प्रश्न 1(a): ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले?
(b): युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितले आहेत
(c): पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला
Ans: १. राजश्री कोंडावार ताई लिहितात...
युध्दाच्या इच्छेने रणांगणावर असलेल्या आपल्या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत, हातातून गाण्डीव धनुष्य गळुन पडत आहे अंगाचा दाह होत आहे मन भ्रमिष्टा सारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहु शकत नाही युध्दात आप्तांना मारुन कल्याण होईल असे मला वाटत नाही
हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाची ही नाही असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने लाभ तरी काय होणार स्वजनांना आप्तांना मारुन पापच लागणार आपल्याच कुटुंबीयांना मारुन कसे सुखी होणार
कुळाचा नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असताना आम्ही पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करु नाही वर्णसंकर कुळाचा नाश होण्या पेक्षा जरी मला शस्त्र रहीत व प्रतिकार न करणार्याला धृतराष्ट्र पुत्रांनी ठार मारले तरी ते अधिक कल्याणकारी होईल असे म्हणुन अर्जुन उद्विग्न मनाने बाणासह धनुष्य टाकून रथाच्या मागील भागात जाऊन बसला. आणि शेवटी अर्जुनाने शस्त्र टाकण्याचा निर्णय घेतला.
२. भारती शेटे ताईंचा उत्तर....
a) दोन्ही सैन्यांमध्ये जन्मापासूनचे आणि गुरुगृहीचे संबंधी लोक पाहून अर्जुनाच्या मनात असा विचार आला की, युद्धात या पक्षाचे लोक मरोत किंवा त्या पक्षाचे लोक मरोत, नुकसान आमचे सर्वांचेच होईल, आमचे कुल नष्ट होईल, आमचेच संबंधी मारले जातील, असा विचार मनात येऊन अर्जुनाची युद्धआ विषयीची इच्छाच नाहीशी झाली. अर्जुनाच्या मनात युद्धामुळे भविष्यकाळात होणाऱ्या परिणामांची चिंता होत आहे, त्यामुळे दुःख होत आहे त्या दुःखाचा परिणाम अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर होत आहे. त्या परिणामांविषयी अर्जुन स्वतः सांगत आहे की, माझ्या शरीराचे हात, पाय, तोंड इत्यादी एकेक अवयव शिथिल होत आहे. मुख म्हणजे तोंड कोरडे पडत आहे त्यामुळे बोलणे सुद्धा कठीण होत आहे. संपूर्ण शरीराला थरकाप सुटला आहे माझ्या हातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे युद्धभूमी मध्ये रणांगणावर रथावर उभे राहण्यासही मी असमर्थ आहे मला मूर्च्छा (चक्कर) येऊन मी खाली पडेल असे वाटत आहे. अशा अनर्थकारक युद्धामध्ये उभे राहणे सुद्धा अर्जुनाला पाप वाटत आहे असे अर्जुनाने श्रीमद् भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात 28 ते 30 या श्लोकांमध्ये आपणास सांगितले आहे. युद्धामध्ये सर्व आप्तगण पाहिल्याने आणि त्यांच्या मृत्यूस आपण कारणीभूत होऊ या भीतीने अर्जुनाच्या मनातील विजय, राज्य आणि सुखाची इच्छाच संपुष्टात आली या कुटुंबीयांना मारून माझी जगण्याची सुद्धा इच्छा नाही जर कुटुंबीयच मरून जातील तर राज्य आणि भोग माझ्या काय कामाचे असे अर्जुनाने सांगितले आहे
b) "अहिंसा परमो धर्म:" या उक्ती प्रमाणे कोणाचीही हिंसा करू नये. येथे तर आपल्याच कुटुंबीयांची म्हणजे आपल्याच कुळातील व्यक्तींची चुलत भाऊ, गुरु, पितामह अशा अनेक व्यक्तींची हिंसा करावी लागणार हे अर्जुनाने पाहिले आणि अशा व्यक्तींची हिंसा केली तर आम्हाला पापच लागेल. जो आपल्या कुळाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो, असे 36व्या श्लोकात सांगितले आहे, कुळ नष्ट होईल जर कुळच नष्ट झाले तर युद्धात जाणकार पुरुष मरतील तेव्हा मागे उरलेल्या लोकांना उत्तम प्रकारचे शिक्षण देणारे, त्यांच्यावर शासन करणारे, त्यांना शिकविणारे कोणी राहणार नाही अशा स्थितीत मनाला वाटेल तसे राहिलेले लोक आचरण करतील म्हणून अशा युद्धानंतर अधर्म पसरेल असे 40 व्या श्लोकात सांगितले आहे. कुलधर्म जाती धर्म आणि वर्ण धर्म यांचे आचरण न झाल्याने हे सर्व नष्ट होतील असे 43 व्या शतकात सांगितले आहे तसेच आपल्या पूर्वजांना आणि इतरांना जल आणि अरध्य द्यायलाही कोणी शिल्लक राहणार नाही मग असे युद्ध करून काय फायदा अशी कारणे अर्जुनाने युद्ध न करण्याबद्दल सांगितली आहेत
C) "एवमुकत्वार्जून: सांख्ये रथोपस्थ उपाविशत | विसरुज्य सशरम चापं शोक संविग्न मानस :" युद्ध करणे संपूर्ण अनर्थाचे मूळ कारण आहे युद्ध करण्याने आपल्याच कुटुंबीयांचा नाश होणार आहे परलोकात नरकाची प्राप्ती होईल इत्यादी गोष्टी सांगून शोकाने (दुःख) ने अत्यंत व्याकुळ होऊन अर्जुनाने पहिल्या अध्यायाच्या शेवटी युद्ध न करण्याचा पक्का निर्णय घेतला आहे
Ans 3. Pujita Tai..
१-A) अर्जुनाने जेव्हा आपल्या शत्रुपक्षात आपलेच सर्व नातलग आणि ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे हे पाहून अर्जुन अत्यंत दुःखी होतो.त्या दुःखाचा परिणाम त्याच्या शरीरावर व मनावर होऊ लागतो. खरतर पहिला आघात त्याच्या मनावर होतो मग तो हळूहळू शरीरावर दिसू लागतो.
अर्जुनाने उत्साहाने,आत्मविश्वासाने, अहंकाराने भगवंताना
“सेनयोरुरभ्योमध्ये स्थाप्यित्वा रथोत्तमम “असे सांगितले होते.
(श्लोक क्र.२४) परंतु आपल्या माणसांना पाहून त्याचा लढण्याचा उत्साह पूर्णपणे मावळला,ममतेचा,मोहाचा तो शिकार झाला.
त्याचे हात पाय तोंड इ. अवयव एकएक करून शिथिल होऊ लागले. तोंड शुष्क झाले,शरीराला कंप सुटला ज्यामुळे बोलणे सुद्धा कठीण होऊ लागले,भीतीने शरीर रोमांचित झाले होते, सर्व शरीरात दाह होत होता, ह्या सर्व नकारात्मक चिन्हांमुळे युद्ध करण्यास मी असमर्थ आहे त्यास वाटू लागले,मनावर आलेल्या दडपणामुळे त्याला मूर्छित होऊन खाली पडतो की काय असे वाटू लागले. ज्या गांडीव धनुष्याच्या
टणतकाराने शत्रू गर्भगळीत होतो तेच गांडिव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडत आहे, असे सर्व परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागले.
१-B). युद्ध भूमीवर आपलेच आप्त स्वकीय आहेत हे पाहून अर्जुनाचे युद्ध करण्याचे अवसान गळून गेले.
विफल मनसस्थितीतील अर्जुन मग युद्ध टाळण्याची अनेक कारणे सांगू लागला,जस की त्याचा शारीरिक अवस्थेबद्दल म्हणजे शरीराला कंप सुटणे,मुख शुष्क पडणे,हातातील धनुष्य बाण गळून पडणे अशा शारीरिक असमर्थतेला त्याने वैयक्तिक अपशकुन समजला तसेच निसर्गातून मिळणाऱ्या सूचनांचा,जस की उल्कापात होणे, भूकंप होणे,अवेळी ग्रहण लागणे,पशु पक्षांचे विचित्र ओरडणे ह्या घटनांचा नैसर्गिक अपशकुन म्हणून आधार घेतला.नंतर पाप पुण्य ह्या संकल्पनेचा आधार घेत अर्जुन म्हणतो,माझ्या कुटुंबियाना मारून मला काहीच लाभ होणार नाही उलट कुळाचा नाश केल्याने आम्हा सर्वांना पापच लागेल,ज्यामुळे नरकाची प्राप्ती होईल (श्लोक के. ३१)आणि समजा वरील सूचनांचा विचार जरी नाही केला आणि युद्ध करून विजय जरी मिळवला तरी काय लाभ आहे?एक तर माझी राज्य,अधिकार, सत्ता अनेक प्रकारची सुख ह्या कशाचीच अपेक्षा कामना नाही आहे,तसंच ह्या युद्धात जर का आमचे मरून गेले तर हे राज्य आणि भोग आमच्या काय कामाचे,त्याना मारून हे सर्व भोगण्याची गोष्ट तर दूरच हे तर आमच्या चिंता आणि दुःखाचे कारण होइल (श्लोक क्र ३२) हळूहळू तर त्याची मोहग्रस्त बुद्धि दुर्योधनादी आततायी असल्यामुळे शास्त्रानुसार मारण्याच्या लायक आहेतच परंतु हे सर्व आपले कुटुंबीय
असल्याकारणाने आम्ही आमच्याच कुळाचा नाश करू आणि पापाचे भागीदार होऊ,ह्यासाठी अर्जुन शास्त्राचा आधार घेऊन म्हणतो की , जो आपल्या कुळाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो अशा रीतीने शास्त्राच्या आधारे केलेल्या चालीवर शास्त्राच्या आधारेच मात करतो.(श्लोक क्र.३६) पुढील श्लोकात तर अर्जुनाच्या मते युद्धामुळे होणाऱ्या कुलक्षयाकडे जरी दुर्योधनदींचे,राज्य लालसेमुळे,सत्ता,अधिकार ह्या लोभामुळे दुर्लक्ष होत आहे तरी आम्ही हे करू शकत नाही.इथे अर्जुन दुर्योधनातील दोष दाखवून आपल्यातील चांगुलपणाचा आधार घेऊन युद्ध न करणे कसे योग्य आहे ते सांगण्याचा प्रायत्न करतो. पुढील ४३ श्लोकापर्यंत अर्जुन धर्माचे पालन न केल्यामुळे अधर्माची छाया पसरते आणि विपरीत बुद्धी वाढीस लागून न करण्यायोग्य काम घडून अधर्म संपूर्ण कुटुंबाला व्यापून टाकतो .
वरील सर्व कारणे अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी दिली असली तरी लोभ, स्वकियांबद्दल मोह धर्म-अधर्म तरी तो स्वतःकडे असलेली चार बोटे विसरत होता,तो दुर्योधनदीचे दोष बघत होता आणि स्वतःला चांगुलपणाच्या मुलम्याखाली लपवून ठेवत होता. इथे तो स्वतःचा पराक्रम ,कर्तुत्व,आणि कर्तव्यही विसरतो आहे . असा मोहग्रस्त अर्जुन युद्ध न करण्याची अनेक उदाहरणे देत आहे.
१-सी)
श्लोक क्र. ४५,४६ मध्ये अर्जुनाने आश्चर्य आणि खेद व्यक्त केला आहे.आश्चर्य ह्यासाठी की,युद्धापासून होणाऱ्या अनर्थाला होणाऱ्या वाईट परिणामला जाणत असून सुद्धा युद्ध करण्याचा निश्चय केला आहे आणि युद्धभूमीवर सज्ज झाले आहेत,आणि खेद आशासाठी की राज्याच्या सुखाच्या,लोभापाई aaplya स्वजनाना मारण्यास तयार झाले आहेत . ह्या खेदापायीच अर्जुन अशा निर्णयाप्रत येतो की , जर मी लढायला तयार झालोच नाही तर ? मग ते तरी कशाला युद्ध करतील ? आणि समजा शस्त्ररहित अशा मला जरी त्यांनी ठार केले तरी माझ्या हातून आप्तस्वकीय,गुरुजनांची होणारी हत्या टळेल आणि मी पापमुक्त होईन.मी तर पापापासून वाचेनच आणि माझ्या कुळाचा नाश होणार नाही म्हणून आपण युद्ध न करणेच योग्य अशा निर्णयाप्रत अनेक विचारांती अर्जुन येऊन ठेपतो.
Ans 4. अश्विनी पैठणकर यांनी लिहिलेले उत्तर......
**भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील प्रश्नांची उत्तरे**
**१) ज्याच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटते?**
महाभारत युद्ध सुरू होण्याच्या आधी अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दोन्ही सैन्य पाहिले. आपल्या समोर पितामह भीष्म, आचार्य द्रोण, आपले बंधू, चुलते, पुत्र, मित्र आणि नातेवाईक यांना पाहून तो मानसिक व शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ होतो. त्याचे शरीर थरथरू लागते, तोंड कोरडे पडते, अंगातील तापमान कमी होते, आणि संपूर्ण शरीर जड होते. त्याच्या हातातले गांडीव धनुष्य सुटायला लागते, हृदय जोराने धडधडते, आणि तो स्थिर उभा राहू शकत नाही.
मनाच्या स्तरावर अर्जुनाला तीव्र दुःख जाणवते. त्याला वाटते की या युद्धामुळे संपूर्ण कुलाचा नाश होईल आणि त्याला अशा विजयाची इच्छा नाही. आपल्या प्रियजनांचा संहार केल्याने त्याला युद्ध व्यर्थ वाटू लागते. तो विचार करतो की आपल्या लोकांना मारून मिळणाऱ्या राज्य, संपत्ती आणि सुखांना काहीच अर्थ उरणार नाही. त्याच्या मनात शोक, दया आणि मोह उत्पन्न होतो. तो म्हणतो की, **"मी या युद्धात भाग घेऊ शकत नाही, कारण मी माझ्या लोकांना मारून कसा आनंदी राहू शकतो?"**
**२) युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितली आहेत?**
अर्जुनाने युद्ध टाळण्यासाठी अनेक नैतिक, सामाजिक आणि धार्मिक कारणे दिली. ती पुढीलप्रमाणे आहेत:
1. **कुलक्षयामुळे धर्माचा नाश:**
अर्जुन म्हणतो की, या युद्धामुळे संपूर्ण वंशाचा नाश होईल. जेव्हा कुल नष्ट होते, तेव्हा कुलधर्म नष्ट होतो, आणि समाज अधर्माच्या मार्गाला लागतो.
2. **स्त्रियांची भ्रष्टता आणि अधर्म वाढणे:**
अर्जुनाच्या मते, युद्धामुळे समाजातील स्त्रिया असुरक्षित होतील आणि त्यामुळे पुढील पिढ्या भ्रष्ट होतील. या नैतिक अधःपतनामुळे कुटुंबव्यवस्था ढासळेल.
3. **पितरांचे उद्धार होणार नाही:**
अर्जुन असे सांगतो की, जेव्हा धर्माचरण करणारे पुरुष नष्ट होतात, तेव्हा पूर्वजांना (पितरांना) श्रद्धेने दिले जाणारे पिंड-तर्पण थांबते. त्यामुळे त्यांच्या आत्म्यांना मोक्ष मिळत नाही.
4. **पापकर्म आणि नरकप्राप्ती:**
अर्जुनाला वाटते की आपल्या गुरुजनांना आणि कुटुंबियांना मारणे हे एक मोठे पापकर्म आहे, ज्यामुळे त्याला नरकात जावे लागेल.
5. **स्वार्थाने चालवलेले युद्ध व्यर्थ आहे:**
अर्जुन सांगतो की हे युद्ध केवळ सत्ता, संपत्ती आणि राज्य मिळवण्यासाठी आहे. अशा स्वार्थी उद्देशाने युद्ध करणे त्याला योग्य वाटत नाही.
6. **आपल्या प्रियजनांविरुद्ध युद्ध करणे अयोग्य:**
अर्जुन म्हणतो, **"या युद्धात जिंकलो तरी दुःख आहे आणि हरलो तरी दुःख आहे."** कारण दोन्ही स्थितींमध्ये त्याच्या प्रियजनांचा संहार होणार आहे.
**३) पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला?**
या सर्व विचारांनी अर्जुन पूर्णपणे मानसिक गोंधळात पडतो. तो युद्ध करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्टपणे सांगतो. तो श्रीकृष्णाला म्हणतो –
**"हे माधव, मी युद्ध करणार नाही!"**
यानंतर तो गांडीव धनुष्य खाली ठेवतो आणि रथाच्या आसनावर निराश होऊन बसतो. अर्जुनाचे मन विषादाने भरलेले असते आणि तो पूर्णपणे संयम गमावून बसतो. त्याला काय करावे हे समजेनासे होते. यामुळे पहिल्या अध्यायाला **"अर्जुनविषादयोग"** असे नाव दिले गेले आहे.
**सारांश:**
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या मनातील द्वंद्व आणि नैतिक संघर्ष दर्शवला आहे. युद्धाच्या तात्काळ परिणामांमुळे तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचतो. युद्धामुळे होणाऱ्या विनाशाचा विचार करत तो युद्ध न करण्याचा निर्णय घेतो. पण त्याचा हा संभ्रम आणि दुःख पुढे श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या उपदेशाने दूर करतात.
Ans 5. मंजुषा गांदेकर ताई लिहितात....
*प्रश्न आमचा उत्तर तुमचे*
अध्याय १
प्रश्न 1(a): ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्वनातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले?
(b): युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितले आहेत
(c): पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला
*🙏🙏तुमचे उत्तरे मेसेज रूपात इमेज स्वरूपात किंवा ऑडिओ स्वरूपामध्ये ग्रुप मध्ये 10 फेब्रुवारीला, सोमवारी टाकावयाची आहेत ग्रुप त्याच वेळेस ओपन होईल*🙏🙏
A अर्जुनाच्या शरीराला कंप सुटला. त्याच्या त्वचेची आग होऊ लागली. मनोबल खालवले, हातातील गांडीव धनुष्य गळून पडले. शक्तिपात झाल्यासारखी त्याची अवस्था झाली.
हे सर्व मनाचे खेळ होते. मोठी जीवितहानी होईल अशी भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे तो विचलित झाला होता. कल्पना करत असलेल्या गोष्टी जसे दाह, कंपन प्रत्यक्ष होत आहे असे त्याला वाटत होते.
B) त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. विजय प्राप्त करून त्यातून आनंद मिळणार नाही तर स्वजनांच्या हत्येचे पाप लागणार आहे हे त्याला कळत होते. इथे फक्त विपरीतच घडेल असे त्याने श्रीकृष्णाला सांगितले. ज्यांच्यासाठी विजय मिळवायचा, सुखाची इच्छा धरायची तेच युद्धदात समोर आहेत. मग युद्ध कशाला करायचे? आम्हाला यात काहीच लाभ नाही.
कुळाच्या नाशामुळे वंशपरंपरा नष्ट होते. अधर्म माजतो. स्त्री जातीचे पतन होते. म्हणून मला युद्ध करायचे नाही.
C) अर्जुनाने युद्ध न करण्याचा, प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला .वनामध्ये जाऊन एकांतवासात रहावे असे अर्जुनाला वाटले.
Ans 6. मेधा वेलणकर......
उत्तरे :- अ ) अर्जुन करुणेने व्यापून गेला, शोक करू लागला. स्वजनांना पाहून त्याच्या शरीराला कंप सुटला, तोंडाला कोरड पडली. त्याचे अंग रोमांचित होऊन शरीराचा दाह होऊ लागला. त्याला
काहीच सुचेनासे झाले.
हातातून धनुष्य गळून पडायला लागले. मन भ्रमिष्ट झाले, उभं राहणं ही त्याला जमेना.
ब ):- आपल्याच बांधवाना मारून कोणतं सुख मिळावायचं?, असे त्याला वाटू लागले,स्वबांधवांना मारून त्रैलोक्य जरी मिळाले तरी अर्जुनाला नको आहे.
लोभा मुळे भ्रष्ट झालेल्या कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष, आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक लागले नाहीं तरी, कुळाच्या नाशामुळे उत्पन्न होणारा दोष त्याला दिसत होता. म्हणून त्याला युद्ध करू नये असं वाटत होतं. कुळाचा नाश झाला कीं, कुळधर्म नाहीसे होतात, कुळातील लोक पापकर्म करतात, त्यामुळे त्या कुळातील स्त्रिया बिघडून वर्ण व्यवस्थेला धोका निर्माण होतो. वर्णसंकर करणार्यांना आणि कुळाला नरकवास भोगावा लागतो. बुद्धी असूनही
राज्य आणि सुख लोभाने हॆ पाप मी कसे करू? ही तर खेदजनक आहे, ही कारणे अर्जुननाने सांगितली.
क ):- शस्त्र रहित आणि प्रतिकार न करता ध्रुतराष्ट्राच्या पुत्रांनी रणा़ंगणावर ठार मारले तरी मला ते चालेल, मी
युद्ध करणार नाहीं असा अर्जुनाने निर्णय घेतला..
Ans. 7. लता साळुंखे ताई लिहितात......
प्रश्न 1(a): ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्वनातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले? उत्तर
अर्जुनाने कृष्णाला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ थांबवायला सांगितले. श्रीकृष्णाने रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये थांबवून, अर्जुनाला उद्देशून म्हणाले, युद्धासाठी येथे जमलेल्या या सर्व कौरवाना तू पहा. त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यातील असलेले आपले वाढवडील, आजोबा, आचार्य, काका, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे, हितचिंतक, यांना पाहिले तेथे उपस्थित त्या सर्व मित्रांना नातेवाईकांना पाहून कुंती पुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आणि खिन्न होऊन श्रीकृष्णाला अर्जुन म्हणाला, हे अच्युत! युद्धासाठी जमलेल्या या स्व जनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत, घशाला कोरड पडली आहे, माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिलेले आहेत, माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडू लागले आहे, अंगाची जळजळ होत आहे, माझे मन चक्रावून गेले आहे.त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. हे केशवा! मला फक्त विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत, या युद्धात माझ्या स्वतःच्याच माणसाना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे हे सुद्धा मला कळत नाही हे कृष्णा! मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाची ही इच्छा नाही हे गोविंद यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे, भोग साधने काय करायची किंवा जगून तरी काय करायचे, ज्यांच्यासाठी आम्ही राज्यभोग सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे, आपल्या धनसंपत्तीची व प्राणांची आशा सोडून, युद्धाला उभे टाकले आहेत. हे सर्व गुरुजन वडील पुत्र आजे माझे सासरे नातवंडे मेहुणे व इतर नातलगच आहेत. हे मधुसूदन! यांनी मला मारले तरी बेहत्तर परंतु पृथ्वीचं काय तर त्रिलोक्याच्या राज्यासाठी ही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. हे! जनार्दन कौरवाना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे .या आतताईंना मारून आम्हाला थोर पापच लागणार आहे, म्हणून हे माधव! आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही.कारण आपल्याच कुटुंबीयांना मारून आम्ही सुखी तरी कसे होणार सांग बंर ?
श्रीमद्भगवद्गीता अध्याय एक प्रश्न पहिला b उत्तर _जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या या लोकांना कुलक्षाचा दोष व मित्र द्रोहाचे पातक दिसत नसले, तरी हे जनार्दन! कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये. कुळ नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात, कुलधर्म नाहीसे झाल्याने संपूर्ण कुळात अधर्म पसरतो, कुळाचे धर्माचे प्राबल्य नाहीसे होते, तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैरवर्तन घडते, आणि शाश्वत कुलधर्म बिघडल्यामुळे जातीची सरमिसळ होते, वर्णसंकर उत्पन्न होतो , संकरामुळे त्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्यांना नरकातच जावे लागते एवढेच नव्हे तर पिंडदान तिलोदक इत्यादी न मिळाल्याने त्या कुळातील इतरांची अद्योगती होते, वर्ण संकर दोषामुळे कुळ घातकाचे पातक लागते, सनातन जातीधर्म कुळधर्म नाहीसे होतात, हे जनार्दन! ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा लोकांना अत्यंत नरकवास भोगावे लागतो, असे आम्ही ऐकत आलो आहोत.
श्रीमद्भगवद्गीता अध्याय एक प्रश्न पहिला c - उत्तर अरेरे किती खेदाची गोष्ट आहे, की हे जाणत असूनही आम्ही हे पाप करायला तयार झालो आहोत, राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनाना मारण्यास सज्ज झालो आहोत, जरी शस्त्रधारी कौरव मी शस्त्राने प्रतिकार न करणाऱ्य रणांगणावर मारले तर ते मारणे ही मला अधिक चुका वहवाटे आणि एवढे बोलो बोलून रणभूमीवर शोकाकू झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण बाजूला टाकले आणि उद्याच्या सणावरून उडी मारून खाली सारं त्याच्या सणाजवळ जाऊन बसला
Ans 8. माधवी डोळे ताई लिहितात ....
Ans 9. सौ राजस बंगाळे ताई लिहितात.....
Ans 10. मेधा पोफळी ताई लिहितात ....
प्रश्न 1 ला उत्तर (a) सर्व नातलग समोर पाहिल्यावरअर्जुनाचे तोंड वाळून शुष्क झाले, गात्रे गळून पडत आहे असे वाटायला लागले,सर्वांगाला कंप सुटला आणि अंगावर शहारे उभे झाले, शरीराचा संताप झाला अर्जुनाला उभे राहणे सुध्दा शक्य होत नव्हते आणि भ्रम झालयासारखा वाटतो आहे असे अर्जुनाला वाटले
उत्तर (b) युध्द न करण्याबाबतअर्जुनाने बरीच कारणे सांगितली कौरवांना मारून काय साध्य होणार आहे, हे माझे बांधव असल्याने यांच्या वधाचे मला पापच लागेल हे स्वजन दुष्ट जरी असले तरी त्यांना मारून सुखी होणे दुरापास्त होय ़यांनी माझ्यावर जरी हत्यार चालविले तरी मी त्यांना मारणार नाहीत्रैलोक्यच्या राज्यसाठी मी ही गोष्ट करणार नाही अशी कारणेअर्जुनाने सांगीतली
(c) शेवटीअर्जुनाने बाणासहीत धनुष्याचा त्याग केला आणि रथाच्या मध्यभागी जाऊन बसला अर्जुन शोकाने अगदी उदविगन झाला होता
Ans. 11. श्रीमती पुष्पा ताई सहस्त्रबुद्धे
उत्तर: ज्यांच्याशी युद्ध करावयाचे आहे ते सर्व नातलग आणि आपल्याहून वयोवृद्ध आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुन अत्यंत करुनेने व्याप्त झाला व शोकाकुल दुःखी होऊन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या सजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत माझ्या हातातून माझे गांडीव धनुष्य गळून पडत आहे. माझ्या सर्वांगाची आग होते आहे तसेच माझे मन भ्रमिष्ट सारखे झाले आहे आणि माझ्यात उभे राहण्याची ताकद उरली नाही मला असे वाटू लागले आहे की आता मारून आपले काहीही कल्याण होणार नाही मला विजय आणि राज्य सुखाची इच्छा नाही तर लोक्याच्या राज्यासाठीही मी यांना मारू इच्छित नाही आता तरी असलेल्या दुर्योधनाला आणि स्वजनांना मारण्यामध्ये मला पाप लागणार व मला सुख समाधान मिळणार नाही असे अर्जुन म्हणाला.
प्रश्न पहिला ज्यांच्याशी युद्ध करावयाचे आहे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले
युद्ध न करण्याबद्दल : हे कृष्णा हे कृष्णा युद्धात हे कृष्णा हे हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने युद्धाच्या इच्छेने अर्जुनाने खालील कारणे सांगितली आहेत
प्रश्न दुसरा युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितली आहेत
उत्तर: माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. माझ्या शरीराची आग होते आहे. आणि मी धड उभाही राहू शकत नाही.
प्रश्न ३. हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहे, तोंडाला कोरड पडली आहे तर शरीराला कप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत
उत्तर: यादी स्वजनांचे वर्णन आणि त्यांना न मारण्याची इच्छा अर्जुन व्यक्त करतो. दुर्योधनादि स्वजनांना मारण्यामध्ये आपल्याला पाप लागेल व आपल्याला त्यात सुख समाधान मिळणार नाही. कुळाचा नाश व मित्र द्रोह यांच्यामुळे होणाऱ्या पापापासून वाचण्यासाठी युद्ध न करणे हे योग्य असल्याचे अर्जुन म्हणतो. कुळाचा नाश झाला तर परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात आणि कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप होते. आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबीयांना ठार मारायला तयार झालो तर ते फार मोठे पाप होईल.
युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही.
उत्तर सरते शेवटी युद्धभूमीवरचे वातावरण पाहून अर्जुनाने युद्ध न करण्याचा निश्चय घेतला. अर्जुन शोक मग्न होऊन शस्त्र त्याग करून रथात मागील भागात जाऊन बसला. तो दुःखाने उद्विग्न झाला होता.
प्रश्न तिसरा पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला
Ans 11) आरती ढोबळे ताई ...
प्रश्न 1 उत्तर
अर्जुनाने समोर सैन्यांत असलेले आपले वाडवडील, आजोबा, आचार्य, काका, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे व हितचिंतक यांना पाहिले. तेथे उपस्थित त्या सर्व मित्रांना व नातेवाइकांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकूळ झाला आणि खिन्न होऊन म्हणाला हे श्रीकृष्ण ! युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत, घशाला कोरड पडली आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि अंगाची जळजळ होत आहे. माझे मन चक्रावून गेले आहे, त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. हे केशव ! मला फक्त विपरित घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे, हेसुद्धा मला कळत नाही. मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंद ! यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे ? भोगसाधने काय करायची ? किंवा जगून तरी काय करायचे ? ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धन-संपत्तीची व प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे ठाकले आहेत. ते सर्व गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे व इतर नातलगच आहेत.यांनी मला मारले तरी बेहत्तर परंतु पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे ? या आततायींना मारून तर आम्हाला पापच लागणार आहे. आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही, कारण आपल्याच कुटुंबीयांना मारून आम्ही सुखी तरी कसे होऊ ? जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळक्षयाचा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसले, तरी हे जनार्दन ! कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये ? अरेरे ! किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत. राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांनाच मारण्यास सज्ज झालो आहोत. आपल्या समोर आपले आप्त स्वजन आहे आणि त्यांच्याशी युद्ध करायचे आहे या विचारानं अर्जुन ची मनाची स्थिती आणि मानसिकता अर्जुनने भगवान श्री कृष्ण समोर मांडली.
Ans 12., माणिक थोरात ताई लिहितात....
उत्तर —1 ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग व ज्येष्ठ आहेतहे पाहताच अर्जुन शोकांकित झाला त्याची मनाची स्थीती द्विधा झाली त्या शरीराला कंप सुटला तोंडाला कोरड पडली सर्वांगावर रोमांच ऊठले त्याचा थरकाप झाला त्याला नीट ऊभे ही राहता येईना परिणामी गांडीव धनूष्य हातातून गळून पडले अर्जुनाला वाटले नको हे युध्द नको मला विजयाची सुखाचीअथवा राज्याच्या ऊपभोगाची कसलीच ईच्छा नाही यांना मारुन मी सुखी कसा होणार? यांना मारुन त्रैलोक्याचे राज्यही मला नको
उत्तर —2 युद्ध नकरण्याबद्दल अर्जुनाने पुढील कारणे सांगीतली ज्यांना नीत्य वंदन करावे असे पितामह भीष्म ,ज्यांच्यामुळे हा धनुर्धर अर्जुन उभा आहे असे गुरु द्रोणाचार्य यांच्यावर मी कसे बाण मारु?ज्यांच्या बरोबरमी लहानचा मोठा झालो एकत्र खेळलो खोटं खोटं भांडलो असे माझे बंधू ज्यांनी माझे लाड केले असे ज्येष्ठ काका मामा ,ज्यांचे आम्ही लाड करावेत असे पूत्र पौत्र तूच सांग यांच्या बरोबर मी कसे युद्ध करु दुसरे कारण म्हणजेया युद्धामुळे कुलाचा नाश होईल कुलधर्म नष्ट होईल कुलावर अधर्माचा पगडा बसेला कुलस्र्तिया बिघडतील कुलस्र्तिया बिघडल्या की वर्णव्यवस्थेचा नाश होतो श्राद्ध तर्पण क्रिया लूप्त होतात व त्यांचे पीतर अधोगतीला जातातव अशा कुलनाशास कारणीभूत होणार्यास दिर्घकाळ नरकवास भोगावा लागतो
उत्तर --3 आम्ही राज्याच्या सुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास तयार झालो हे महत्पाप करण्यास आम्ही तयार झालो हे केवढे आश्चर्य यापैक्षा आम्ही नीशस्र्त असताना कौरवांनी मारले तर आधिक कल्याणकारी होईल तेव्हा हे विनाशकारी युद्ध नको म्हणून त्याने बाणासह धनुष्य टाकले वतो रथात मागील बाजूस स्तब्ध बसला अशा प्रकारे पहिल्याअध्यायाअखेर अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
Ans 13. स्वाती राजुरकर...
प्रश्न पहिला( क)
या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकात अर्जुन सांगतो प्राणरक्षणापेक्षा धर्मरक्षण श्रेष्ठ आहे ,अर्जुनाला सुरक्षित पणा वाटतो विशेष शेम आहे असे वाटते शत्रूंनीच आपला वध करणे योग्य आहे ,असे वाटते म्हणून अर्जुन युद्ध करणार नाही असे श्रीकृष्णाला सांगतो, बाणा सही आपले धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील बाजूस जाऊन बसतो,,खरं म्हणजे वीर वृत्ती अर्जुनाच्या अंतःकरणात आहे त्या जागी करून करुन्वृत्ती आल्यामुळे वीर वृत्ती बाजूला झाली अर्जुनाला मोह झाला,. अशाप्रकारे युद्ध न करण्याचा निर्णय अर्जुन घेतो
Ans 14. माधुरी आपटे...
उत्तर 1.ज्यांच्याशी युद्ध करायचे आहे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे पाहिल्यावर अर्जुना शरिराला कंप सुटला, गाण्डीव धनुष्य हातातून सुटायला लागले, त्वचेची आग होउ लागली आणि मन भ्रमीत झाले. उभे राहणे कठिण होउ लागले, युद्ध करायची इच्छा नाहिशी झाली. कंठ सुटायला लागला, बोलणे ही कठिण झाले.
अर्जुनाला वाटायला लागले कि माझ्या स्वजनांना मारुन मी काय प्राप्त करणार आहे. राज्य मिळाले तरी मला सुख प्राप्त होणार नाही.
माझ्या समोर आजोबा, भाऊ, गुरू मामा, पुतणे, मित्र असे सर्व आहेत त्यांना मारून माला पाप लागेल.
युद्ध न करण्या बद्दल
अर्जुनाने खालील प्रमाणे कारणे दिली.
1.स्वजनांना मारून माला धन आणि राज्य प्राप्त झाले तरी सुख मिळणार नाही.
2.स्वजनांना माला पाप लागेल.
3.कुलक्षय होइल आणि कुल धर्म ही लयाला जाइल.
अधर्म माजेल आणि कुल स्त्रिया प्रदुषित होतील.
4.कुलस्त्रीया प्रदुषित झाल्याने वर्ण संकर होईल.
वर्ण संकटाने पितरांचे पतन होईल.
5.जाती धर्माचा क्षय होइल आणि मनुष्य नरकात जाइल.
पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. मी शस्त्र हाती धरणार नाही मी निःशस्त्र असतांना धृतराष्ट्र पुत्रांनी माला मारुन टाकले तरी चालेल. मी युद्ध करणार नाही असा निर्णय घेऊन तो रथाच्या मागच्या भागात बसला.
Ans. 15. कविता कुलकर्णी
तुमचा प्रश्न होता की युद्धाच्या वेळेला अर्जुनाच्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम झाला?
उत्तर आपल्या कुळातील आप्त आणि नातेवाईक पाहून दोन्ही पक्षात असूनही युद्ध करायला सज्ज झाले आहेत त्या सर्वांचे अर्जुनाने निरीक्षण केले आणि तेथे त्याच्या मनाची कालवा कालव झाली चित्तात करूणा उत्पन्न झाली आणि त्यामुळे तेथे अभिमानाने राहणारी वीर वृत्ती इर्षेने अर्जुनाच्या चित्रातला सोडून गेली ज्या उत्तम कुळातल्या स्त्रिया आहेत गुणी आहेत आणि रूपाने शोभिवंत आहेत तशात पुत्रवती असतील तर सवतीला त्या सहन करत नाही एक अर्जुनाची वीर वृत्ती ही फलदायी होती म्हणून तिला ते सहन झाले नाही
नवीन आवडलेल्या स्त्री वरील प्रेमाच्या अधिकाऱ्यामुळे विषयी मनुष्य स्वतःच्या पत्नीला विसरतो आणि मग योग्य योग्यतेचा विचार न करताच भ्रमिष्ठा सारखा त्या स्त्रीच्या इच्छेनुसार वागतो.
बुद्धी भ्रष्ट होते तसेच अर्जुनाचे त्याकरणामुळे बुद्धी भ्रष्ट झाली त्याचे मूळचे असणारे पुरुषत्त्व निघून गेले कारण त्याने आपले अंतकरण करून आला देऊन टाकले होते जाणकार मंत्रिकांकडून मंत्र उच्चार चुकला तर आटोक्यात आणावयास भुताचेच बिधा म्हणजे संचार मांत्रिकाच्या ठिकाणी होतो
तसा शास्त्रार्थविद्येत पारंगत असलेल्या अर्जुन दुर्दशा मोह ने पछाडला गेला म्हणून अर्जुनाचे असलेले ध्येय गेले अंतकरणाला करूणेच्या स्पर्शामुळे अतिशय पाझर फुटला जणूकाही चंद्रकांत मण्याला चंद्रप्रभेने स्पर्श केला आहे त्याप्रमाणे अर्जुन स्नेहाने अतिशय मोहित झाला भ्रष्ट झाला मग खेदयुक्त होऊन अर्जुनाशी बोलू लागला.
माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीर कापत असून अंगावर काटा आला आहे. मला काही कळेनासे झाले आहे माझे मला मुळीच भान राहिलेले नाही आणि मन देखील बुद्धीच्या ठाई निश्चय करण्यासाठी स्थिर नाही. हातातून गांडीव धनुष्य निसटले आहे अंगाची जळजळ होत आहे मला येथे राहू नये असे वाटते आहे माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे.
अर्जुन क्षणामध्येच मोह ग्रस्त झाला नाही सर्व आप्तजनांना पाहून युद्धाच्या समयी क्षत्रिय बाणा विसरला त्याची बोबडी वळाली
तो म्हणाला हे कृष्णा मला तर विजयाची इच्छाच नाही राज्यही नकोय आणि राज्य सुख ही नको. आम्हाला राज्य काय करायचे भूक साधने काय करायचेत किंवा जगून तरी काय करायचे सगळ्यांना ठार मारावे आणि मग भोग मिळवावे त्यापेक्षा राज्यभोगाला आग लागो ज्याच्या करता आम्ही राज्य व सुख साधने मिळू इच्छितो ते संपत्तीवर पाणी सोडून आणि शस्त्रास्त्रासमोर प्राण अर्पण करण्यासाठी युद्धाला उभे ठाकले आहेत आणि त्यांच्याशी काय युद्ध करायचे.
पलीकडे सगळे आप्तजन सोयरे आहेत आणि त्यांनी जरी मला मारायचं ठरवलं तरी पण मी माझ्या मनाने सुद्धा त्यांना मारू शकत नाही इतका अर्जुन मोह ग्रस्त झाला होता त्रिलोक याच्याख्याच्या अफाट राज्यासाठी मी हे अनुचित कृत्य करणार नाही
आपल्याच माणसांना मारून आम्ही सुखी कसे होणार. कुलक्षयाचा दोष आणि मित्र ध्रुवाचे पातक मला दिसत आहे आम्ही या पापा पासून परावर्त व्हावे
अर्जुन पुढे म्हणतो मनाने की कुळधर्म लोक पावला कुळधर्म नाहीसे झाले तर त्या संपूर्ण कुलात अधर्म पाहिला होतो एकदा का अधर्म होय लावला तर मग तेथील स्त्रियांकडून स्वैरवर्तन घडते आणि हे वार्षणीय स्त्रियांच्या सोयीवर्तनामुळे जातीची सरमिसळ होते वर्णसंकर होतो कुळाचा घात करणारा नरकात जावे लागते इत्यादींना मिळाल्याने ब्रह्मलोपणापर्यंत गेलेले आमचे पितर तेथून चूक होऊन नरकात येतात आणि मग सगळ्यांनाच नरकात जावे लागते
एवढे बोलून रणभूमीवर दुःखाने उद्विग्न झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून रथातून उडी घेऊन खाली सारख्याच्या आसनावर जाऊन बसला आणि त्यामुळे तो राजा माणूस असला तरी तेजोहीन चिखलात रुतलेल्या राजहंसा सारखा दिसायला लागला.
*जय श्री कृष्ण*🙏🙏
Ans 16. अनुजा अमीत कुलकर्णी
*अध्याय 1*
*प्रश्न 1*(a): *ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले?*
*उत्तर*:*धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे _पणजे,गुरू,मामा,भाऊ,मुलगे,नातू,मित्र,सासरे आणी हितचिंतक यांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला,हे कृष्णा! माझे अवयव गळून जात आहेत;तोंडाला कोरड पडली आहे;शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत.तसेच हातातून गांधिव धनुष्य गळून पडत आहे.अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे.त्यामुळे मी उभादेखील राहू शकत नाही.हे परिणाम अर्जुनाच्या शरीरावर व मनावर झाले.आणी त्यावर अर्जुनाला विपरीत चिन्हे दिसली आणि युद्धात आप्तांना मारून कल्याण होणार नाही. असे अर्जुनाला वाटले.*
*(b)*:*युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितली आहेत?*
*उत्तर*:*अर्जुनाने युद्ध न करण्याची पुढील कारणे सांगितली.अर्जुन म्हणाला हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? यांना मारून आम्हाला पापच लागणार. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना _धृतराष्ट्रपत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. त्यांना मारून आम्ही सुखी कसे होणार ?कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही ,या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करू नये?कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होते.आणि त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप पसरते.पाप वाढल्यामुळे कुळातील स्त्रीया बिघडतात,त्यामुळे वर्णव्यवस्थेचा नाश होतो. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्या आणि कुळाला नरकाला नेतो. कारण श्राद्ध,जलतरपण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात.अर्जुन म्हणतो हे जनार्दन!ज्यांचे कूळधर्म नाहीसे झाले आहेत, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते.अर्जुन म्हणतो की किती खेदाची गोष्ट आहे!आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो,हे केवढे मोठे पाप करायला जात होतो.ही कारणे अर्जुनाने युद्ध न करण्याबद्दल सांगितली आहेत.*
*(C)*पाहिल्या आध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला?*
*उत्तर*:*रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला.*
*मी युद्ध करणार नाही.हा निर्णय अर्जुनाने पाहिल्या अध्यायात शेवटी घेतला.*
Ans 17. सुभाष कुलकर्णी
प्रश्न १ A ज्यांच्याशी युद्ध करायचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले?
उत्तर -- ज्यांच्याशी युद्ध करायचे ते नातलग आणि जेष्ठ आप्तेष्ट पाहून अर्जुन शोकाकुल झाला स्वजनाना पाहून त्याचे अवयव गळून गेले तो गात्र गळीत झाला. त्याच्या तोंडाला कोरड पडली. शरीराला कंप सुटला.अंगावर रोमांच उभे राहिले. हातातून गाण्डिव धनुष्य गळून पडले. मन भ्रमिष्टा सारखे झाले. तो उभा देखील राहु शकत नव्हता. स्वजन आप्ताची हत्या करून पाप कर्म घडु नये यात हीत नाही म्हणून अर्जुन शोकाकुल झाला. व्यथेने व्याकुळ झाला. जिंकुन असे सुख भोगण्याची त्याची इच्छा नव्हती.
प्रश्न २ B -- युद्ध न करण्या बद्दल कोणती कारणे आहेत?
उत्तर -- अर्जुनाच्या मनात आले तो श्रीकृष्णाला म्हणाला हे केशव आप्तांना मारुन कल्याण होईल असे वाटत नाही.मला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही, सुखाची ही नाही. हे गोविंदा असे राज्य काय करायचे, अशा भोगांनी जगण्याने काय लाभ. त्रैलोक्याच्या राज्यासाठी ही मी ह्या सर्वांना मारु इच्छीत नाही मग पृथ्वीची काय कथा? धृतराष्ट्राच्या मुलांना मारुन कोणते सुख मिळणार. त्यांना मारुन पापच लागणार. हे माधवा आपल्या बांधवांना मारणे योग्य नाही. कुटुंबियांना मारुन कसे सुखी होणार. कुळनाशाचे पातक मला नको आहे, कारण लोभापायी त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. या पापा पासुन परावृत्त होणेच योग्य आहे. कुळाच्या नाशामुळे कुळधर्म नाहीसा होतो, कुळधर्म नाहीसा झाल्याने पाप वाढते,पाप वाढल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात. स्त्रीया बिघडल्यावर वर्ण व्यवस्थेचा नाश होतो. वर्ण संकर हा कुळाचा नाश करणाऱ्याला आणि कुळाला नरकात नेतो. पितर अधोगतीला जातात कारण ते श्राध्द जलतर्पन इत्यादीला मुकतात. वर्ण संकर दोषांमुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म नाहिसे होतात. मोठया प्रमाणात पाप वाढते. हे जनार्दन कुळधर्म नाहिसे झालेल्यांना अनिश्चित काळासाठी नरकात रहावे लागते. अरेरे किती खेदाची गोष्ट आहे बुद्धीमान असुन राज्य आणि सुखाच्या लोभापायी कुटुंबियांना ठार मारायला लागलो. केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो. निःशस्त्र प्रतिकार न करणाऱ्या हातात शस्त्र न घेतलेल्या मला धृतराष्ट्र पुत्रांनी ठार मारले तरी चालेल ते मला कल्याण कारक ठरेल.
प्रश्न ३ C -- पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला ?
उत्तर --- रणांगणावर दुःखाने मन व्यथित झालेला अर्जुन असे बोलून बाणा सह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसतो.
Ans 18. शरयू क्षीरसागर
प्रश्न 1ला ब चे ऊत्तर
युध्द न करण्या बद्दल अर्जुन ,श्रीकृष्ण ला खालील कारणे सांगत आहेत ,
(1)मला या युद्धाचे विपरीत परिणाम दिसत आहेत ,युद्धात सर्व आप्तेष्ट मित्र, वृद्ध ह्याना मारुन काय कल्याण होणार आहे असे मला वाटते (2)
हे कृष्ण ,मला विजयाची ईच्छा नाही,राज्याची ईच्छानाही की सुखाचीनाही हेगोवीदा अम्हाला असे राज्य काय कामाच्ये अशा भोगावी आणी जगण्याने काय लाभ होणार
(3) राज्य भोग आणी सुखाची अपेक्षीत आहेतच सर्व जण संपत्तीची आणी जीवितहानी आशा सोडून युद्धात ऊभा टाकले आहेत गुरू काका मुले मामा सासरे नातू आहेत हे जरी मला मारण्यास तयार असले तरी मी सर्वाना मारू ईच्छा नाही
अरे देवा किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असून सुद्धा राज्य आणीसुख याच्या लालसेनेकुटूबियाना ठार मारण्यास तयार झालोत हे केवढे पाप आहे
.प्रश्न (1) क चे ऊत्तर ,
कुटूंब वत्सल माहीत झालेला अर्जुनाने शोकमग्न, शोकाकुल ,मोहीत होऊनशस्र त्याग केला ,रणांगणावर दुःखद ऊद्विग्न मन झालेले असल्याने बाणासह धनुष्यबाण टाकून देण्याचा निर्णय घेतला
आपले गाण्डीव टाकून युध्द न करण्याचा निर्णयाने रथाच्य मागील भागात जाऊन खाली बसला ,स्पष्ट युध्द न करण्याचा निर्णय घेतला
प्रश्न 1ला अ, ऊत्तर,
भगवद्गीतेतील पहिला अध्याय मध्ये धर्म क्षेत्र,कुरुक्षेत्र
चालत असलेले महाभारत युध्द भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या रथाचे सारथी होते ,युध्द सुरूवातीपासूनच मला माझा रथ रणांगणावर घेऊन चल कारण युद्धात कोण, आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक, आहेत कौरव,पांडव सेनेत आहेत ते पाहवायाचे आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण
दोन्ही सैन्याचा मधोमध रथ ऊभा करतात ,त्याच बरोबर अर्जुन, कौरवसेनेत असलेले आपले स्वकीय, आप्तेष्ट, काका,मामा,गुरू,सासरे,मुल,नातेवाईक, याना पाहतात ,तोच अर्जुन नाचा कौटुंबिक मोह जागा झाला ,ज्याप्रमाणे कुटुंबाची ममता हीविवेकाला दाबून टाकते त्याचा प्रभाव राहू देत नाही,मनुष्याला मोह ममतेत तल्लीन करून टाकते त्याप्रमाणेच ,अर्जुनाची स्थिती झाली ,आणी मोहामुळे मायेमुळे करुणेने व्याकुळ झाला सर्व बांधवाना पाहून शोकाकुल झाला
याचा परिणाम अर्जुन च्या मनावर व शरीरावर झाला ,आध्याय
अध्याय 1श्लोक 25
मध्ये अर्जुन श्रीकृष्ण ला म्हणतात हे कृष्णा,युध्दाच्या ईच्छा ने रणांगणावर ऊभा असलेले हे माझे स्वकीय स्वजनाना पाहुन माझे अंग कापत आहे अवयव गळून पडतात की काय असे वाटते ,तोंड कोरड पडत आहे त्वचेवर केस ताठ होत आहेत कंप सुटला आहे
हातातून गाण्डीव गळून जात आहे तसेच मन भ्रमीष्टा सारखे झाले आहे मला ऊभे पण राहता येत नाही आणी मी,शूरवीर धनुर्धर योद्धा असूनही युध्द करण्यास असमर्थ होत आहे ,कारण हे सर्व माझे स्नेही आहेत
Ans. 19. कुंदा तुपकर
प्रश्न 1 ) a) उत्तर _ ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व आपले नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहील्यावर अर्जुनाचे अंतःकरण करूणेने भरून आले.आणि तो शोकाकुल होऊन म्हणाला हे श्रीकृष्णा या सर्व आप्त स्वजनांना युद्धासाठी समोर उभे पाहून माझे सर्व अवयव गळून जात आहे आणि माझ्या घशाला कोरड पडून माझे सर्व शरीर थरथरत आहे अंगावर रोमांच उभे राहतात आहे. हातातील गांणडीव धनुष्य गळून पडते आहे , माझ्या अंगाचा दाह होऊन मन भ्रमिष्ट होत आहे.या अशा स्थितीत मी उभा देखील राहू शकत नाही आणि हे सारे विपरीत चिन्हं बघुन युद्धासाठी उभ्या असलेल्या आप्त, स्वजनांना मारून आमचे कल्याण होईल असे मला वाटत नाही.
B) उत्तर _हे श्रीकृष्णा आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य,भोग आणि सुखादी अपेक्षित आहे तेच सर्वजन संपत्ती ची
आणि जीविताची आशा सोडून माझ्या समोर उभे राहिले आहेत म्हणून हे माधवा आपल्या बांधवांना ,धुरूतराष्ठर पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबीयांना मारून आम्ही कसे सुखी होणार.
C) उत्तर _कुलनाषाचा दोष आणि पाप माझ्या हातून होण्यापेक्षा जर शस्त्ररहित व प्रतीकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धुरूतराष्ठरपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते कुळासाठी अधिक कल्याण कारी ठरेल असे म्हणून दु:खाने उदिगन मन झालेल्या अर्जुनाने बानासगट धनुष्य खाली टाकले आणि युद्ध न करण्याचा निर्णय घेऊन रथाच्या मागील बाजुस जावून बसला.
Ans 20 ज्योती साठे ...
युध्दाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या आपल्या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत, हातातून गाण्डीव धनुष्य गळुन पडत आहे अंगाचा दाह होत आहे मन भ्रमिष्टा सारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहु शकत नाही युध्दात आप्तांना मारुन कल्याण होईल असे मला वाटत नाही
हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाची ही नाही असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने लाभ तरी काय होणार स्वजनांना आप्तांना मारुन पापच लागणार आपल्याच कुटुंबीयांना मारुन कसे सुखी होणार
कुळाचा नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असताना आम्ही पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करु नाही वर्णसंकर कुळाचा नाश होण्या पेक्षा जरी मला शस्त्र रहीत व प्रतिकार न करणार्याला धृतराष्ट्र पुत्रांनी ठार मारले तरी ते अधिक कल्याणकारी होईल असे म्हणुन अर्जुन उद्विग्न मनाने बाणासह धनुष्य टाकून रथाच्या मागील भागात जाऊन बसला
Ans 21. नीलम तरवडे...
||जय श्रीकृष्ण||
प्रश्न आमचा उत्तर तुमचे
प्र. १(a )ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले?
उत्तर: ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाचे अवयव गळून पडू लागले, तोंडाला कोरड पडली, शरीराला कप सुटला व अंगावर रोमांच उभे राहिले, हातातून गांडीव गळून पडू लागले, अंगाचा दाह होऊ लागला आणि मन भ्रमिष्ठा सारखे झाले, तो उभाही राहू शकत नव्हता.
प्र. १(b) युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितली आहेत?
उत्तर: युद्ध न करण्याबद्दल अर्जुन भगवंतांना म्हणाला आप्तजनांना, बांधवांना, गुरुजनांना मारून आम्ही सुखी न होता आम्हाला पापच लागेल. कुळाचा नाश होऊन कुळधर्म नाहीसा होईल व वर्णसंकर होईल. राज्य व सुख यांचा लोभाने आप्तान्ना मारून पापाचे भागीदार आम्हाला व्हायचे नाही म्हणून युद्ध करणार नाही.
प्र. १(c) पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला?
उत्तर : शेवटी रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेल्या अर्जुनाने बाणा सह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला.
Ans. 22. सौ.स्वाती पाटील.
(१) अर्जूनाने कुरू क्षेत्रावर आपलेच आप्त स्वकीय समोर बघितले व तो गांगरून गेला वास्तविक त्याने कौरवांच्या बरोबर छोट्या कारणांसाठी युध्द केली होती परंतू ह्या वेळेस चे युध्द हे मरायचे कींवा मारायचे असे पराकोटिचे युध्द होते. ज्यावेळेस असे हे पराकोटिचे युध्द असते त्यावेळेस सज्जन व्यक्ती पुढचा अनर्थ टळावा म्हणून युध्दापासून निवृत्त होतो तो श्रेयस मार्ग पत्करतो.अर्जुनाच्या मनात करूणा उत्पन झाली तो खिन्न झाला व परावृत्त झाला.समोर आप्तस्वकीय बघुन त्याच्या शरीराचे गात्र शिथिल झाले व तोंडाला कोरड पडली.शरीराला कंप सुटला,भितीने अंगावर काटा आला. त्याला गांडिव धनुष्यावर खुप अभिमान होता ते पण त्याच्या हातातुन गळून पडले तो अक्षरशः गर्भगळीत झाला.
(२) हा सर्व विपरीत तत्वज्ञानाचा परिणाम अर्जुनाच्या मनावर झाला कारण धृतराष्टाने युध्दाच्या अगोदरच त्याचे Brain wash केले होते.सरळ मनाच्या अर्जुनाला युध्दाची सर्व विपरीत परिणाम दिसू लागले त्यामुळे हे राज्य नको,भोग नको,सुख नको असे त्यास वाटु लागले.कौरवांना मारून आपण सुखी होऊ का ?त्यांना मारून आपण पापाचे धनी होऊ व त्यामुळे कुलक्षय होईल,सनातन धर्म नष्ट होईल,अधर्म माजेल व कुलस्त्रिया कुशीत होतील व हे सर्व आपल्यामुळे होईल असे वाटून त्याने शस्त्र खाली ठेवले.
(३)अत्यंत शोकाकुल होउन अर्जुनाने हातातले शस्त्र टाकून दिले व खिन्न होऊन तो रथाच्या मागच्या भागात जाऊन बसला.
Ans 23. अरुषा एरंडे....
प्रश्न आमचा उत्तर तुमचे
अध्याय १
1. ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले?
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात, जो अर्जुन विषाद योग (अर्जुनाच्या विषादाचा योग) म्हणून ओळखला जातो, अर्जुनाला तीव्र भावनिक आणि शारीरिक अस्वस्थता जाणवते जेव्हा तो कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपले नातेवाईक, गुरु आणि आदरणीय वडीलधारी मंडळी पाहतो.अर्जुन दु:ख आणि करुणेने व्याकुळ होतो. अर्जुन आपल्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध, विशेषतः प्रिय आजोबा भीष्म आणि पूजनीय गुरु द्रोणाचार्यांविरुद्ध युद्ध करावे लागेल, या विचाराने व्यथित होतो. तो शोकमग्न होतो आणि त्याची दृढता हरवते. अर्जुनाच्या मनात नैतिकतेचे द्वंद्व अथवा धर्मसंशय निर्माण होतो. त्याला वाटते की अशा युद्धात सहभागी होणे योग्य वा धर्मसंगत आहे का, कारण हे युद्ध त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचा नाश करणार आहे. अर्जुनाच्या मनात पाप आणि अधर्माची भीती निर्माण होते. त्याला वाटते की आपल्या नातेवाईकांना मारणे हे पाप आहे आणि त्यामुळे कुटुंबसंस्था नष्ट होईल, ज्यामुळे संपूर्ण समाजात अराजकता निर्माण होईल. अर्जुन निराश आणि असहाय्य होतो . तो आत्मविश्वास गमावतो आणि म्हणतो की अशा युद्धात विजय मिळवण्याचा काहीही उपयोग नाही.
अर्जुनाच्या शरीरावर होणारे परिणाम:
अर्जुनाला कंप आणि अशक्तपणा जाणवतो. तो सांगतो की त्याचे हातपाय थरथरत आहेत आणि शरीर कमकुवत झाले आहे. प्रचंड चिंतेमुळे त्याचे तोंड कोरडे पडते. शरीर थरथरते आणि अंगावर शहारे येतात . त्याच्या तीव्र भावनांमुळे शरीरावर रोमांच उभे राहतात. त्याचे धनुष्य गांडीव त्याच्या हातातून निसटते, जे त्याच्या लढण्याच्या इच्छाशक्तीच्या लोपाचे प्रतीक आहे. त्याच्या त्वचेमध्ये असह्य जळजळ जाणवते, जी मानसिक तणावाचे लक्षण आहे. त्याला चक्कर येते, मानसिकदृष्ट्या गोंधळलेला होतो आणि स्पष्ट विचार करू शकत नाही. शेवटी, तो घोषित करतो की तो युद्ध करणार नाही आणि रथावर गोंधळलेल्या आणि हतबल अवस्थेत बसून राहतो. ही सर्व लक्षणे अर्जुनाच्या मनातील तीव्र मानसिक आणि भावनिक संघर्षाचे प्रतिबिंब आहेत.
2. युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितले आहेत ?
भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग ह्या पहिल्या अध्यायात, अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धात लढण्यास नकार देण्यासाठी विविध कारणे मांडतो. त्याची कारणे तर्कभावना, नीतिमत्ता, कौटुंबिक कर्तव्य आणि सामाजिक परिणाम यांवर आधारित आहेत. अर्जुन रणांगणावर दोन्ही बाजूंना आपले नातेवाईक, गुरु आणि मित्रांना पाहतो आणि शोकमग्न होतो. त्याला त्यांच्याबद्दल अपार करुणा अथवा भावनिक दुर्बलता वाटते आणि तो त्यांना मारू इच्छित नाही. अर्जुनाला वाटते की जर त्यांचा बळी जाऊन विजय मिळवायचा असेल, तर तो विजय निरर्थक आहे. अर्जुन युक्तिवाद करतो की आपल्या नातेवाईकांना, विशेषतः भीष्म आणि द्रोणाचार्यासारख्या वडीलधाऱ्यांना ठार मारणे हे एक अक्षम्य पाप असेल. तो भीती व्यक्त करतो की या युद्धात सहभागी झाल्यास तो मोठ्या विध्वंसाचा आणि पापकर्मांचा दोषी ठरेल. अर्जुनाला चिंता आहे की अनेक कुलीन कुटुंबांतील पुरुष मृत्युमुखी पडल्यास त्यांच्या वंशाचा नाश (कुल नाश) होईल. परिणामी, कुलधर्माचे पालन नष्ट होईल, ज्यामुळे समाजात नैतिक आणि सामाजिक गोंधळ माजेल. अर्जुनाला भीती वाटते की जर योद्धा कुटुंबांतील पुरुष युद्धात मृत्युमुखी पडले, तर स्त्रिया असुरक्षित होतील आणि त्यामुळे समाजात नैतिक अध:पतन (वर्णसंकर) होईल. याचा परिणाम म्हणून समाजात अव्यवस्था निर्माण होईल. अर्जुन म्हणतो की जर कुटुंबसंस्था नष्ट झाली, तर पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देणारे श्राद्ध आणि पिंडदान यासारखे धार्मिक विधी बंद होतील, त्यामुळे पूर्वजांचे कल्याण होणार नाही आणि संपूर्ण समाज आध्यात्मिकदृष्ट्या अधोगतीला जाईल. अर्जुन म्हणतो की जरी त्याला युद्धात विजय मिळाला, तरी त्याच्या नातेवाईकांशिवाय त्याला त्या विजयाचा काही उपयोग वाटणार नाही. त्याला राज्य, भोग किंवा जीवन यांचीही इच्छा उरलेली नाही. शोक आणि गोंधळाने त्रस्त झालेला अर्जुन सुचवतो की युद्ध करणे टाळून तो भिक्षुकी जीवन जगणे अधिक श्रेयस्कर समजतो, कारण त्याला वाटते की आपल्या वडीलधाऱ्यांना ठार मारून मिळवलेल्या वैभवाचा काहीच उपयोग नाही. अर्जुनाला भीती वाटते की शत्रूंना ठार मारल्यास त्याच्यावर कठोर कर्मफळांचा म्हणजेच कर्माच्या परिणामांचा भार पडेल, जो त्याच्या आध्यात्मिक प्रवासाला अडथळा ठरू शकतो.
3. पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला?
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या शेवटी, अर्जुन शोक, गोंधळ आणि नैतिक द्वंद्वाने पूर्णपणे व्याकूळ होतो आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात न लढण्याचा अंतिम निर्णय घेतो. तो आपले दिव्य धनुष्य गांडीव आणि बाण खाली ठेवतो. तो मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचलेला असतो. युद्धाचा उद्देश न समजल्याने, तो लढण्याची इच्छा गमावतो. तो आपल्या रथावर शोकमग्न , पूर्णपणे दुःखाने हतबल झालेल्या अवस्थेत बसतो. तो मौन राहतो आणि युद्धास नकार देतो. त्याचे मन संशय आणि भावनांनी भरलेले असल्याने, तो युद्धात सहभागी होऊ इच्छित नाही आणि माघार घेण्याचा निर्णय घेतो. येथेच अर्जुन विषाद योग पहिला अध्याय संपतो आणि पुढील दुसऱ्या अध्यायासाठी भूमिका तयार होते. दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करण्यास सुरुवात करतात आणि त्याला खऱ्या क्षत्रिय धर्माची जाणीव करून देतात.
Ans 24 मालती जोशी...
__#प्रश्न आमचा उत्तर तुमचे (अध्याय पहिला) प्रश्न पहिल्याचे उत्तर__अध्याय १ लोक 28, 29 ,30 मध्ये या प्रश्नाचे उत्तर आहे अर्जुन म्हणतो 'सीदंती मम गात्रानि ' ही अवस्था आपण अर्जुन आहे असे समजून अनुभवायला पाहिजे अर्जुनाच्या सर्व अवयवांना कप सुटला त्याचे शरीर थरथरायला लागले त्याच्या तोंडाला कोरड पडली त्याच्या शरीरा वरती रोमांच उभे राहिले गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळू लागले त्याच्या त्वचेचा दाह होऊ लागला त्याला उभे ही राहता येईना ,त्याला स्वतःचा विसर पडला त्याला फक्त वाईटच लक्षणे दिसू लागली शरीराने आणि मनाने अत्यंत दुर्बळ आणि हताश व गल्लीत गात्र झाला २) प्रश्न दुसऱ्याचे उत्तर__श्लोक 31 ते 44 मध्ये युद्ध न करण्याची कारणे आहेत __#१) युद्धात नातलगांना ठार मारून मिळणारा विजय राज्य सुख याची मी इच्छाही करू शकत नाही #२) ज्यांच्या करता राज्य सुख पाहिजे तेच आपली संपत्ती प्राण सोडून माझ्या पुढे युद्धात उभे आहेत त्यांना ठार मारण्याची इच्छा का करावी त्रैलोकाच्या राज्य साठी मी त्यांच्याशी लढायला तयार नाही मग पृथ्वीची काय कथा. #३) अशा या आतताई आली नातलगांना ठार मारले तर मला पापच लागणार त्यांना मारून मी सुखी कसा होईल #४) लोभाने व्याप्त झालेले नातलग कुटुंबीय मित्र यांना मारण्यात त्यांच्याशी भांडण्यात पाप आहे हे माहीत असूनही ते का करावे #५) कुळाच्या नाशाबरोबर परंपरा नष्ट होतात आणि कुळावर अधर्माचा पगडा बसतो कुळातील स्त्रिया बिघडतात स्त्रियांचे अध:पतना पासून नको असलेली प्रजा उत्पन्न होते व वाढते त्यामुळे नरकमय स्थिती निर्माण होते भ्रष्ट कुळामध्ये पूर्वजांना अन्न आणि जल तरपणाची क्रिया होत नाही कुळ परंपरांचा नाश करणाऱ्यांच्या दृष्टकृत्यामुळे सर्व प्रकारच्या न्याती योजना न्याती धर्म आणि कुटुंब कल्याण्याची कार्य नष्ट होतात जे कुल परंपरा नष्ट करतात ते नेहमी नरकात राहतात राज्य सुख उपभोगण्याच्या इच्छेने लोभाने उद्युक्त होऊन युद्ध करणे मला योग्य वाटत नाही अशी कारणे अर्जुनाने सांगितली
३) प्रश्न तिसऱ्याचे उत्तर__श्लोक 45,46 पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हणतो की धृतराष्ट्रांच्या पुत्रांशी लढण्यापेक्षा त्यांनी शस्त्रधारी नसलेल्या व प्रतिकार न करणाऱ्या मला ठार मारले तरी ते मी अधिक चांगले समजेल असे म्हणून अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकून दिले आणि अत्यंत शोकाकुल चित्ताने रथात खाली जाऊन बसला
Ans 25. जयलक्ष्मी गजानन तळेकर.
प्रश्न (a) ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि ज्येष्ठ आहेत हे पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर त्याला काय वाटले?
पांडव सेना व कौरव सेना आपापले सैन्य घेऊन धर्म क्षेत्र (कुरु क्षेत्र ) या ठिकाणी समोरासमोर उभे राहिले. हे युद्ध केवळ साठीसाठी नव्हेतर धर्म आणि अधर्माच्या मध्ये होते. हे युद्ध होऊ नये यासाठी श्री कृष्ण व पांडुपुत्राने खूप प्रयत्न केले. परंतु धृतराष्ट्र व दुर्योधनाच्या सत्तेच्या लालसेपोटी व हट्टापायी हे युद्ध करणे अनिवार्य झाले. त्यानंतर भगवंतानी धर्म परिवर्तनसाठी युद्ध होणे गरजेचे आहे. याबद्दल पांडू पुत्रांना समजून सांगितले. श्री कृष्ण स्वतः अर्जुनाच्या राठाचा सारथी बनले.
नीतिमत्ता,न्याय, अन्याय, धर्म, अधर्म यामधील ही लढाई होती. जेंव्हा दोन्ही बाजूचे सैन्य युद्धसाठी सज्ज झाले तेंव्हा विविध प्रकारचे वाद्य वाजवून युद्ध घोषित केले गेले. या सर्व वाद्याचा आवाज युद्ध भूमीवर घुमत होता. युद्धाचे वातावरण भयावह बनले होते. व युद्धाचे गांभीर्य दोहो बाजूच्या सैन्यामध्ये दिसू लागले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि युद्धाच्या महत्वाचे गांभीर्य दिसू लागले.
श्री कृष्ण व अर्जुन पांढऱ्या घोड्यानी सज्ज झालेल्या रथात बांधून युद्धसाठी तयार झाले. श्रीकृष्णानी आपला पांचजन्य नावाचा शंख व अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख भीमाने पौनड्र, युधिष्ठिर यांनी अनंत विजय, नकुल व सहदेवाने सुघोष व मणिपूष्पक नावाचे शंख वाजवून युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सर्व योध्यानी आपापले शंख वाजवून दुजोरा दिला.
त्यानंतर हनुमंताचे चिन्ह असलेले ध्वज राथा वर होते.अर्जुनाने युद्धच्या तयारीत असणाऱ्या कौरव सैन्याना पाहून भगवंताना सांगितले की हे अच्युता माझा रथ दोन्हीही सैन्याच्या माध्यभागी उभा करा. त्याला युद्धाचे गांभीर्य व आपल्या समोर उभे असणाऱ्या योध्या बद्दल जाणून घ्यायचे होते. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. आपल्यासमोर उभे असलेले आपलेच ज्येष्ठ नातलग, काका, आजे, पणजे, गुरु, मामा भाऊ, मुलगे, नातू, सासरे, व आपले हितचिंतक बघून त्याला युद्धाचे गांभीर्य लक्षात आले.
सर्व आपल्या ज्येष्ठ नातलग व
गुरुवर्यांना पाहून अर्जुन चिंताग्रस्त व दुःखी झाला. त्याच्या मनावर परिणाम झाला. त्या सर्वांना पाहून शोकाकुल झाला. त्याचे डोळे पूर्ण अश्रूनी भरून आले.. तो श्री कृष्णाला सांगतो की, युद्धभूमीवरील स्वकी्यांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. माझ्या शरीराला कंप सुटला आहे. अंगावर भयंकर रोमांच उभे राहत आहेत. गांडीव (धनुष्य ) माझ्या हातून गळून पडत आहे. माझी त्वचा देखील जळत हाहे. माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही आहे. अर्जुन शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही अस्थिर आहे. तो भगवंताला सांगतो की, मला युद्धाची विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आपल्याच स्वकीयना मारून माझे कल्याण होणार नाही आहे.
भगवंताना अर्जुन सांगतो की, मला राज्याची, विजयाची, सत्तेची कदापि इचछा नाही आहे. आपल्याच स्वकीयना मारून मिळवलेले राज्य काय कामाचे? अशा भोग वास्तुनी व अशा जगण्यानी काय लाभ होणार आहे? त्याला आपल्याच नातेवाईकांना मारून राज्य नका आहे. तो श्रीकृष्णला युद्ध करण्यास नकार देतो. गुरुवर्यांना पाहून त्याला आतोनात
दुःख होते.
b) युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती करणे सांगितली?
उत्तर ) आपल्यासमोर युद्धा साठी सज्ज असणाऱ्या पितामह भीष्म, नातेवाईक, गुरुजन व मित्रमंडळींना पाहून अर्जुन शोकाकुल होतो. तो भगवंताना सांगतो की, हे मधुसूदना, हे सर्व जरी मला मारण्यासाठी तयार झाले तरी किंवा त्रयीलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा मी यांना मारू शकत नाही. तो हे स्पष्ट करतो की, नातेवाईकांच्या मृत्युंचे दुःख त्याच्यासाठी इतके भयंकर आहे की, कुठल्याच प्रकारच्या मोहाने तो त्यांना मारण्याचे कृत्य करू शकत नाही.
तो भगवंताना सांगतो की, आपल्याच काकाच्या मुलांना मारून आंम्हाला कोणते सुख मिळणार आहे. त्यामुळे तर आम्ही सर्व पापाचेच भागीदारी होणार आहेत. या लोकांच्या मृ्टीमुळे आमचे पाप वाढत जाणार. त्या लोकांचा लोभ व स्वार्थ बघितला तरी मी आपल्याच कुळचा नाशिक पाहू शकत नाही. त्या लोकांची दृष्टी इतकी धूसर झाली आहे की ते युद्धाचे परिणाम ओळखू सकात नाहीत.येणाऱ्या कुलधर्मावरील संकटाच्ची चिंता व्यक्त करतो. तो सांगतो की, जेंव्हा कुटुंब आणि समाजाच्या नैतिक व धार्मिक श्रद्धांचा अफहार असलेला कुळधर्म नष्ट होतो तेंव्हा सर्व कुळव्यवस्था अस्थित्वात राहत नाही. तेंव्हा आपल्याच स्वकीया बरोबर युद्ध न करता कुळधार्माचे रक्षण करणे महत्वाचे आहे. नाहीतर आधार्म वाढत जाईल.
तो युद्ध न करण्यात यासाठी हे ही कारण सांगतो की, कुळाचा नाशिक झाला तर परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. तसें झालेतर त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. जेंव्हा अनिटी व कुकर्माचा प्रसार वाढतो तेंव्हा स्त्रिया असंस्कृत होतात. युद्धमुळे सर्व पुरुष योद्धे मारले जातात. फक्त स्त्रिया मागे राहतात त्यामुळे ही परीक्षिती निर्माण होते. समाजात अनैतिकता निर्माण होते. युद्धा मुळे समाजात अधोगती निर्मळण होते. अशांतता निर्माण होते. त्यामुळे त्याचा परिणाम स्त्रियांच्या स्थितीवर होतो. युद्ध न करण्याचे हे हिकर्ण सांगतो की, कुळाच्या नशाने केवळ कुटुंबाचेच नुकसान नव्हेतर पूर्वज्याच्या आत्म्यावर सुद्धा परिणाम होतो. कुळधार्म व धार्मिक कृत्ये न पाळणे हा एक गंभीर दोष आहे. त्याचा परिणाम सध्याच्याच पिढीला नव्हेतर येणाऱ्या पिढीला व पूर्वजना सुद्धा भोगावा लागतो.
युद्ध न करण्याचे कारण सांगताना अर्जुन म्हणतो की, युद्ध केल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून कुळ आणि जातीधर्म निराधार झाल्यामुळे समजव्यवस्था धोक्यात येते. त्यामुळे धर्म आणि कुळाचा नाशिक करणार्यांना व कुळाला नरकातच जावे लागते.
अर्जुन हे ही कारण सांगतो की कौरवाच्या शास्त्रधारी सैनिकांनी मला मारले व माझ्याकडे प्रतिकार करायला कोणतेच शस्त्र नसलेटरी माझ्यासाठी ते हित कारक असेल. त्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती