आपण जीवनातील सत्य योग्यरित्या समजावून घेऊ शकतो आणि योग्य मार्गावर चालू शकतो (भगवद्गीता पारायण सेवा या ग्रुप वरून लिहिले आहे).                  
 #प्रश्न दुसरा__श्रीकृष्णाने 'स्थिर प्रज्ञ' व्यक्तीची लक्षणे कोणती सांगितली? त्याचे आचरण कसे असावे                   भगवद्गीता अध्याय दोन श्लोक 54 मध्ये अर्जुन भगवंतांना विचारतो की स्थिरप्रज्ञ म्हणजे आत्मज्ञानी माणसांची लक्षणे काय? तो कसा बोलतो चालतो त्याची भाषा कशी असते त्यावर भगवंत म्हणतात मनुष्य जेव्हा इंद्रियाच्या इच्छा टाकून मनाला केवळ आत्म्यामध्ये रमवतो तेव्हा तो दैवी चैतन्याने युक्त झाला किंवा स्थिर प्रज्ञ झाला असे म्हणावे (श्लोक 55) त्रिविध ताप असले तरी तो क्षुब्ध होत नाही गर्वाने फुगत नाही आसक्त होत नाही स्थिर प्रज्ञने आसक्ती भय क्रोध यांना जिंकलेले असते. (श्लोक 56) तो लाभ हानीची पर्वा करत नाही (श्लोक 57), कासवा प्रमाणे त्याने इंद्रियांना जिंकून घेतलेले असते (श्लोक 58) आत्म्यात रमल्याने उच्चत्तर गोडीचा त्याला अनुभव आल्यामुळे विषयाबद्दलची गोडी सुटते तो चैतन्यात कृष्ण भावनेत स्थिर होतो (श्लोक 59) ज्याने माझ्या ठिकाणी चित्त स्थिर केले व आपली इंद्रिय ताब्यात ठेवली आहेत तो स्थिर बुद्धीचा समजला जातो (श्लोक 61) राजा अंबरीश याचे उत्तम उदाहरण आहे त्याने आपले मन श्रीकृष्णाच्या चरण कमली स्थिर केलेले होते त्यांची वाणी भगवंताचे निवासस्थान व त्यांचे गुणाचे वर्णन करीत होते त्यांचे हात भगवंताचे मंदिर झाडून स्वच्छ करीत होते त्यांचे कान भगवंतांच्या लीलांचे श्रवण करीत होते त्यांचे नेत्र भगवंताचे रूप पाहत होते त्यांचे शरीर भक्ताच्या शरीराला स्पर्श करीत होते तो नाकाने भगवंताच्या चरण कमलावर राहिलेल्या फुलांचा सुवास घेत होता तो जिभेने भगवंताला  अर्पयलेली तुळशीचे पाने चाखित होता भगवंताच्या मंदिराकडे त्याचे पाय वळत होते मस्तक भगवंतांना वंदन करीत होते त्याच्या इच्छा भगवंताच्या इच्छा पूर्ण करण्यात निमग्न झाल्या होत्या ही स्थिर प्रज्ञ माणसाची लक्षणे होत.               
# प्रश्न तिसरा__भगवद्गीतेच्या या अध्यायच्या आजच्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो?                           
भगवद्गीतेचा अध्याय दोन __आपल्याला फळाची अपेक्षा न करता कर्म करण्यास शिकवतो याचे जर आपण पालन केले प्रत्येकाने कोणतीही अपेक्षा न ठेवता  निष्काम भावनेने आपले कर्तव्य पार पाडले तर सर्व कुटुंब सुखी होईल पर्यायाने सर्व समाज सुखी होऊन रामराज्य नांदेल हा अध्याय आत्म्याची अमरता ,शाश्वतता, अखंडितता  सांगून जातो त्यामुळे श्रीकृष्ण भावनेत तल्लीन होण्यासाठी हा देह ,हे मन आहे हे समजून येते धर्मग्रंथातील नियमाप्रमाणे जो कोणी निंद कर्म करतो आणि ज्याच्या सारासार विचारांची जाणीव नष्ट झाली आहे त्यांच्याशी दोन हात करणे प्राप्त आहे प्रत्येक जीवाला वैयक्तिक अस्तित्व असल्यामुळे त्यांच्या देहात प्रतीक्षणी बदल होत असतो काही काळ त्या देहात बालपण ,तारुण्य आणि म्हातारपण दिसते पण आत्मा तोच असतो त्यात कोणताही बदल होत नाही मृत्यूनंतर तो शरीर बदलतो आत्मा अमर असल्याने शरीराची आसक्ती  ठेवू नये त्यात गुंतू नये हे आपल्याला हा अध्याय शिकवतो शरीरातील चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसते तर जीवात्म्याच्या उपस्थितीमुळे असते या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांचे स्पष्टीकरण केले आहे ते आपल्या आचरणात आणणे ही काळाची गरज आहे स्थिरप्रज्ञ माणूस कसा असतो याचा उहापोह या अध्यायात केला आहे इंद्रयांना जिंकून लाभ हानी चा विचार न करता श्रीकृष्ण भावनेत रममाण होऊन प्रत्येकाने आपले कर्म अनासक्तीने केले तर तो निश्चित मोक्ष  प्राप्त करेल असा या अध्यायाचा जीवनात उपयोग होईल (भगवद्गीता जशी आहे तशी वरून)

Ans .7.  सुचिता मुळे ......

नासतो विद्यते भाव नाभावो विद्यते सतः |
उपयोग रफी दृष्टोन्तसत्वनयोस्ततत्त्वदर्शीभी: 
हा श्लोक भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक सोळावा आहे जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट सांगितले व अर्जुन गप्प झाला तेव्हा अंतर्यामी श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला समजावून सांगताना सत आणि असत गोष्टींबद्दल सांगितले. 
श्रीकृष्ण म्हणतात....
नासतो विद्यते भाव: जे असत्य आहे म्हणजेच जे क्षणिक नश्वर आहे त्याला खरे अस्तित्व नाही शरीर हे पूर्वीही नव्हते मृत्यूनंतरही राहणार नाही आणि वर्तमान काळातही प्रत्येक क्षणी ते झिजून जात आहे याचाच अर्थ शरीर हे तिन्ही काळात टिकणारे शाश्वत असे नाही तसेच आपली संपत्ती आपले ऐश्वर्य आणि आपल्या सुखासाठी च्या सगळ्या कल्पना असत्य आहे कारण समाधान नाही उलट जास्तच त्या गोष्टींची हा वाढते ते वैभव मिळाले नाही तर क्षणापुरते असते पण ते वैभव जसे आज आहे तसे उद्या नसणार आणि परवा राहील किंवा नाही हे माहीत नसते म्हणजेच हे सर्व वैभव ज्याची आपण प्रत्येक क्षणी हाव करतो ते सर्व वैभव असत्य आहे असे वाटते 
ना भाऊ विद्यते सतः जे सत्य आहे म्हणजेच कायमचे शाश्वत आहे त्याचा कधीही अभाव होत नाही जसे की शरीर नष्ट जरी झाले तरी आत्मा हा अमर आहे आणि तो निरनिराळे शरीर धारण करतो पण तो मरत नाही समुद्राची लाट जरी तात्पुरती असली तरी समुद्र हा अनादी कालापासून आहे परमात्मा तत्व हे कायमस्वरूपी आहे संसार नव्हता तेव्हाही परमात्मत्व होते त्यामुळेच संसार उत्पन्न झाला संसार नसल्यावरही त्यांना नष्ट करणारा परमात्मा तत्व कायम असणार आहे 
उपयोग रफी दृष्टांतच तत्त्वदर्शिव ही..... वरील सर्व उदाहरणे तत्त्वज्ञानी लोकांनी अनुभवले आहे  की असत्य तात्पुरते असते पण सत्य हे चिरकाल टिकणारे असते भलेही मग त्याचे अस्तित्व दुसऱ्याला दिसत नाही पण ते जाणवते अर्जुन सुद्धा शरीराविषयी विचार करून माझे आप्तस्वकीय हे मारल्या जातील म्हणून शोक करीत आहे पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू जरी त्यांना मारले नाहीस तर ते मरणारच तर ते मरणारच नाहीत का? शरीर हे असंच आहे ते नष्ट होणारच मग तुझे शोक करणे हे अज्ञानच आहे जे तत्त्वदर्शी किंवा पंडित किंवा विवेकी असतात ते प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करतात त्यांना शोक होत नाही जर त्यांना शोक होत असेल तर ते समजदार नाही इथे सत्य काय आहे याची उकल झालेला मनुष्य तत्त्वदर्शी ठरतो तो खोट्या आणि खऱ्या गोष्टी सहज उलगडून समजू शकतो

Ans.08. माधुरी आपटे यांनी लिहिलेले उत्तर....

प्रश्र्न 1.नासतो विद्यते भावो या श्र्लोका चा अर्थ ❓
उत्तर. नासतो विद्यते भावो म्हणजे असत कधी ही विद्यमान नसते आणि ना भावो विद्यते सतत अर्थात सत कधीही अ विद्यमान नसते. उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वयोस्ततत्व दर्शिभिः अर्थात तत्वदर्शीजे असतात ते सत आणि असत ला अशा प्रकारे जाणतात. 
दूसर्या प्रकारे सांगायचे तर देह असत आहे आणि देही सत आहे. अर्थात देह हा क्षर आहे आणि देही अक्षर आहे. संसारात जितके वस्तू आहे सर्वात चेतना हे अक्षर तत्व आहे आणि वस्तु स्वतः क्षर आहे. परमेश्र्वर सत आहे आहे. वेदात सुद्धा परमेश्र्वराला सत चित्त आनंद रुप मानले आहे तसेच देह नष्ट होणार आहे म्हणून तो असत आहे. आपल्या जवळ पास जेव्हड्या भौतिक वस्तू आहेत त्या सर्व कधी ना कधी नष्ट होणार आहेत म्हणून हे भौतिक जग असत आहे. जसे आपण घटात पाणी भरून त्यात सूर्याचे प्रतिबिंब पाहून नंतर पाणी फेकून दिले तर प्रतिबिंब नष्ट होत पण सूर्य नष्ट होत नाही अर्थात सूर्य सत आणि प्रतिबिंब असत आहे. 
जो मनुष्य ह्या सत आणि असत ला जाणतो तो तत्वदर्शी आहे.

प्रश्र्न 2. श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञा ची कोणती लक्षणे सांगितली? 
उत्तर. श्रीकृष्णाने ने अध्याय 2च्या श्र्लोक क्रमांक 55ते64 पर्यंत स्थितप्रज्ञा ची लक्षणे सांगितली आहेत. मनुष्य जेव्हां इन्द्रियतृप्तिच्या सर्व कामनांचा त्याग करतो आणि त्याचे मन स्वतः च्या आत्म्यातच संतोष प्राप्त करते तेव्हा तो मनुष्य स्थितप्रज्ञ म्हणवला जातो. 
भगवंत म्हणतात ज्या मनुष्याचे मन सुख किंवा दुःख काहीही प्राप्त झाले तरी विचलित होत नाही तो स्थिर बुद्धी चा मुनी म्हणवला जातो. नंतर भगवंत म्हणतात जो मनुष्य शुभ प्राप्त झाले म्हणून हर्षित होत नाही आणि अशुभ प्राप्त झाले म्हणून दुःखी होत नाही तो स्थिर बुद्धी चा ज्ञानी ओळखावा. 
नंतर 3श्र्लोकांत भगवंत  इन्द्रियांना संयमित करण्यार्या मनुष्या बद्दल सांगतात. ज्या प्रमाणे कासव आपल्या इन्द्रियांना संकुचित करतो त्या प्रमाणे जो मनुष्य इन्द्रियांना संयमित करून त्यांच्या विषयां पासून त्यांना दूर करण्यात यश प्राप्त करतो तो स्थिर बुद्धी असतो. ते म्हणतात आपल्या इन्द्रिया इतक्या प्रबळ असतात की जितके तुम्ही त्यांना विष यांपासून दूर करण्या चा प्रयत्न कराल तितक्यात्या विषयांना चिकटण्या चा प्रयत्न करतील. आपल्याला मन आणि बुद्धी दोन्ही च्या एकत्र प्रयत्नाने इन्द्रियांना त्यांच्या विष यांपासून दूर करावे लागेल. 
श्र्लोक क्रमांक 62 63मधे भगवंत सांगतात मनुष्य जर इन्द्रियांच्या विषयांचे चिंतन करेल तेवढेच विषयांची आसक्ती उत्पन्न होईल आसक्ती ने विषय उपभोगा ची इच्छा , इच्छा पूर्ण न झाल्यास क्रोध आणि क्रोधा ने स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशाने बुद्धी नाश आणि बुद्धीनाशाने  सर्व नाश होईल. 
श्र्लोक क्रमांक 64ते72 पर्यंत मनुष्याचे आचरण कसे असावे हे सांगितले आहे. 
1.जो मनुष्य राग आणि द्वेषा पासून मुक्त राहिल त्याच्यावर  भगवंताची कृपा होईल. 
2.मनुष्यानी इन्द्रियांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे जो पर्यंत इन्द्रियांवर नियंत्रण नाही तो पर्यंत इन्द्रिया नेहमी त्यांच्या विषयांच्या पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत राहतील आणि त्या मूळे मनुष्यची बुद्धी स्थिर होणार नाही. 
3.स्थित्प्रज्ञ मनुष्य च्या जागृती ची जी वेळ असते ती वेळ साधारण मनुष्या करता रात्री ची वेळ असते. ज्या प्रमाणे सर्व नद्या समुद्रात मिळतात तरी समुद्र विचलित होत नाही त्या प्रमाणे स्थितप्रज्ञा च्या सर्व इच्छा विकार उत्पन्न न करता त्याच्यात समावून जातात आणि तो स्थिर बुद्धी ला प्राप्त होतो. त्यालाच ब्राह्मी स्थिती असे म्हणतात.

Ans. 9. सौ.निलिमा चौधरी 

प्रश्न आमचा उत्तर तुमचे :प्रश्न क्रमांक 4 
1)  "नासतो विद्यते भावो ,नाभावो विद्यते सतः" या श्लोकाचा अर्थ काय ?
उत्तर- असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो . अशारितीने यादोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.
        ज्ञान मार्गासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा श्लोक आहे.हे दृष्य जग सतत बदलत असते आणि म्हणूनच ते 'असत् 'असते .आपले शरीर सतत बदलत असते पण आत्मतत्त्व बदलत नाही .न दिसणारे परमात्वतत्व कधीही बदलत नाही आणि ते सत् असते .
  ' असत् ' अस्तित्व नसते व 'सत्' चा अभाव नसतो.ईश्वर आपल्याला दिसत नाही व तो कधीही बदलत नाही म्हणून तो 'सत्' आहे.परंतु हा संसार (जग ) परिवर्तन शील आहे व तो 'असत्' (मिथ्या ) आहे .
      जे सर्व बदल्यावरदेखील  राहते ते 'सत् 'आहे आणि जे सतत बदलते ते 'असत्'
आहे .जे सत्य असते तिलाच  अस्तित्व असते. हे तत्वज्ञानी  लोक जाणतात .राजहंस हा दूध व पाण्याच्या मिश्रणातून दूध जसे वेगळे करु शकतो  तसेच हे असते.तसेच सोनार सोने तापवून त्यातील अशुध्दी दूर करतो शुध्द सोने मिळवतो.गृहीणी ताक घुसळून लोणी काढण्याची कला जाणते . तसेच प्रपंचात राहून देखील ज्ञानी लोक ब्रम्हतत्वात स्थिर होऊ शकतात .कमळाचे फुल पाण्यात देखील त्यापासून वेगळे असते  तसेच आपणही संसारात राहूनं वेगळे असले पाहिजे.
        'असत्' वस्तू ला अस्तित्व नाही आणि सत्य हे निरंतर असते .'सत्' वस्तू चा   अभाव नसतो सत
 म्हणजे सच्चिदानंद स्वरूप परमात्मा या परमात्म्या खेरीज इतर कशाचीही म
म्हणजेच असत् ची सत्ता नसते. अस्तित्व नसते. त्या परमात्म्याखेरीज जगामध्येइतर काही नाहीच आहे .हे तत्व जो जाणतो तो ज्ञानी, तो तत्वज्ञानी .


2 )  श्रीकृष्णाने ' स्थिरप्रज्ञ' व्यक्ती ची लक्षणे कोणती सांगितली ? त्यांचे आचरण कसे असावे ?
 
        भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायातील अकराव्या श्लोकापासून भगवंतानी अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ केला. विविध दाखले देऊन त्याचे किल्मिष दूर केले. श्लोक क्रमांक 55 पासूनच्याश्लोकातून स्थितप्रज्ञांची लक्षणे सांगण्यास प्रारंभ  केला आहे .कारण अर्जुनाने भगवंताना  "स्थितप्रज्ञस्य का भाषा " म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो ,कसा दिसतो, कसा बोलतो असे संबंधित प्रश्न विचारले होते.
      स्थिरबुध्दी पुरुष हा समस्त कामनांनी रहित आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो.  
    दुःख दायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही .सुखाच्या प्राप्ती विषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय, व क्रोध नाहीसे झाले आहेत,असा मुनी स्थिरबुध्दी म्हटला जातो.
     जो पुरुष सर्व बाबतीत स्नेह शून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा द्वेष ही करीत नाही त्यांची बुध्दी स्थिर झाली.
      कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते ,त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इन्द्रियांच्या  विषयांपासून  इन्द्रियांना सर्व प्रकारे आवरुन घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे.
         इन्द्रियांनी  विषयाचे सेवन न करणार्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात परंतु त्याच्याविषयी ची आवड नाहीशी होत नाही .या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्ति नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इन्द्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुध्दीमान पुरुषांच्या मनालाही जबरदस्तीने आपल्या कडे ओढून घेतात .म्हणून च साधकाने त्या सर्व इन्द्रियांना ताब्यात ठेवून ,चित्त स्थिर करुन,मनाला परमात्म्याचा आधार देऊन ध्यानास बसावे .कारण इन्द्रिये ज्या पुरुषांच्या ताब्यात असतात त्यांची बुद्धी होते. 
    विषयाच्या चिंतनामुळे आसक्ती इत्यादी अवगुणांची उत्पत्ती आणि अधःपतन होते .भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना ! मनासह इन्द्रिये वश करुन मत्परायण न झाल्यास मनाकडून विषयांचे चिंतन घडते .आसक्ती उत्पन्न होते .आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते .कामना पुर्ण झाल्या नाहीत की राग येतो .रागामुळे अविचार उत्पन्न होतो अविचारामुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते .स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुध्दी चा म्हणजे  ज्ञानशक्ती चा नाश होतो आणि बुद्धी चा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो .
      अन्तःकरण ताब्यात ठेवलेला साधक रागद्वेष  यांनी रहित झाल्याने कर्म करणार्यांना  प्रसन्नता प्राप्त होते .त्यामुळे सर्व दुःखाचा नाश आणि त्यांची बुद्धी शीघ्र स्थिर होते .
     मन आणि इन्द्रिये न जिंकणार्यांना पुरुषांच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते अशा पुरुषांच्या अन्तःकरणात आस्तिक भावही नसतो .तसेच भावशून्य माणसाला शान्ती मिळत नाही मग शान्ती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार .
    समुद्रात नौका चालत असते. परंतु वादळ आले की ती नौका भरकटते त्याप्रमाणे इंद्रियांच्या विषयांमध्ये मन गुंतले की ते स्थिर बुध्दीला देखील भरकटत नेते .
      म्हणून हे महाबाहो ! ज्यांची इंन्द्रिये इन्द्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरुन धरलेली असतात त्यांची बुध्दी स्थिर असते .
    सामान्य मनुष्यांना ब्रम्हानंद तसेच तत्ववेत्या पुरुषाला विषयसुख हे रात्रीप्रमाणे असते. मुनी हा शब्द मौन या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे .जो मनुष्य बाहेर बोलणे बंद करुन सतत स्वतःशीच वार्ता लाप.करतो, चिंतन  व मनन करतो तो मुनी. सामान्य माणसापेक्षा मुनी लोकांसाठी  झोपणे आणि जागणे यांच्या व्याख्या पुर्णतः वेगळ्या असतात. परमात्म्याला विन्मुख होणे म्हणजे झोपणे असे मुनी समजतात या अर्थी मुनी लोक सतत जागेच असतात . आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असल्याने मुनी सदैव जागृतच असतो.
       समुद्र अचल आहे. कितीतरी नद्यांचे पाणी येऊन मिळते तरीही त्यांची सीमा बदलत नाही .स्थितप्रज्ञ मनुष्य देखील जीवनातील भोगविलासांनी विचलित होत नाही . मग तोच स्थितप्रज्ञ मनुष्य अंतर्यामी शांती प्राप्त करु शकतो.
        प्रेम आणि ममता यातील सुक्ष्म फरक समजून घेतला पाहिजे .सर्वाशी व्यवहार प्रेमाचा असवा . ममता या शब्दामध्ये मम म्हणजे माझे ,ही स्वामीत्वाची भावना असते .ती काढून टाकून निस्वार्थ प्रेमाचा व्यवहार असला पाहिजे .तरच मनुष्याला शांती प्राप्त होऊ शकते .

एषा ब्राम्ही स्थितीः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेsपि  ब्रह्मनिर्वाणमृच्छति ।।2  .72 ।।
भगवान श्रीकृष्ण शेवटी म्हणतात ब्रम्हाला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे .ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही .आणि अन्तकाळीही या ब्राम्ही स्थितीत स्थिर होऊन ब्रम्हानंद मिळवतो .

प्रश्न 3 :  भगवद्गीतेच्या या अध्यायात आपल्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो ? 
         भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे 'सांख्ययोग' किंवा 'ज्ञानचायोग' हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचा सार आहे .महत्त्वपुर्ण असा अध्याय आहे .
        सांख्ययोगातील एक मध्यवर्ती शिकवण म्हणजे आत्माचे अमरत्व . भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की आत्मा शाश्वत ,अविनाशी. आणि जन्म आणि मृत्युच्या चक्राच्या पलीकडे आहे.भौतिक शरीर तात्पुरते आणि नाशवंत असले तरी, आत्मा अपरिवर्तित आणि शाश्वत राहतो . ही शिकवण जीवन आणि म्रुत्यु बद्दल एक व्यापक दृष्टीकोन देते , जी गीतेचा मुख्य संदेश समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.
      या व्यतिरिक्त कृष्ण आपल्या कर्माच्या परिणामापासून अलिप्त राहण्याच्या गरजेवर भर देतात .ते अर्जुना ला परिणामावर आसक्ती न ठेवता आपले कर्तव्य पार पाडण्याचा सल्ला देतात ,कारण आसक्तीमुळे अनेकदा दुःख होते आणि निर्णय ढगाळ होतो .या अलिप्ततेचा सराव करुन, व्यक्ती निस्वार्थ ता वाढवू शकते आणि परिणामा ऐवजी आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करु शकते .
  कर्मयोगः शिवाय कर्मयोग, कर्ममार्ग अध्यात्मिक प्रगती साध्य करण्याचे एक साधन म्हणून सादर केला आहे .भगवान श्रीकृष्ण फळांची चिंता न करता ,लक्ष केंद्रित करुन कर्तव्य पार पाडण्याचे महत्त्व अधोरेखित करतात .कर्मयोगाचा सराव करुन , आंतरिक शांती मिळवता येते आणि शेवटी ज्ञान प्राप्तीकडे मार्गदर्शन करते .
            या अध्यायात ज्ञानाचे किंवा ज्ञानयोगाचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे .कृष्ण स्पष्ट करतात की आध्यात्मिक प्रगती साठी स्वतः चे ,आत्म्याचे आणि विश्वाचे खरे ज्ञान  अत्यंत आवश्यक आहे .म्हणून , असा समजुतदार पणा दुःख आणि अज्ञानावर मात करण्यास मदत करते ज्यामुळे आंतरिक शांती मिळते .
          कृष्ण विवेकाची चर्चा करतात. ज्याला विवेक म्हणतात वास्तविक आणि असत्य , शाश्वत आणि क्षणभंगुर यांच्यात फरक करण्याची क्षमता हे विवेक आत्म्याच्या शाश्वत स्वरुपावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते , ज्यामुळे भौतिक आसक्तींच्या पलीकडे जाता येते .
         शेवटी ,भगवान श्रीकृष्ण आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीची किंवा स्थितप्रज्ञेची वैशिष्ट्ये वर्णन करतात .अशी व्यक्ती जीवनातील द्वैतांमध्ये सुख आणि दुःख यश आणि अपयश स्थिर राहते .परिणामी ,समतेची ही अवस्था भगवद्गीतेतील आध्यात्मिक साधनाचे एक मध्यवर्ती ध्येय बनते.  

      जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोनः
   आत्म्याच्या अमरत्वाची ओळख आपल्याला आव्हानांना लवचिकतेने तोंड देण्यास सक्षम करते .भौतिक अस्तित्वाचे तात्पुरते स्वरूप मान्य करुन ,आपण आध्यात्मिक विकासाला प्राधान्य देऊ शकतो .आणि आंतरिक शांतीसाठी प्रयत्न करु शकतो .
           अलिप्तता यश आणि अपयशाशी संबंधित भावनिक अशांतता कमी करु शकते. जेव्हा आपण परिणामापासून अलिप्त रा तो तेव्हा आपण संतुलित मानसिकतेने कर्तव्य पार पाडतो ,ज्यामुळे परिस्थिती काहीही असो आंतरिक शांती आणि समाधान मिळते .
       कर्मयोगाला दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे म्हणजे आसक्ती शिवाय निस्वार्थ कृती करणे .परिणामी ,उच्च उद्देशासाठी प्रयत्न समर्पित करुन, आपल्याला काम ,नाते संबंध  आणि वैयक्तिक ध्येयांमध्ये अर्थ सापडतो .
           आध्यात्मिक विकासासाठी ज्ञानाचा शोध घेणे आणि विवेक विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करुन आणि सजगतेचा सराव करुन, आपल्याला शाश्वत आणि तात्पुरते काय आहे यात फरक करण्याची बुद्धी मिळते ,जी शेवटी आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाते .
        स्थितप्रज्ञः समता प्राप्त केल्याने आपल्याला जीवनातील चढ-उतारांना कृपेने तोंड देण्यास मदत  होते. म्हणूनच ही संतुलित मानसिकता जोपासल्याने आपल्याला बाह्य परिस्थिती ची पर्वा न करता शांत राहता येते .
             ध्यान ,प्रार्थना किंवा योग या सारखे दैनंदिन आध्यात्मिक दिनचर्या वाढीचा पाया तयार करते .अशा सरावांमुळे भगवद्गीतेच्या शिकवणी आत्मसात करण्यास मदत होते ,ज्यामुळे स्वतः बद्दल ची आपली समज अधिक खोलवर वाढते .
         निस्वार्थी सेवेत सहभागी होणे , मग ते स्वयंसेवा असो किंवा इतरांना मदत करणे , करुणा आणि सहानुभूती निर्माण करु शकते . हे गुण भगवद्गीतेच्या शिकवणींशी जुळतात .आणि आध्यात्मिक विकासास पुढे मदत करतात .
     भगवद्गीता जीवनासाठी मार्गदर्शकः
           शेवटी , भगवद्गीतेतील ज्ञान जीवनासाठी व्यावहारीक सल्ला देते .या शिकवणी लागू करुन ,आपण वैयक्तिक विकासाला चालना देतो आणि आपल्या खर्या स्वरुपाची सखोल समज प्राप्त करतो. 

       भगवद्गीतेचा दुसरा अध्याय अमूल्य अंतर्दृष्टी देतो  .ज्या आपण आपल्या जीवनात समाविष्ट करु शकतो . या शिकवणी समजून घेऊन आणि आचरणात आणून ,आपण लवचिकता विकसित करु शकतो ,उद्देश शोधू शकतो आणि शेवटी आंतरिक शांती प्राप्त करु शकतो.

Ans 10. अरुषा एरंडे ताई लिहितात....

१. "नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः" या श्लोकाचा अर्थ काय?
"नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः॥"
हा श्लोक भगवद्गीता, अध्याय २,मधील सोळावा  श्लोक आहे. ह्याच अर्थ अतिशय गहन आहे. "असत्" म्हणजे ज्या गोष्टीचे अस्तित्व नाही, त्याचा कधीही भाव (अस्तित्व) होत नाही आणि "सत्" म्हणजे जे खरे आणि शाश्वत आहे, त्याचा कधीही अभाव होत नाही. तत्त्वदर्शी ज्ञानी लोकांनी या दोन्हींचा स्वरूपाने विचार करून त्यांचा अंतिम निष्कर्ष पाहिला आहे." हा श्लोक असत् (नश्वर) आणि सत् (शाश्वत) यांच्यातील भेद दर्शवतो. शरीर नश्वर आहे (असत्) – ते जन्माला येते आणि कालांतराने नष्ट होते. आत्मा शाश्वत आहे (सत्) – तो कधीही नष्ट होत नाही. या श्लोकाचा मुख्य तात्पर्य म्हणजे जीवनात ज्या गोष्टी नश्वर आहेत त्यांना धरून राहण्याचा मोह टाळावा आणि शाश्वत सत्याची ओळख करून घ्यावी.
विनोबा भावे यांनी त्यांच्या "गीताई" या ग्रंथात भगवद्गीतेच्या अध्याय २, श्लोक १६ चा साध्या आणि सोप्या मराठीत सुंदर अर्थ दिला आहे.विनोबा भावे म्हणतात की , "जे खोटे आहे, त्याला अस्तित्व नाही आणि जे खरे आहे, त्याचा कधीही अभाव होत नाही. ह्या दोहोंचा स्वरूपाने विचार तत्त्वज्ञानी लोकांनी केलेला आहे." विनोबा भावे सत्य आणि असत्य यांचा मूलभूत भेद सांगतात.  असत्य गोष्टी (जे क्षणिक आहे, नश्वर आहे) कितीही मोठ्या वाटल्या तरी त्यांना खरा टिकाव धरता येत नाही. सत्य (जे शाश्वत आहे, नष्ट न होणारे आहे) नेहमीच अस्तित्वात राहते. शरीर नाशवान आहे, ते एक दिवस नष्ट होईल, म्हणूनच ते असत्य (असत्) आहे. आत्मा अजर, अमर आणि शाश्वत आहे, त्यामुळे तोच सत्य (सत्) आहे. विनोबाजी जीवनातील तात्त्विक संदेश देतात की माणसाने सत्यावरच टिकून राहावे, कारण खोटेपणा टिकत नाही. आपण शरीरावर नव्हे, तर आत्म्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विनोबा भावे यांचे तत्त्वज्ञान सांगते की, जीवनातील सत्य शोधा, नश्वर गोष्टींमध्ये अडकू नका, आणि शाश्वत सत्याचा स्वीकार करा.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांच्या "गीता रहस्य" या ग्रंथात "नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः" ह्या श्लोकाचा तात्त्विक आणि तात्पर्यपूर्ण अर्थ स्पष्ट केला आहे. "जे अनित्य आहे, त्याला खरे अस्तित्व नाही आणि जे नित्य आहे, त्याचा कधीही अभाव होत नाही. तत्त्वदर्शी ज्ञानी लोकांनी या सत्याचा शोध घेतला आहे." लोकमान्य टिळक ह्यांनी सांख्य आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा संदर्भ घेतला आहे.  त्यांनी या श्लोकाचा अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला आहे. सांख्ययोग आणि वेदांत या तत्त्वज्ञानाच्या आधारे ते सांगतात की नश्वर (असत्) गोष्टींना कायमस्वरूपी अस्तित्व नाही, तर शाश्वत (सत्) गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत. कर्मयोगाचा आधार घेऊन टिळकांच्या मते, हा श्लोक शरीर आणि आत्मा यातील भेद स्पष्ट करतो. शरीर नाशवंत आहे, म्हणूनच ते असत् आहे. आत्मा अमर आहे, शाश्वत आहे, म्हणूनच तो सत् आहे. म्हणूनच माणसाने नश्वर गोष्टींच्या मोहात न अडकता, आपल्या कर्तव्यावर भर द्यावा. श्रीकृष्ण अर्जुनाला हे समजावतात की, युद्धात शरीर मरत असेल तरी आत्मा अमर आहे, म्हणून कर्तव्य पार पाडण्यास मागे हटू नकोस. याचा अर्थ असा नाही की जीवन नश्वर आहे म्हणून निष्क्रिय राहावे, तर कर्तव्यनिष्ठ राहून कर्म करावे. टिळकांच्या भाष्याचे सार म्हणजे या श्लोकाचा अर्थ केवळ अध्यात्मिक नाही, तर व्यवहारिक जीवनातही लागू होतो. भौतिक जगत नश्वर आहे, पण सत्य, धर्म आणि कर्म हे शाश्वत आहेत. म्हणूनच कर्तव्यावर आणि सत्यावर टिकून राहणे हेच जीवनाचे अंतिम साध्य आहे."शरीर नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे. म्हणूनच आपण कर्मावर भर द्यावा, मोहाने किंवा भीतीने आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये." हेच लोकमान्य टिळकांच्या "गीता रहस्य" मधील या श्लोकाचे मुख्य तात्पर्य आहे.

२. श्रीकृष्णाने ‘स्थितप्रज्ञ’ व्यक्तीची लक्षणे कोणती सांगितली? त्यांचे आचरण कसे असावे? 
भगवद्गीतेच्या अध्याय २ (सांख्ययोग) मध्ये श्रीकृष्णाने 'स्थितप्रज्ञ' व्यक्तीची लक्षणे आणि त्याचे आचरण याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. स्थितप्रज्ञ हा असा व्यक्ती आहे, जो मन, बुद्धी आणि वृत्ती स्थिर ठेवतो आणि कोणत्याही परिस्थितीत अढळ राहतो. त्याला सुख-दु:ख, लाभ-हानी, सन्मान-अपमान यांचे काहीच बंधन नसते आणि तो स्वत:च्या आत्मज्ञानात स्थिर असतो.
स्थितप्रज्ञ व्यक्तीचे पहिले लक्षण म्हणजे कामनारहितता आहे. जो सर्व इच्छा आणि वासनांना सोडून देतो आणि आत्मतृप्त होतो, तो स्थितप्रज्ञ असतो.
स्थितप्रज्ञ व्यक्तीचे दुसरे लक्षण म्हणजे सुख-दु:खांमध्ये समत्वबुद्धी आहे. जो दु:खात अस्थिर होत नाही आणि सुखात आसक्त होत नाही, तो स्थितप्रज्ञ असतो.
स्थितप्रज्ञ व्यक्तीचे तिसरे लक्षण म्हणजे राग, भय आणि क्रोधाचा अभाव आहे. जसे की स्थितप्रज्ञ व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा लोभ, भीती किंवा क्रोध नसतो.
स्थितप्रज्ञ व्यक्तीचे चौथे लक्षण म्हणजे बाह्य गोष्टींपासून अलिप्तता आहे. स्थितप्रज्ञ व्यक्ति कोणत्याही गोष्टींमध्ये आसक्त होत नाही आणि चांगल्या-वाईट घटनांकडे तटस्थ वृत्तीने पाहतो.
स्थितप्रज्ञ व्यक्तीचे पाचवे लक्षण म्हणजे कासवसारखी इंद्रियसंयम आहे. जसा कासव आपली इंद्रिये शरीरात ओढून घेतो, तसा जो माणूस आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो स्थितप्रज्ञ असतो.
श्रीकृष्ण अर्जुनाला स्थितप्रज्ञ व्यक्तीचे आचरण कसे असावे हयाविषयी मार्गदर्शन करतात. इंद्रियनिग्रह केल्याने त्याला इंद्रियांच्या सुखाचा मोह नसतो आणि त्याच्या मनात शांती असते. आसक्तीविरहित जीवन जगल्याने त्याला बाह्य गोष्टींची तृष्णा लागत नाही आणि त्याच्या जीवनात स्थिरता असते. स्थितप्रज्ञ व्यक्ति मोहमुक्त आणि आत्मतृप्त जीवन जगतो. जसा समुद्र अनेक नद्या जरी मिळाल्या तरी भरत नाही, तसाच स्थितप्रज्ञ व्यक्ती सर्व इच्छा नियंत्रित करून स्थिर राहतो. जो सर्व वासनांचा त्याग करतो आणि अहंकार सोडतो, त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. स्थितप्रज्ञ व्यक्ती हा मोह, वासना, राग, द्वेष यांच्यापासून मुक्त असतो आणि स्वत:च्या आत्मज्ञानात तृप्त असतो. त्याचे आचरण समत्व बुद्धी, इंद्रियसंयम आणि निर्लिप्तता याने युक्त असते. श्रीकृष्ण सांगतात की, अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला शाश्वत शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी "गीता रहस्य" या ग्रंथात स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या लक्षणांचे आणि आचरणाचे विश्लेषण अत्यंत तात्त्विक व व्यावहारिक दृष्टिकोनातून केले आहे.
टिळकांच्या मते स्थितप्रज्ञ तोच, जो मनातील सर्व इच्छांचा त्याग करतो आणि आत्मतृप्त असतो. टिळकांच्या मते, ही संन्यासाची स्थिती नसून कर्तव्यकर्म करतानाही प्राप्त होणारी स्थिती आहे. स्थितप्रज्ञ व्यक्ती सुखात हुरळून जात नाही आणि दु:खात खचूनही जात नाही. टिळक म्हणतात, ही स्थिती म्हणजे मनाची स्थिरता व आत्मसन्मान, जी कर्मयोगाच्या सहाय्याने प्राप्त होते. स्थितप्रज्ञ व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा लोभ, भीती किंवा क्रोध नसतो. टिळकांच्या मते, कर्मयोगाच्या साधनेतूनच हे  मनोबल प्राप्त होते. स्थितप्रज्ञ व्यक्ती कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांना वश ठेवतो म्हणजे त्यास  इंद्रियसंयम असे म्हणतात .टिळकांच्या मते, ही स्थिती सामाजिक जीवन जगताना आवश्यक आहे; याचा अर्थ इंद्रियदमन नव्हे, तर योग्य नियंत्रण आहे. स्थितप्रज्ञ कोणत्याही परिस्थितीत तटस्थ असतो, त्याला नफा-तोटा, यश-अपयश यांचे काहीही बंधन नसते. त्याच्या ठायी आसक्तिविरहित समत्व बुद्धी असते. टिळक म्हणतात की, ही वृत्ती म्हणजे निष्काम कर्मयोगाचा मूलमंत्र आहे.
स्थितप्रज्ञ व्यक्तीचे आचरण कसे असावे ह्याबाबत टिळकांचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. टिळकांच्या मते, स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे निष्क्रिय, ध्यानमग्न संन्यासी नसून कर्मयोगी असतो. तो समाजात राहून, आपल्या कर्तव्याचे पालन करूनही मनाने स्थिर राहतो.

टिळक म्हणतात, स्थितप्रज्ञ व्यक्ती केवळ योगमार्गाने मोक्ष मिळवण्याच्या प्रयत्नात न राहता, कर्मयोगाद्वारे समाजसेवा करतो. त्याचा कर्तव्यावर अढळ विश्वास असतो. उदाहरणार्थ, श्रीकृष्ण स्वतः युद्धाच्या रणांगणात अर्जुनाला कर्मयोग शिकवत आहेत.
स्थितप्रज्ञ व्यक्ती निष्काम कर्माचा अवलंब करते. स्थितप्रज्ञ व्यक्ती कर्म करते, पण त्याला कर्माच्या फळाची आसक्ती नसते. टिळकांच्या मते, हीच गीतेची मूलभूत शिकवण आहे – कर्म कर, पण फळाची अपेक्षा करू नकोस.
स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या ठायी आत्मनियंत्रण आणि आत्मतृप्तता असते. टिळक सांगतात की, स्थितप्रज्ञ व्यक्ती स्वतःच्या बुद्धीच्या प्रकाशात आणि आत्मज्ञानाच्या आनंदात तृप्त राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून आनंद मिळवण्याची गरज भासत नाही. टिळकांच्या मते, स्थितप्रज्ञ व्यक्तीची ही अवस्था म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. पण हा मोक्ष संन्यासाने नव्हे, तर कर्तव्यकर्म आणि निष्काम कर्मयोगाद्वारे मिळतो.
टिळकांच्या गीता रहस्यातील निष्कर्ष असा आहे की स्थितप्रज्ञ ही निष्क्रिय संन्यासी व्यक्ती नाही, तर समाजात राहून कर्म करणारा योगी आहे. तो निष्काम कर्मयोगाचा आदर्श आहे. जीवनात सुख-दु:ख, यश-अपयश यामध्ये समत्व ठेवून, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करणे, हेच स्थितप्रज्ञ व्यक्तीचे श्रेष्ठतम लक्षण आहे. "स्थितप्रज्ञ म्हणजे मनाने शांत, पण कर्माने सक्रिय असलेली व्यक्ती." "अर्जुनाप्रमाणे कर्तव्य करणे, पण श्रीकृष्णासारखी बुद्धी ठेवणे, हेच स्थितप्रज्ञ जीवन!" 

विनोबा भावे यांनी "गीताई" या पुस्तकात 'स्थितप्रज्ञ' व्यक्तीची लक्षणे आणि त्याचे आचरण याबद्दल साध्या, सहज आणि व्यवहार्य शब्दांत सुंदर विवेचन केले आहे.
विनोबा भावे यांच्या शब्दांत "जो सर्व इच्छांचा त्याग करतो आणि आत्मतृप्त असतो, तो स्थितप्रज्ञ." विनोबाजींच्या मते, हा संन्यास नव्हे, तर आत्मबळाने इच्छांवर विजय मिळवण्याची स्थिती आहे. परिस्थितीवर अवलंबून न राहता, आत्मज्ञानात समाधानी असणे हे स्थितप्रज्ञतेचे पहिले लक्षण आहे. जो सुख-दु:खात समभाव ठेवतो, जो दु:खात व्याकुळ होत नाही आणि सुखात आसक्त होत नाही, तो स्थितप्रज्ञ.विनोबाजी स्पष्ट करतात की, स्थिर मन हेच या स्थितीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सुख आणि दु:ख दोन्ही समान समजणारी वृत्ती म्हणजे स्थितप्रज्ञता.
स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या ठायी राग, भय आणि क्रोधाचा अभाव असतो अथवा मुक्त असतो व त्यावर विजय मिळवतो तोच स्थितप्रज्ञता प्राप्त करू शकतो. विनोबा भावे सांगतात की, हा विजय मन:शुद्धी आणि संयमानेच शक्य आहे. कासव जसे आपले अवयव आत ओढते , तसे इंद्रियनिग्रह व आत्मसंयम करतो, तो स्थितप्रज्ञ. मन आणि इंद्रिये नियंत्रित ठेवण्याची शक्ती ही स्थितप्रज्ञतेचे लक्षण आहे. विनोबाजींनी हा सिद्धांत अत्यंत साध्या भाषेत उलगडून सांगितला आहे जसे ‘इंद्रिये भोगाकडे खेचली जातात, पण जो त्यांना संयमाने रोखू शकतो, तो स्थितप्रज्ञ होतो.’
स्थितप्रज्ञ व्यक्तीचे आचरण कसे असावे हयाबद्दल  विनोबा भावे यांचा दृष्टिकोन अभ्यासण्यासारखा आहे. आपले कर्म करताना आपण निर्लेप राहणे महत्वाचे आहे. "आसक्ती आणि द्वेष यांना सोडून जो कर्म करतो, त्याला स्थितप्रज्ञता मिळते."  स्थितप्रज्ञ व्यक्ती संसारात राहूनही त्याच्याशी जडलेली नसते. कर्म करताना त्याला ‘हे माझे आहे’ असा अहंकार नसतो. इच्छांवर नियंत्रण आणि शांतचित्तता असणे महत्वाचे आहे जसे की "समुद्रात अनेक नद्या मिळतात, पण तो भरत नाही; तसेच जो मनुष्य इंद्रियांचे विषय स्वीकारतो पण त्याच्या मनात अस्थिरता येत नाही, तो स्थितप्रज्ञ." अशी व्यक्ती संसारात असूनही त्याच्यात गुंतत नाही. ही स्थिती आत्मबोध आणि समर्पणातून मिळते. "जो अहंकार सोडतो, त्याला शांती आणि मोक्ष मिळतो."  शांतचित्त आणि कर्मयोगाचा मार्ग यामुळेच स्थितप्रज्ञता प्राप्त होते. ही अवस्था म्हणजे अंतिम मुक्तीची वाटचाल आहे.
विनोबा भावे यांच्या गीतेतील ‘स्थितप्रज्ञ’ संकल्पनेचा सारांश असा आहे की स्थितप्रज्ञ म्हणजे संसारात राहूनही, त्याच्यात न अडकणारी व्यक्ती. त्याचे मन स्थिर, इंद्रिये संयमित आणि बुद्धी तटस्थ असते. सुख-दु:ख, यश-अपयश, लाभ-हानि यांत समत्व राखणे ही स्थितप्रज्ञतेची खरी कसोटी आहे. ही स्थिती आत्मबोध, कर्मयोग आणि संयमाने प्राप्त होते. "स्थितप्रज्ञ म्हणजे जीवनाच्या प्रवाहात वाहत असताना, त्याच्या ओढीत न अडकणारी व्यक्ती." "तो कर्म करतो, पण कर्माच्या बंधनात अडकत नाही." 

३. भगवद्गीतेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो?
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा आजच्या जीवनातील उपयोग हा काळाच्या ओघात अबाधित राहिला आहे. आज भगवद्गीता उपदेश करून हजारो वर्षे झाली तरीही त्यातील जीवन मूल्ये आज काळ बद्दलला तरीही कालबाह्य झाली नाहीत तर आजही प्रेरणेचे स्त्रोत आहेत. 
दुसरा अध्याय (सांख्ययोग) हा भगवद्गीतेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे, कारण तो आध्यात्मिक, मानसिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाच्या रणांगणात कर्तव्य, स्थितप्रज्ञता, समत्वबुद्धी आणि निष्काम कर्मयोग यांचा उपदेश करतात. आजच्या दैनंदिन जीवनात या शिकवणी अत्यंत उपयोगी ठरू शकतात.

गीतेतील विचार निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यास सहायक ठरतात. आजच्या जगात अनेकदा संशय, भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे लोक निर्णय घेऊ शकत नाहीत. जर व्यक्तीची वैचारिक बैठक पक्की असेल जसे आपले महान ग्रंथ ह्यांचे वाचन, चिंतन,मनन आणि अनुसरण केले तर आपल्या प्रत्येक दैनंदिन समस्यांवर नक्कीच तोडगा मिळू शकेल. श्रीकृष्ण सांगतात की, निर्णय घेताना भावनिक दुर्बलता टाळा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. कार्यक्षेत्र, शिक्षण, वैयक्तिक जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी ही शिकवण महत्त्वाची आहे.
सुख-दु:खात समत्वबुद्धी ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही अपरिहार्य आहेत. श्रीकृष्ण सांगतात की, सुख-दु:ख, यश-अपयश हे तात्पुरते आहेत. त्यांच्यावर अत्यधिक प्रतिक्रिया देऊ नका. जसे की आपण सुखात हुरळून जाऊ नये आणि दुखात खचून जाऊ नये. व्यवसाय, परीक्षा, खेळ किंवा नातेसंबंधांमध्ये हा दृष्टिकोन आत्मसात केल्यास आपले मानसिक संतुलन राखता येईल.
व्यक्तीने कामाच्या फळाची अपेक्षा न करता कर्म करणे जसे की निष्काम कर्मयोग करणे अपेक्षित आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात, लोक काम करताना फक्त निकालाचीच चिंता करतात, त्यामुळे तणाव वाढतो. श्रीकृष्ण सांगतात की, तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याचे फळ तुमच्या हातात नाही. आपले कर्म करतांना आपण फक्त कर्माच्या गुणवत्तेवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. कर्माची गुणवत्ता जर उत्तम असेल तर आपोआप कर्माचे फळ चांगले मिळेल हयात शंका नाही. विद्यार्थ्याने त्याचा अभ्यास उत्तम करणे, नोकरदाराने व व्यावसायिकाने आपले काम व आपला व्यवसाय सचोटीने करणे गरजेचे आहे. विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी हा धडा फार उपयुक्त आहे.
गीतेची शिकवण आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास, इंद्रियसंयम आणि मानसिक स्थैर्य प्राप्त करण्यास उपयुक्त आहे. आजच्या काळात सोशल मीडियाचे अधिराज्य लोकांच्या मनांवर असताना मन विचलित होणे, क्रोध, लोभ, मोह वाढणे, इंद्रियांचा अमर्याद वापर यामुळे लोक भरकटतात. व्यक्ती सारासार विचार करण्यास असमर्थ ठरते व त्यातून अनेक दुष्कृत्यांचा उदय होतो. माणुसकी लयाला जाण्याचा धोका निर्माण होतो. श्रीकृष्ण सांगतात की, स्थितप्रज्ञ व्यक्तीप्रमाणे वागा – इंद्रियांवर नियंत्रण ठेवा आणि अतिरेक टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करणे, तरुणांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाणे, हे यातून शिकता येईल.
संकटांच्या वेळी मानसिक स्थैर्य टिकवणे अथवा स्थितप्रज्ञता अंगीकारणे हे आपल्याला गीता शिकवते. जीवनात अनेक आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक संकटे येतात.
श्रीकृष्ण सांगतात की, समुद्र जसा नद्यांनी भरत असला तरी स्थिर राहतो, तसा आपण बाह्य परिस्थितींनी अस्थिर होऊ नये. शांत, संतुलित आणि स्थिर बुद्धीने निर्णय घेणे व संकटातून मार्ग काढणे व इतरांस मदत करणे गरजेचे आहे. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, ह्या उक्तीचा अंगीकार करणे महत्वाचे आहे. नेतृत्व, व्यवस्थापन आणि वैयक्तिक जीवनात ही शिकवण फार महत्त्वाची आहे.
गीतेतील शिकवणीमुळे आत्मपरिक्षण आणि आत्मविकास ह्यासाठी भरपूर वाव आहे.  श्रीकृष्ण सांगतात की, जो व्यक्ती राग-द्वेष टाळतो आणि आत्मसंयम पाळतो, त्याला शांती मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक मानसिक तणाव, चिंता आणि असंतोषाने त्रस्त आहेत. स्वतःला ओळखणे ,स्वतःची क्षमता, स्वतःचे गुण, आवड ओळखून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा योग्य दिशेने वाटचाल करून स्वतःचा विकास साधून इतरांचे कल्याण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. योग, ध्यान, आत्मसंयम आणि सकारात्मक विचारसरणी यांचा अवलंब केल्यास मनःशांती मिळू शकते.
श्रीकृष्ण सांगतात की अहंकाराचा त्याग केल्यास आपण शांतीचा मार्ग प्राप्त करू शकतो. अहंकार, लोभ आणि मोह यामुळे माणूस दुःखी होतो. श्रीकृष्ण सांगतात की, जो व्यक्ती या गोष्टी सोडतो, त्यालाच खरी शांती मिळते. व्यावसायिक क्षेत्रात, नातेसंबंधांमध्ये आणि समाजसेवेत याचा उपयोग होतो.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील तत्त्वज्ञान आजच्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही शिकवण आत्मसात केल्यास जीवन अधिक समतोल, आनंदी आणि यशस्वी होईल.  

Ans 11. मेधा पोफळी ताई लिहितात....

प्रश्नोत्तरे क्रमांक  4 
प्रश्न  1 ला ''नासतो विदयते भावो,  नाभावो विदयते सत: याश्लोकाचा अर्थ काय? 
उत्तर हा सांखययोगातला 16 वा श्लोक आहे.  या श्लोकाचा अर्थ असा की असत वस्तु ला असतीतव नाही आणि सत वस्तु चा अभाव नसतो अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरुप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. जे असत आहे ते केव्हा ही सत होत नाही व जे सत आहे ते केव्हा ही असत होत नाही. याचा अर्थ असणारे ते असणारच व नसणारे ते नसणारच. असा या दोहोंचा तत्व ज्ञानांनी सिध्दांत बांधीला आहे. सताचा भाव व असताचा अभाव हा नेहमी टिकणारा आहे. आत्मा सत स्वरुपी आहे. त्याचा शोक नको आणि सुखदुःखदी विकार अनित्य असल्याने त्यांच्या
 नाशाचाही शोक नको. या वरुन अर्थ सिद्ध झाला.  
प्रश्न  2  श्रीकृष्णाने 'सितथप्रज्ञ वयकतीची लक्षणे कोणती सांगीतली आहे? 
उत्तर हा स्थिर बुध्दी चा असतो.असा मनुष्य मनात असलेल्या सर्व कामनांचा त्याग करतो.  आणी स्वतः स्वतः मध्ये संतुष्ट राहतो त्या वयकतीचे बोलणे साधारण क्रिया रुपाचे नसते तर भाव रुपाचे असते. दुःख झाल्या नंतरहीत्याच्या मनात उद्वेग निर्माण होत नाही.सुख मिळाल्या वरही कोणत्याही प्रकारची ईच्छा निर्माण होत नाही. जो मनुष्य अनुकुल परिस्थिती मधे आनंदीत होत नाही आणि प्रतिकुल परिस्थिती प्राप्त झाल्यावर वाईट वाटुन घेत नाही. सांगायचे असे की कासव ज्या प्रमाणे आपल्या अंगाचे आकुंचन करुन बसतो त्या प्रमाणे मनुष्य आपली सर्व इंद्रिये आपल्या विषया पासुन दुर करतो त्याची बुध्दी स्थीर झालेली असते. असा सिथतप्रज्ञ मनुष्य सदा तृप्त असतो,  दयाळु असतो 
स्थितप्रज्ञाचे आचरण कसे असावे?  उत्तर  1आचरण शुद्ध असावे  2 त्याला न आवडणारा मनुष्य जरी जवळ आला तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते.3  आत्मसंतुष्ट असतो तो योग्य असाच निर्णय घेतो  4 त्याच्या मनात क्रोध निर्माण होत नाही  5  त्याचे स्वतःवर नियंत्रण असते  6 तो मनुष्य मोजकेच असे बोलतो  7 तो सदा प्रसन्न चित असतो  8 तो निश्चय बुध्दीअसतो 9 कोणत्याही परिस्थितीत तो विचलीत होत नाही  10 अंतःकरण प्रसन्न असल्याने बुद्धीलवकर सिथर पावते 
प्रश्न  3 याअधयायाचा जिवनात कसा उपयोग होतो? 
उत्तर सर्वात्महतवाचे म्हणजे जिवनाला नवी दिशा मिळते. कोणती गोष्ट योग्य की अयोग्य हे समजण्याची शक्ती येते म्हणजेच निर्णय शक्ती येते. आणी मनुष्यामधे शिस्त बदधता येते कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तो विचार पूर्वक करतो.  चांगले आणि वाईट याची पारख करतो. मोजकेच शब्द बोलतो आणि दुःख सहन करण्याची शक्ती येते.  तो मनातील इच्छा सोडुन स्वताचे ठिकाणी रममाण होतो.  त्यालादुःखाचे काही वाटत नाही आणि सुखाचेही काही वाटत नाही. प्रेम भय क्रोध इत्यादी विचार नाहिसे होतात.  तो वासना रहित होतो.  आसक्ती निर्माण होत नाही म्हणुन तो क्रोध रहित होतो आणि आपले मन ताब्यात ठेवतो. चित्त प्रसन्न राहते मर्यादाचे उलघाल करीत नाही.  तो मोहात गुंतत नाही अंतकालीही तो स्थिर राहतो.  अशा प्रकारे सांखययोगाचा आपल्या जिवनात उपयोग होतो.

Ans.12. माणिक थोरात ताई लिहितात...

प्रश्न1   नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः या श्लोकाचा अर्थ सांगा ?
         अध्याय 2 श्लोक क्र 16 तत्वदर्शी पुरुष जे आहेत त्यांनी असा नीष्कर्ष काढला आहे जे असत् आहे (भोतिक शरीर) ते चिरकाल टिकू शकत नाही अन् जे सत् आहे (जीवात्मा)ते कधीच बदलत नाही नाश पावत नाही परिवर्तनशील शरीर स्थायी नसते आधूनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विवीध प्रकारच्या पेशींच्या क्रिया प्रतिक्रियाने क्षणोक्षणीशरीर बदलत असते याप्रमाणे शरीराला बाल्य तारुण्य वृद्धत्व याअवस्था प्राप्त होतात पण त्याबरोबरआत्म्याचे स्थित्यंतर होत नाही आत्मा स्थायी असतो शरीर बदलतेआत्मा शाश्वत असतो 
   या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील तात्पूरते आणि शाश्वत भेद स्पष्ट केले आहेत भौतिक वस्तू व शरीर तात्पूरते आहे त्याचे अस्तित्व नष्ट झाले आहे तर आत्मा शाश्वत सत् नित्य अजन्मा अवैध आहे अशा प्रकारे जीवनातील सत्य समजाउन घेटले पाहीजे 
प्रश्न 2—श्रीकृष्णाने स्थिरप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे कोणती सांगीतली? त्यांचेआचरण कसे असते? 
उत्तर—अध्याय दोन श्लोक 54 मध्ये अर्जुनाने भगवंताला स्थिरप्रज्ञा (स्थिरबुद्धि)व्यक्तीची लक्षणे कोणतीअसतात असाप्रश्न विचारला असता श्लोक क्र55 पासून 59 पर्यंत स्थिरप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगीतली आहेत 1— हा पुरुष मनातील सर्व ईच्छा व कामनांचा त्याग करतो  स्वतःच्या आत्म्यानेच आत्म्याच्या ठीकाणी संतूष्ट राहतो तोआपली आंतरिक शांती वआत्म्याचे सत्य ओळखतो तो बाह्य जगाच्या ईच्छांच्या पलीकडे जातो व आत्मसमाधान अनुभवतो (श्लोक55)
  दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही अथवा सीखप्राप्तीची ज्याला मुळीच ईच्छा नसते  परिणामी सुखाने तो हुरळून जात नाही अथवा दुःखाने हतबल होत नाही ज्याचे प्रिती भय क्रोध नाहीसे झालेले असतात असा पुरुष स्थिरबुद्धी समजावा (श्लोक56)
 शुभ अथवा अशुभ घटना घडल्यास तो प्रसन्नही होत नाही अथवा द्वेशही करत नाही (श्लोक57)
 कासव ज्याप्रमाणे आपले अवयव प्रसंगी आत घेते त्याप्रमाणे स्थिरबुद्धीचा पुरुष विषयांपासून आपल्या इंद्रीयांना आवरुन घेतो 
(श्लोक क्र 58)
इंद्रीयांनी विषयाचे सेवन करणार्‍या पुरुषाचे वरवर विषय देर होतात पण पण मनात त्याच वीषयाचे चींतन असते  परन्तु परमात्म्याच्या साक्षात्काराने स्थिरबुद्धी पुरुषाची सर्व विषयाची आसक्ती नष्ट होते 
 स्थिरबुद्धी पुरुषाचे आचरण —स्थिरबुद्धि पुरुष सर्व ईच्छा आकांक्षा यांचा त्याग करुन तो सदैव अतःकरणार समाधान मिळवतो  त्याच्यात द्वेष ईर्षा ,भय ,क्रोध यांचा लवलेशही नसतो तो आपली नियत कर्मे करतो पण त्यात अडकून पडत नाही  ईंद्रीयांच्या अहारी जाऊन तो विषयांचे सेवन न करता तो ईंद्रीयांना आपल्या ताब्यात ठेवतो यश अपयश सुख दुःख शुभ अशुभ या प्रसंगात तो समत्वभावाने वागतो  दुःखाने होरपळून जात नाही अथवा सुखानेहुरळून जात नाही 
प्रश्न 3—भगवद्गितेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो ?
ऊत्तर—भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाच्या निमित्त्ताने मानवजातीला जोऊपदेश केला तो आजच्या या युगातही ऊपयोगी पडतो 
दुसर्‍या अध्यायाच्या सुरवातीलाअर्जुन स्वकियांबरोबर युद्ध करण्यास तयार नव्हता तेव्हा भगवंत अर्जुनाला क्षत्रधर्माचे पालन करण्यास सांगून युद्धार प्रवृत्त करतात यावरुन अन्याय करणारा अधर्माने वागणारा समाजास त्रासदायक ठरणारा आपला कीतीही जवळचा असला तरी त्यावर दया करण्यातअर्थ नाही खून,अफरातफर करणारे मुलींबरोबर गैरवर्तन करणारे यांना वेळीच शिक्षा केलीच पाहीजे ते जवळचे असले थरीही 
  शरीर नाशवंत असून आत्मा शाश्वत नीत्य अजन्मा सत् आहे युद्धास अर्जुनाला प्रवत्त करताना भगवंतानी त्याच्या मनावर हे तत्वज्ञान ठसवले मृत्यू अटळ आहे मृत्यू फक्त शरीराचा होतो आत्मा अमर आहे तो नवीन देह धारण करतो तेव्हा मृत्यूचा शोक करु नकोस आजही या तत्वज्ञानामुळेच जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास माणूसत्या दुःखातून बाहेर येऊ शकतो 
   फळाची अपेक्षा न करता आपल्या कर्तव्याचे  पालन करणे कर्म ईश्वराला अर्पण करुन आपण त्या कर्मबंधनात न अडकणे हा निःष्काम कर्मयोग आजही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ऊपयुक्त आहे विद्यार्थी कामगार शीक्षक डाॅक्टर वकील शेतकरी या सर्वानीच आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तव्याचे निःष्कामपणे पालन केले तर सर्वच क्षेत्रात माणूस प्रगतीची शीखरे गाठील यात शंका नाही


Ans 12. भारती शेटे यांनी लिहिलेले उत्तर.....

१. "नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः" या श्लोकाचा अर्थ काय?
श्लोक थोडा तत्त्वज्ञान विषयक आहे येथे शरीर आणि शरीर शरीरी यामधील फरक स्पष्ट केला आहे जसे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे आकाश पाणी वायू अग्नी आणि माती या सर्वांनी मिळून हे शरीर बनलेले आहे म्हणून ते नाशिवंत आहे पण या शरीरामध्ये बसणारा शरीर म्हणजे आत्मा हा नित्य आहे तो सत्य आहे आणि तो पुन्हा पुन्हा नष्टही होत नाही आणि तो तसाच पुढे पुढे फक्त देह बदलत राहतो ही गोष्ट खऱ्या साधकांनी गाठीशी धरली पाहिजे असे येथे सांगितलेले आहे शरीर इंद्रिय मन बुद्धीसहित संपूर्ण संसाराचा अभाव आहे केवळ परमात्माच सत्ता आहे आणि परमात्म्याची सत्ता ही आत्म्याच्या अधिक्याने चालते आणि त्याचे असणे आपण ओळखले पाहिजे असा या श्लोकाचा अर्थ आहे
२. श्रीकृष्णाने ‘स्थिरप्रज्ञ’ व्यक्तीची लक्षणे कोणती सांगितली? त्यांचे आचरण कसे असावे. 
स्थीतप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगताना भगवान श्रीकृष्णांनी याचे विवेचन 56 व्या श्लोकापासून तर जवळपास 70 व्या श्लोका पर्यंत केले आहे.
येथे त्यांनी कुठल्याही गोष्टीची इच्छा मनामध्ये धरून कुठलेही काम करू नका असे सांगितले आहे म्हणजेच मनामध्ये कामना नसावी आपण घराची स्वच्छता करत आहोत म्हणजे ते घर आपल्यालाच मिळालं पाहिजे असा हट्ट अजिबात नसावा कुठल्याही गोष्टीची इच्छा कुठल्याही गोष्टीचा मोह माया ममता हे हळूहळू कमी केले पाहिजेत तसेच राग कमी करावा मनामध्ये संयम खूप जास्त बाळगावा इंद्रियांचे संयमन करण्याविषयी साधकाने प्रयत्न करावा तो प्रयत्न अक्षरशः जसा कासव आपले सर्व अवयव आत मध्ये ओढून घेतो त्याप्रमाणे असावा, कोणत्याही गोष्टीचे दुःख करू नये अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तरीही त्याचे दुःख करू नये कारण त्याचे शरीर जे कार्यक्रम होते ते संपते पण त्याचा आत्मा मात्र आपल्यामध्ये सामावून जातो त्याची आठवण पण जरूर करावी पण त्याच्यासाठी सर्व क्रियाकलाप सोडून देऊ नये. संसारिक मनुष्य रात्रंदिवस भोग आणि संग्रह करत राहतो तो त्याने कमी करावा अनेक प्रकारचे कला कौशल्य आपण शिकावे पण लौकिक वस्तूंच्या प्राप्तीला आपली प्रगती न मानता थोडाफार देवतांची उपासना करावी मंत्र जप करावा त्यामुळे आपल्याला पुढे आत्म्याची उन्नती साधण्याचा प्रयत्न करता येईल सगळ्यात शेवटी सर्व कर्मे भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी अर्पण करून आपण जय पराजय लाभ आणि सुखदुःख यांना समान समजून आपले कर्तव्य कर्म करण्याचाच विचार करावा असे स्थितप्रज्ञ माणसाचे वागणे असते असे येथे सांगितले आहे
३. भगवद्गीतेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो?
आजचे हे कलियुग आहे आज लोक खूपच कामातुर झालेले आहेत. त्यांना आपले काय आणि दुसऱ्याचे काय हेही समजत नाहीये तर दुसऱ्याच्या वस्तू सुद्धा ओढून घेऊन त्या आपल्या म्हणून दाखवून त्यात लोक आनंद व्यक्त करत आहेत ही खरोखरीच खूप चुकीची गोष्ट आहे पण म्हणून दुसऱ्याने ते पूर्ण गोष्ट सोडूनच देऊ नये किंवा मला नाही मिळाले तर शेवटी देवाचा आधार तर असतोच पण कुठेतरी एक मर्यादा पाहिजेच. सर्वांच्या इच्छा या संपतच नाही येत त्या इच्छा माणसाने कमी केल्या पाहिजेत आयुष्यातून आपल्या कामना कमी कराव्यात म्हणजे आपल्याला सुख समाधानाने आणि आनंदाने जगता येईल. क्रोधावर नियंत्रण मिळवले पाहिजे क्रोधामुळे बरेच अनर्थ घडतात स्मृती भ्रांश सुद्धा होतो. तो न होण्यासाठी आपण क्रोध कमी केला पाहिजे आणि क्रोध कमी करण्यासाठी आपण आपल्या इंद्रियांचा म्हणजेच कामनांचा निग्रह केला पाहिजे आता इंद्रिय म्हणजे तर खूप मोठा विषय होतो केंद्रीय म्हणजे पाच इंद्रिय कर्ण डोळे जीभ त्वचा आणि पाय हे पाचही इंद्रिय जिकडे जातील तिकडे बघतील आणि जे चांगलं आहे ते सगळं मला पाहिजे अशी इच्छा निर्माण होते मनात ती इच्छा कमी केली पाहिजे किंवा फारश्या चांगल्या गोष्टी पाहूच नयेत असे नाही चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत पण त्या गोष्टी मला मिळाल्याच पाहिजेत त्या माझ्या झाल्याच पाहिजेत असा मनामध्ये विकार बाळगू नये त्या गोष्टी पाहिल्यावर आपण ते खूप छान आहे एवढं म्हणावे पण ते सगळं मला मिळालंच पाहिजे अशी कामना करू नये असे येथे भगवान श्रीकृष्णांचे उपदेश सध्याच्या समाजाला अतिशय उपयोगी आहे.

Ans. 13. निलम तरवडे यांनी लिहिलेले उत्तर...

*प्रश्न १. "नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः" या श्लोकाचा अर्थ काय?*
उत्तर  : हा भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातील सोळावा श्लोक आहे. भगवंत अर्जुनाला समजावतात की, जी वस्तु असत् आहे तिला अस्तित्वच नसते अभावाला अस्तित्व नाही कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते जी वस्तू नसतेच तिला थांबवता येत नाही जी वस्तुसत म्हणजे सत्य आहे तिला अस्तित्व असते व ती तिन्ही काळात नाहीशी होत नाही तिला कोणी नष्टही करू शकत नाही परमतत्व परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्यामध्येच स्थित असणाऱ्यांना तत्त्वज्ञानी म्हटले आहे ज्याने हे जग व्यापिले आहे व ज्याच्यापासून हे जग विस्तारले आहे ते मूळ आत्मतत्त्व नाश रहित आहे.

 *प्रश्न २ श्रीकृष्णाने स्थिरप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे कोणती सांगितली? त्यांचे आचरण कसे असावे?*
उत्तर : स्थिरप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य मनामध्ये असलेल्या सर्व इच्छांचा त्याग करून स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट असतो ज्याचे मोह भय क्रोध हे नष्ट झालेले आहेत जो मननशीलतेच्या अंतिम सीमेपर्यंत पोहोचला आहे जो पुरुष स्नेह रहित झालेला आहे म्हणजे जो सर्व गोष्टीत अनासक्त असतो शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही त्याची बुद्धी स्थिर झालेली असते जे परमात्मा स्वरूप आहे जे मनाला परमात्म्याची आस लावते ते शुभ आहे स्थिरप्रज्ञ पुरुष मात्र अनुकूल परिस्थितीने प्रसन्न होत नाही व प्रतिकूल परिस्थितीने विषण्ण होत नाही कारण प्राप्त होणारी वस्तू त्याला स्वतःपेक्षा भिन्न वाटत नाही तो संपूर्ण निरीक्ष झालेला असतो पतीत करणारे विकारही त्याला विचलित करू शकत नाहीत. म्हणजेच साधनेचे त्याला काही प्रयोजन उरलेले नसते अशा व्यक्तीला स्थिरप्रज्ञ व्यक्ती म्हणतात स्थिर प्रज्ञा पुरुष स्थिर असल्यामुळे आपल्या चंचल इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमीत करू शकतो अशा व्यक्तीला विषयांची आसक्ती राहत नाही.

 *प्रश्न ३ भगवद्गीतेचा या अध्यायाचा आजच्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो?*
उत्तर : भगवद्गीतेद्वारे भगवंताने सर्व मानव जातीला जीवन जगण्याची कला व जीवनाचे सार यांचा उपदेश केला आहे गीतेचा या दुसऱ्या अध्यायाचा संदेश आजच्या पिढीला खूप काही शिकवतो मानवी जीवन स्थिर ठेवण्यासाठी विषयांची आसक्ती न ठेवता फळाची अपेक्षा न करता निष्काम कार्य करणे, कासवाप्रमाणे सर्व इंद्रिय आत मध्ये अकसून घेऊन म्हणजे इंद्रिय निग्रह म्हणजे सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून समभाव वृत्तीने कार्य कर्तव्य कर्म करीत राहणे व आनंदी जीवन जगणे हे शरीर नश्वर आहे आत्मा तर अमर आहे त्याला कोणीही मारू शकत नाही प्रत्येक मानवाने आपल्या धर्माचे पालन करणे व परिस्थिती किंवा प्रसंगाप्रमाणे धर्माचे पालन करणे भौतिक सुखाच्या मागे न लागता भगवंतावर श्रद्धा व विश्वास ठेवून त्यालाच स्मरण करून त्याने दिलेले कर्म त्यालाच अर्पण करणे मानव परम स्वरूपाला प्राप्त होणाऱ्या मार्गाने जाण्यास प्रवृत्त होतो क्रोधावर नियंत्रण येते असा उपयोग होऊ शकतो.

Ans. 14. सौ.राजस बंगाळ

 प्रश्नोत्तर क्रमांक 4. प्रश्न पहिला.उत्तर  असत् वस्तू म्हणजे भौतिक शरीर.हे चिरकाल टिकू शकत नाही, आणि सत्य वस्तू म्हणजे आत्मा तो मात्र चिरकाल टिकतो.आत्मा अमर आहे.त्याला ना मृत्यू ना जन्म.आत्म्याला कोणी मारु शकत नाही.अग्नि जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही,कि वारा त्याला सुकवू शकत नाही.आत्मा हा स्थिर असतो.त्याच्यामध्दे परिवर्तन होत नाही.शरीर जसे बालपणातून तारुण्यात येते, आणि तारुण्यातून ते वार्धक्यात जाते.म्हणजेच शरीर हे परिवर्तनशील आहे, आणि आत्मा हा स्थिर आहे,अमर आहे.भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील हा सोळावा श्लोक आहे.शरीरातील परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.शरीर हे असत् आहे आणि आत्मा हा सत् आहे.
शरीर नष्ट झाले तरी आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो 
जसे वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपऽराणि.जीर्ण वस्त्र टाकून नविन वस्त्र शरीर  धारण करते  त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नविन शरीरात प्रवेश करतो.जी वस्तू सत् आहे तीचा कधीच अंत होत नाही.जेंव्हा देह उत्पन्न झाला नव्हता तेंव्हा सुध्दा आत्मा होता.आपल्या देहाचे परिवर्तन होते पण देही म्हणजे आत्मा हा चिरंतन आहे.आपले आप्त स्वकीय मारले जातील या भितीने अर्जुन युद्ध नाकारतो पण भगवान म्हणतात हे अर्जुना! तु त्यांना मारले नाही तरी सुद्धा ते मरणारच आहेत.त्यांच्या शरीराला जरी नष्ट केले तरी त्यांचा आत्मा अमर आहे.

प्रश्न 2=उत्तर=भगवत गीतेच्या अध्याय 2 मध्ये श्लोक 55 ते 64 पर्यंत भगवंताने स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे सांगितली आहेत.मनुष्य जेंव्हा आपल्या कामवासनाचा  त्याग करून आपल्या मनाला स्वतःच्या आत्म्यामध्ये संतोष मानतो त्या माणसाला स्थिरप्रज्ञ म्हणतात. भगवंत म्हणतात जेंव्हा माणसाचे मन सुख अथवा दुःख काहीही प्राप्त झाले तरी विचलित होत नाही,त्याची बुद्धी स्थिर राहते,त्याच्या स्वतःच्या मनावर त्याचे नियंत्रण राहते अशा माणसाला स्थिरप्रज्ञ म्हणावे.असा मनुष्य स्थिर बुध्दीचा मुनी समजला जातो.दुःखाने तो होरपळत नाही की सुखाने, आनंदाने तो हर्षित होत नाही. अशा माणसाला स्थिरप्रज्ञ म्हणावे.

प्रश्न 3 चे उत्तर=भगवत गीतेच्या या अध्यायाचा जीवनात फार उपयोग होतो.कर्मण्ये वाधिकारस्ते  मा फलेषु कदाचन 
.या उक्ती प्रमाणे माणसाने फळाची आशा न धरता कार्य केले पाहिजे.अमुक गोष्ट केली तर आपल्याला खूप फायदा होईल हे न पाहता या गोष्टी पासून समाजाला त्याचा काय फायदा होईल हे पाहणे उचित होईल.यामुळे आपला समाज कसा पुढे जाईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे 
 फळाची आशा धरु नका नेहमी सत्कर्म करीत रहा हाच संदेश गीतेने दिला आहे.हिच शिकवण आपल्याला या अध्यायातून आपल्याला मिळते.

Ans.15. कल्पना बागडे ताई लिहितात....

प्रश्न आमचा उत्तर तुमचे प्रश्न  मालिका क्रमांक ४  नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि  द्रुष्टो-न्तस्वनयोस्तत्वदर्शभिः       या श्लोकाचा अर्थ काय ? उत्तर ः न असतः विद्यते भावः न अभावः विद्यते सतः उभयोः अपि द्रुष्टः अन्तः तु अनयोः तत्वदर्शिभिः असत वस्तुलाअस्तित्व नाही (भौतिक शरीर ) आणि सत वस्तुचा अभाव नसतो  अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहीले आहे  तात्पर्य ः आपल जे भौतिक शरीर हे कधीही कोणत्याही परिस्थितीत स्थायी  (कायमचे)  नसते  आपल्या शरीरातील पेशींच्या क्रिया प्रतिक्रिया मुळे प्रत्येक क्षणाला बदलत असते त्याच्या अनुषंगाने शरीराची वाढ घट  तारुण्य म्हातारपण येत असते  आपल्या मनामध्ये सुद्धा सतत विचार बदलत असतात म्हणजे हे शरीर नाशिवंत आहे पण या शरीरात राहाणारा शरीरी  (आत्मा  ) तो पदार्थ ते तत्व  अविनाशी अखंड अविकारी स्थायी आहे तो कालही होता आजही आहे आणि उद्या ही असणार आहे  त्या मध्ये काहीही बदल होत नाही हे तत्वज्ञानी पुरुष  जाणतो  बोध ः   शरीराचा लय झाला तरीही आत्मतत्व सदैव आहे म्हणुन त्याचा दुःख नाही केले पाहिजे  

प्रश्न २ ः श्रीकृष्णाने स्थिरप्रज्ञ व्यक्ती ची लक्षणे कोणती सांगितली ?आहेत त्यांचे आचरण कसे असावे  उत्तर ः   श्लोक२/५५ भगवंत अर्जुनाला सांगतात हा पुरुष  ( स्थितप्रज्ञ )मनातील सर्व कामनांचा पुर्णपणे त्याग करुन स्वतः स्वतः मध्ये संतुष्ट राहातो तेव्हा तो स्थितप्रज्ञ असतो श्लोक२/५६ स्थिरबुद्धी असलेला पुरुष अनुद्वीग्न सुखांमध्ये निःस्पूह आणि शुभाशुभाच्याप्राण झाले तरी तो सुखदुःख, जय परजय,प्राप्य अप्राप्य ईःद्वंदा पासुन आलिप्त असतो त्याची आसक्ती भय क्रोध नष्ट झालेले असतात सुखामध्ये दुखाःमध्ये समत्व असतो त्यांच्या प्रिती भय क्रोध ईः भावनां नाहीशा झलेल्या असतात असा मुनी स्थिरबुद्धी म्हणून ओळखला  जातो श्लोक २/५७भगवंत सांगितले आहे की जो पुरुष सर्व जीवनातील प्रत्येक प्रसंग गात स्वतःला आलिप्त ठेवतो तो स्थिरबुद्धी असतो बोध ःआपणही जीवनातील सर्व प्रसंगात स्थिरबुद्धी राहुन  निर्णय घेतला पाहिजे      

  प्रश्न ३ रा ः भगवद्गीतेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो       उत्तर ः   आपल्या जीवनात सदैव संयोग वियोग क्रिया सूरु असतात  आपण आपल्या शरीराला मी ,माझे ,मला बद्यल विचार करत असतो पण शरीर तर नाशवंत आहे जो जल्माला आला त्याला मुत्यु अटळ आहे  हे समजून घेऊन आत्मचिंतन केले पाहिजे मीजे खातो पितो उठतो बसतो काहीही कर्म करतो ते करणारा कोण आहे शरीर आहे कि मी आहे जे असत् आहे ते शरीर आहे जे सत् आहे तो मी आहे  आत्मा अमर ,अविनाशी अखंड  चीरस्थायी आहे त्या ची उत्पत्ति स्थिती लय  होत नाही    आपण मोह माया लोभ ई सोडून स्तथप्रज्ञे राहून  बाह्य परिस्थिती अनुकूल असो नाहीतर प्रतिकूल असो तरीही आपण प्रत्येक क्षणी शांत राहून योग्य अयोग्य चा विचार करुन कर्म केले पाहिजे  भौतिक पदार्थ ,विषय ,वस्तु या मध्ये अडकून न राहता सत्याच्या ,धर्माच्या बाजूने जीवन जगल पाहिजे  कासवा प्रमाणे आपल्या ईंद्रियांचे विषय वस्तु पदार्थ याच्यावर आपले नियंत्रण ठेवून मनाच्या अधिपत्याखाली वापर केला पाहिजे आणि मी जे काही कर्म करतो ते माझ्या तील परमेश्वर करत आहे त्याचे कर्म त्याला परमात्मा ला समर्पित करावे अशाप्रकारे आपल्या तील अहंभाव नाहीसा होण्यास मदत होईल मी जे काही करतो ते सर्व

Ans 16. सुभाष कुलकर्णी यांनी लिहिलेले उत्तर 


प्रश्नोत्तरे क्रमांक ४                                             १ -- १ -- "नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते संत: या श्लोकाचा अर्थ काय?
उत्तर -- अध्याय २ रा श्लोक क्रमांक १६
नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते संत:
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: 
म्हणजे -- असत् (अशाश्वत) वस्तुला अस्तित्व नाही आणि सत् (शाश्वत) वस्तुचा अभाव नसतो. अशा रितीने या दोहोचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषानी पाहिले आहे.
नासतो विद्यते भावो --- शरिर हे असत् आहे, शरिर भूत, भविष्य आणि वर्तमान या तीनही काळात भाव रूपाने राहात नाही म्हणून हे असत् आहे.त्याच प्रमाणे संसाराचा ही भाव नाही ते ही असत् आहे. संसार काळरूप अग्नी मध्ये लाकडासारखा निरंतर जळत असतो. लाकुड जळाल्यास कोळसा अथवा राख शिल्लक राहते पण संसाराला काळरूपी अग्नी अशा विलक्षण रितीने जाळतो कि, कोळसा अथवा राख सुध्दा शिल्लक राहात नाही. तो संसाराचा अभाव करून टाकतो म्हणून असत् ला सत्ता नाही.
नाभावो विद्यते संत: --- सत् वस्तुचा अभाव होत नाही अर्थात जेव्हा देह उत्पन्न झाला नव्हता तेव्हाही देही (आत्मा) होताच.देह नष्ट झाला तरी आत्मा राहील. वर्तमान देहाचे परिवर्तन होत असतानाही देही त्यात जसाच्या तसाच राहतो (म्हणजे बाल्यावस्था, तारुण्य, प्रौढत्व व वार्धक्य या चारही अवस्थेत देही मध्ये कोणताच बदल होत नाही.) जेव्हा संसार उत्पन्न झाला नव्हता त्या वेळी ही परमात्मा तत्व होतच. संसाराचा अभाव झाला तरी परमात्मा तत्व राहील. संसाराचे परिवर्तन होत असतानाही परमात्मा तत्व जसेच्या तसे राहते. संसाराला आम्ही एकाच वेळी पाहु शकतो दुसऱ्या वेळी नाही कारण संसार प्रतिक्षण परिवर्तन शील आहे. क्षणा पूर्वी वस्तु जशी होती तशी दुसऱ्या क्षणी राहु शकत नाही. उदाहरणार्थ सिनेमा पाहताना पडद्यावर चित्रपट पाहतो तेव्हा दृश्य स्थिर दिसते कारण मशीन मध्ये फिल्म वेगाने फिरत असल्या कारणाने ते परिवर्तन इतक्या वेगाने होते, आपण ते परिवर्तन डोळ्यांनी पाहु शकत नाही. तसेच संसार एकदाही दिसत नाही. शरिर मन इंद्रिये बुद्धी इत्यादीनी आम्ही संसाराला पाहतो अनुभव करतो ते कारण सुध्दा संसाराचेच आहे म्हणून संसारानेच संसार दिसतो स्वरूपात संसाराची प्रचिती नाही. संबंधानेच संसाराची प्रचिती होते संपूर्ण क्रिया संसारातच आहेत स्वरूपात नाही. 
 सत् असत् देह देही च्या तत्वाला जानणाऱ्या महापुरुषांनी पाहीले आहे असत् वस्तूचे तत्वही सत् आहे आणि सत् वस्तुचे तत्वही सत् आहे अर्थात दोन्हीचे तत्व सत् च आहे (म्हणजे असत्य असत्य आहे हे सत्य आहे आणि सत्य सत्य आहे हे सत्य आहे) दोन्हीचे तत्व भाव रूपाने एकच आहे. अर्जुन सुध्दा शरिरा विषयीच शोक करीत आहे. युद्ध केल्यास सर्व मृत्यू मुखी पडतील. भगवंत म्हणतात युद्ध न झाल्यास हे मरणार नाहीत काय? असत् तर नष्ट होईलच आणि निरंतर नष्ट होतच आहे. या सत् मध्ये जे सत्य स्वरूप आहे त्याचा कधी अभाव होत नाही म्हणून अर्जुनाचे शोक करणे अज्ञानच होते. तत्वदर्शी महापुरुषांनी दोन्हीचे ही तत्व अनुभवले आहे. सत् चा भाव सर्वत्र विद्यमान आहे परमात्मा तत्वाला किती ही अस्विकार करा, उपेक्षा करा, विमुख व्हा, किती ही तिरस्कार करा त्याचा अभाव नाहीच तो सर्वत्र विद्यमान आहे. सत् चा अभाव कोणी कधी ही करु शकत नाही.

२ -- श्रीकृष्णाने "स्थिरप्रज्ञ्" व्यक्तीची लक्षणे कोणती सांगितली त्याचे आचरण कसे असावे?
भगवंतांनी अध्याय दुसरा श्लोक क्रमांक ५४ ते ७२ या १९ श्लोका मध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत. अर्जुनाने भगवंताला विचारले हे केशव ! जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुध्दी पुरुषाचे लक्षण काय ? स्थिर बुध्दी पुरुष कसा बोलतो कसा चालतो कसा बसतो?
तेव्हा भगवंत म्हणाले -- हे अर्जुना! ज्या वेळी हा पुरुष मनातील सर्व कामना ईच्छा पूर्ण पणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्या वेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते.दु:ख दायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखाच्या प्राप्ती विषयी मुळीच इच्छा नाही ज्याचे प्रिती भय व क्रोध नाहिसे झाले आहेत 
असा मुनी स्थिर बुध्दी म्हटला जातो.जेव्हा बुद्धी मोह रुपी चिखलातून बाहेर पडते व किंकर्तव्यमुढता होते तो या योगाला प्राप्त होतो. ज्याचा विवेक दृढ आहे व जो  साधने पासुन कधी ही विचलीत होत नाही तो साधक (स्थिर बुध्दी असणारा) स्थितप्रज्ञ आहे. त्याला परमात्मा तत्वाचा अनुभव झाल्याने त्याची बुध्दी स्थिर होते असा सिध्द स्थितप्रज्ञ होय. कामना परमात्मा प्राप्तीतील मुख्य बाधा आहे. साधकात कामना येणारी जाणारी आहे व स्व निरंतर राहणारा आहे, स्व मध्ये कामना कशी येऊ शकेल. मन एक कारण आहे आणि त्याच्यातही कामना निरंतर राहत नाही. परंतु शरिर इंद्रिये मन बुद्धीशी तादात्म्य झाल्या मुळे मनुष्य मनात निर्माण होणाऱ्या कामनांना आपल्याच मानतो. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेह शुन्य असुन शुभ अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्न ही होत नाही किंवा व्देषही करीत नाही कारण त्याची बुद्धी स्थिर असते. कारण तो सर्व ठिकाणी स्नेह रहित आहे. त्याचे शरिर इंद्रिये मन बुध्दी तसेच स्त्री पुत्र कन्या घर धन संपत्ती इत्यादी कशातच नसते त्याला त्याचे आकर्षण राहिलेले नसते. कासव चालतो तेव्हा त्याचे चार पाय शेपूट आणि डोके हे सहा अवयव दिसत असतात पण जेव्हा तो आपल्या अवयवांना आत ओढुन घेतो तेव्हा त्याची पाठच दिसते. त्या प्रमाणे स्थितप्रज्ञ मानुस पांच इंद्रिये आणि एक मन या सहाही इंद्रियांना आप आपल्या विषया पासुन आवरुन धरतो. जर त्याचा इंद्रियादि बरोबर थोडा देखील मानसिक संबंध राहिला तर तो स्थितप्रज्ञ होत नाही. स्थितप्रज्ञ विषया पासुन इंद्रियांना आवरुन धरतो अर्थात तो मनाने ही विषयाचे चिंतन करीत नाही. 
इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे विषय विकार दूर होतात त्याची विषयांची आवड ही नाहिसी होते. संयोग जन्य सुखात रस बुद्धी असते कारण प्रकृति आणि तिचे कार्य यांची पराधीनता असते. रस बुध्दी निवृत्त झाल्यास पराधिनता संपूर्ण समाप्त होते. मोगाच्या सुखाची परवशता राहात नाही व अंत:करणात भोगाची गुलामी समाप्त होते. 
स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्ती ही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहिसी होते. भगवंत म्हणतात -- साधकाने सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुध्दी स्थिर असते. ज्याची इंद्रिये वंश झालेली असतात त्याची बुद्धी स्थिर होते. तो मनुष्य प्रत्येक काम विवेकपूर्ण करतो. आसक्ती आणि फलेच्छेचा त्याग करतो. दुसऱ्याचे हीत इच्छितो दुसऱ्याला सुख मिळो त्याचे कल्याण होवो असा भाव ठेवतो आणि तशीच क्रिया करतो. जो स्वत: कर्तव्य अकर्तव्य सार असणार जाणतो कोणत्या कर्माचा काय परिणाम होतो हे जाणतो असा विव्दान स्थितप्रज्ञ होय. ही ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. तो या ब्राह्मी स्थितित स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो.

 ३ -- भगवग्दीतेच्या या अध्यायाचा आजच्या जिवनात कसा उपयोग होऊ शकतो?
उत्तर -- अध्याय क्रमांक २ रा सांख्य योग आहे याला संन्यास योग असे ही संबोधल्या जाते. ह्या अध्यायात मानसाच्या आत्म उन्नतीची साधने सांगितली आहेत. साधक आपले सत् शील चारित्र्य आत्मसात करुन उन्नती कशी साधु शकतो ह्याचा सरळ सोपा मार्ग दाखविला आहे. माणसात असलेली वैगुण्ये घालवून आत्म शुध्दी साधुन समाजात व जनमानसात तो उच्च स्थान कसे प्राप्त करु शकतो हे सांगितले आहे. संसारात काय शाश्वत आहे व काय अशाश्वत आहे ह्याचा बोध करून आपण या मिथ्या व परिवर्तन शील संसारात काय साध्य केले पाहिजे व परमात्म तत्वाशी कसे जुळले पाहिजे हा मार्ग सुचविला आहे. आजच्या युगात शरिर, इंद्रिये, मन व बुद्धी मानसाच्या ताब्यात राहणे शक्य नाही पण त्यातल्या त्यात परमात्मा तत्व कसे प्राप्त करावे ही शिकवण आहे.
प्राणी मात्रावर दया मत्सर व व्देष रहित असने क्रोध अविचार नसणे मनावर ताबा मिळवणे इत्यादी भाव आत्मसात केले तर मानुस अंत:करण्याची प्रसन्नता प्राप्त करु शकतो. परमात्मा तत्वाशी संधान साधून प्रेम भाव सौहार्द शांती संयम स्थापित करुन शकतो. परमेश्वराशी
अनुसंधान भक्तीनेच हळूहळू जुळते. एकदा का हे साध्य झाले की माणसात आत्मविश्वास मानसिक स्थिरता येऊन आपोआपच त्याचा कल निष्काम कर्म योगाचा स्विकार करु लागतो व त्यांच्या कडुन आसक्ती रहित संतुलित जिवन शैली अंगिकारल्या जाऊ शकते. ह्या मुळे मानुस स्वतःची तर आध्यात्मिक उन्नती साधेल तो जर समाजाशी जोडला गेला तर समाजाची सुध्दा उन्नती साधेल.
आजच्या काळात तर आपण स्थितप्रज्ञ तर होऊ शकत नाही ती लक्षणे व गुणवत्ता आत्मसात करणे कठीण असले तरी देवा विषयी प्रेम पुर्वक विश्वास ठेवून त्याला शरण जाऊन भक्ती भावाने त्यांच्या परमात्मा तत्वाशी जुळून आध्यात्मिक वाटचाल करु शकतो.

Ans. 17. मीरा ओक यांनी लिहिलेले उत्तर 

प्रश्न २/४ _१) ' नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:! या श्लोकाचा अर्थ काय?
उत्तर : आसत् गोष्टी किंवा वस्तू म्हणजे भाव/माया/ अस्तित्व.  ज्या आसत् गोष्टी आहेत त्या दिसल्या तरी त्यां काही काळापुरत्याच असतात.  त्यांचं अस्तित्व अखंड संभवत नाही. उदा.झाडावरील पाने, फुले. इ.  परंतु जी वस्तू सत् आहे, ज्या अधिष्ठानावर सर्व आहे ते आहेच आहे.  तिचा अभाव कधीही संभवत नाही.  असत् वस्तूला अस्तित्व नसते आणि सत् वस्तूचा अभाव असत नाही.  अशाप्रकारे या दोन्ही गोष्टींचे तत्व तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिलेले असते.

सांख्य तत्वज्ञानाच्या दृष्टीने आत्मा हा सत् आहे आणि शरीर हे असत् आहे.  म्हणजे सतत परिवर्तनीय आहे.( बालपण, तरुणपण, म्हातारपण) .  वैद्यकीयदृष्ट्या सुद्धा दर सात वर्षांनी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी बदलत असतात.  जुन्या जाऊन नविन येत असतात.  या अर्थाने आपण दर सात वर्षांनी नविन जन्म घेतो.  याचाच अर्थ देहाचं अस्तित्व कायम टिकणार नाही.  ते बदलणार आहे.  म्हणून देहाला असत् मानलं जातं.  इथे असत् म्हणजे खोटं या अर्थी नाही तर ते रुपांतरणीय म्हणजे बदलणारं आहे.  म्हणून अशा असत् गोष्टी चे अस्तित्व नसतं,  ते अखंड नसतं.
      आत्मतत्वाला सत् म्हटलें आहे.  आत्मतत्व हे जन्माला आल्यावर जेवढं आपल्या शरीरात होतं तेवढंच ते मृत्यु पर्यंत असतं आणि मृत्यु नंतर ही ते फक्त शरीर टाकून देतं पण आत्मतत्वाचेअस्तित्व असते.  ते अव्यक्त स्वरुपात असते.  नाही असं आत्मतत्व असतंच नाही म्हणून इथे म्हटलंय की, ज्या शरीराच्या मरणाचा अर्जुन शोक करीत आहे, त्या शरीराला खरतर कायमचं अस्तित्व नाही ते सतत बदलत असतं.  आणि ज्या आत्मतत्वावर त्याची दृष्टी नाही, ते आत्मतत्त्व कधीही कमी जास्त होत नाही, नष्ट ही होत नाही आणि जन्माला ही येत नाही त्यामुळे त्या आत्मतत्वाचा अभाव म्हणजे नसणं हे कधीच नसतं.

     तत्वदर्शी लोकांनीं या दोन्ही गोष्टी जाणून घेतलेल्या असतात.   त्यातील तत्व जाणून घेतलेले असते.  नाशवंत वस्तू सतत नाश पावत असते आणि अविनाशी वस्तू कधीही नाश न होणारी आत्मवस्तू आहे.  तिचा अभाव कधीही नसतो म्हणून तो जित्या- मेल्याचा शोक करीत नाहीत.

२).     श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञ व्यक्तीची कोणती लक्षणे सांगितली आहेत? त्यांचे आचरण कसे असावे?
उत्तर :  मनातील विकार, विकल्प दूर करण्यासाठी काम, क्रोधांची विनश्यति पर्यंतची रांग कामनेच्या ठिकाणी थांबवता आली, जसं म्हटलेल आहे की,' नदी उगमे स्थिरावे '.  नदीला तिथेच थांबवली तर तीचा प्रवाह पुढे जात नाही तर त्याच ठिकाणी सागराचं रुप धारण करते.  पण इथे तसं नाही तर काम ते विनश्यतीपर्यंत ची रांग, कामनेमुळे येणा-या क्रोधादी विकारांना आळा घालणे शक्य होते.  जसं नविन येणाऱ्या फांदीला खुडत राहिलं तर फांद्या वाढत नाहीत.  त्याप्रमाणे जोपर्यंत समत्व भाव होत नाही, निष्कामता येत नाही तोपर्यंत बुद्धियोग साधता येणार नाही. बुद्धीला स्थिर करण किंवा आवरण म्हणजेच स्थितप्रज्ञ.  स्थितप्रज्ञ याचा अर्थ स्वरुप बोध झालेला आहे.  ज्याची मन, बुद्धि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेली आहे त्याची प्रज्ञा प्रतिष्ठीत झालेली आहे.
      स्थितप्रज्ञ पुरुष विषयांच्या ठिकाणी धावणाऱ्या इंद्रियांना संयमित करून, मनामध्ये येणाऱ्या कामनांना सोडून आत्मतुष्ट होऊन राहतो, स्वतःच स्वतःमध्ये समाधानी राहतो.  मनाने मनाला परमेश्वराच्या चिंतनात गुंतवल्यास ते इतरत्र जाणार नाही . भटकणार नाही.  मनुष्याच्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आहेत तसेच कर्मेंद्रिय आहेत.  ज्ञानेंद्रियांमध्ये डोळे जे नाना प्रकारच्या क्रिया, दृष्य पाहात असतात.  कान - वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकण्याच काम करतात.  जिभ - नाना गोष्टी ग्रहण करते. तिचा उपयोग फक्त उदरभरणासाठी नाही तर अभिलाषा वाढली म्हणजे ती एकतर खाते किंवा बोलत रहाते.  म्हणून संत म्हणतात, जिभेला भगवंताचा विषय लावा, नामाची गोडी लावा.  म्हणजेच इंन्द्रिय त्यांचे विषय, मन, बुद्धि आणि तेथून स्वरुपापर्येंत जाणं ही साखळी आहे.
      स्थितप्रज्ञ वैरागी असतो.  वैरागी यांचा अर्थ तो गरजेपुरता जेवतो, खातो म्हणजेच संपूर्ण विषयांचा त्याग न करता देह धारणासाठी आवश्यक तेवढाच विषयांचा संग करतो.  पण विषयांच्या मागे लागत नाही.  कारण त्यांची दृष्टी अंतर्मुख झालेली असते.  जसं आपत्तीची चाहूल लागताच कासव आपली इन्द्रिये आत वळवून घेत.  त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष इन्द्रियांपासून होणा- या विषय आपत्तीला आवरण्यासाठी इन्द्रियांना अंतर्मुख करतात.
      ज्ञानेंद्रिय संयमित करुन ख-या अर्थाने जेंव्हा अंतर्मुख होतात तेव्हा त्यांना बाहेर जायला जागाच उरत नाही.  त्यामुळे ती आपोआपच आत्म्याच्या ठिकाणी जाऊन बसतात.  वृत्ती आत वळवण एवढंच काम रहात.  एकदा वृत्ती आत वळली की तिची दिशा आहे आत्माराम.
      ज्याची मन, बुद्धि अशी स्वरुपाच्या ठिकाणी लिन झालेली आहे इन्द्रिय, मन संयमित झालेल आहे आणि भगवंतखेरीज दुसरा विचार येत नाही, त्यामुळे मनात कामना नाही, क्रोध नाही, दुसऱ्याशी स्पर्धा नाही, मत्सर नाही.  मनात कोणताही विकार नाही.  वासना येते ती भगवंताचीच.  त्यामुळे त्याचं परिवर्तन होऊन तो तृप्त झालेला असतो.   त्याला अस काही मिळालेलं असत की, आणखी काही मिळवाव अस वाटत नाही.  कधीही न विटणार अस आत्मसुख त्याला प्राप्त झालेलं असतं आणि परमशांतीचा लाभ त्याला होतो.
      खऱ्या शांतीवर जर जीव जाऊन बसला असेल तर बाहेर कितीही गोष्टी घडल्या तरी त्याची शांती ढळत नाही.  तो अखंड प्रसन्न राहतो.  ती गोष्ट सुख देणारी चांगली असो किंवा दुःख देणारी वाईट असो,  तो एकांतात असो की लोकांतात त्याची शांती अढळ राहते.  आत खोल तळाशी जाऊन बसलेला तो, तेच होऊन राहतो.  Jse तुकोबा म्हणतात, विठ्ठल पहावया गेलो विठ्ठलची होऊनी गेलो ही स्थितप्रज्ञाची स्थिती झालेली असते.
      नाना मनोकामना सोडून ते संतुष्ट होऊन राहिलेला असतो.  त्रिविध तापांचे डोंगर जरी कोसळले तरी त्याचा परिणाम होत नाही.  कारण हे दुःख, हे ताप देहाला लागलेले असतात.  देहाशी जर माझा संबंध नाही, मी देह नाही तर त्याला होणार दुःख, ताप ही माझी शांती भंग करु शकत नाही.
      तिथे उद्वेग नाही, हाव नाही, अभिलाषा नाही, भय, राग, द्वेष नाही क्रोध नाही कारण या सर्वांमध्ये मी आहेच, हा बोध त्याला झालेला असतो त्यामुळे कशाची भिती वाटत नाही अगदी मृत्यूची ही नाही. कारण मृत्यु सुद्धा देहाला आहे आणि मी देह नाही हा त्याला बोध झालेला असतो.
      लोभ, आशा, सुखाची हाव नाही.  ते अत्यंत मौनी असतात. बोलणाऱ्याशी बोलताना मीच माझ्याशी बोलतोय दुसरा कोणी नाही म्हणजे सहजचि मौनी आहे अशी स्थिती येते.
       राग, द्वेष वियुक्त. त्याला रागही नाही, द्वेष ही नाही.  सर्व विश्वासी त्याच आत्मत्वाचं नातं जोडलेलं असतं.  नेहमी प्रसन्न चित्त असत.  कोणतीही घटना त्याच्या दृष्टीने अप्रिय नसते.  कारण त्याच्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.  त्याची बुद्धि अतिशय शांत व स्थिर असते.
      या शिवाय 'या निशा सर्व भूतानां तस्या जागर्ति संयमी! त्यांचं जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:'!!  सामान्य मनुष्य  जागरुक असतो अगदी पैशाच्या बाबतीतही त्या ठिकाणी ही मंडळी झोपलेली असतात म्हणजे ही गोष्ट ते गौणत्वाने घेतात.  याउलट सामान्य मनुष्य परमार्थाच्या ठिकाणी, परमेश्वर प्राप्तीच्या ठिकाणीं झोपलेला असतो तेव्हा ही मंडळी अत्यंत सावध असतात.  ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात परंतु तो स्थित असतो, विचलित होत नाही त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ भोगविलासांनी विचलीत होत नाही.  असा पुरुष अंतर्यामी शांती प्राप्त करून घेतो.
      शेवटी भगवान म्हणतात,  ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती अंतकाळी ही स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवते.

३).    भगवद्गीतेच्या या अध्यायाचा आजच्या जीवनात उपयोग कसा हैऊ शकतो?
उत्तर :  आजचे जीवन अत्यंत धकाधकीचे व स्पर्धात्मक आहे.  या स्पर्धेत टिकायचे असेल तर ज्ञान करुन घेणे आवश्यक आहे.  ज्ञान ही गोष्ट अशी आहे की ती पुन्हा पुन्हा केल्याने समजते.  असे सांख्ययोगातून भगवान सांगतात.पण हे ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान?   तर परमात्म स्वरुपाचा जाणणे म्हणजे ज्ञान‌, आत्मज्ञान करुन घेणेम्हणजे ज्ञान.
 १)     अज्ञानामुळे मनावर, शरीरावर आणि प्रत्यक्ष कृती वरही परिणाम होतो.  सद्सद्विवेक बुद्धि जणू गहाण पडते. ती  जागा अविचार घेते आणि मनाचा बेधुंद कारभार सुरु होतो.  
२).   हे समजून घेतले पाहिजे की, मनुष्य जन्माला आला की तो कधी ना कधी मरणारच आहे. कारण हा देह नश्वर आहे. मग कोणतीही गोष्ट होणे आणि जाणे  ही जगत् सत्यत्व भ्रांती आहे.  हा मनुष्य देह परमेश्वराने कशासाठी दिलेला आहे?  हे अज्ञानी जीवाला समजत नाही आणि तो दु: खी होतो.  मनुष्याला त्याच्या स्वस्वरुपाचा विसर पडल्यामुळे आपणही परमेश्वराचाच अंश आहोत ही आठवण भगवंत करुन देतात.
३).   या देहासाठी, शरीरासाठी आवश्यक ते विषय त्या त्या वेळी सेवन करावेत पण इंद्रियांच्या आधीन होऊ नये.असत् गोष्टीचा स्वीकार करावाच लागतो.   परंतु सद्वस्तूकडे आपली दृष्टी सतत हवी.  त्यात प्रधान काय? गौण काय? हा सारासार विवेक करता यायला हवा. हे समजते.
५).    जिवनातील ध्येय गाठण्यासाठी आपल्या वाट्याला जे जे कर्म आलेल आहे ते ते प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि ते कर्मआसक्तीरहित म्हणजे फळांची अपेक्षा न ठेवता भगवंताला अर्पण करायचे.मग जो परीणाम होईल तो होईल. जो होईल तो आपल्या कल्याणाचाच असेल.  ही श्रद्धा वाढते.
६).    बुद्धि योगाच्या आश्रयाने कर्म केल्यास भय, त्रास, चिंता, रांग, आशा, द्वेष, मत्सर यांचा लय होईल.  बुद्धि, मन स्थिर आणि शांत होऊन स्वानंदात राहिल.


 श्रीकृष्णर्णापणास्तु🙏🙏🙏हरिः हरः 🕉️💐

Comments

  1. प्रश्नोत्तरी हा उपक्रम खुपच आवडला प्रत्येकांची वेगवेगळी उत्तरे वाचायला मिळतात आणी त्यातून खुप काही शिकता येत प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे लिहायची हे कळत आणिप्रत्येकांची उत्तरे वाचायला खुप मजा येते

    ReplyDelete

Post a Comment

तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा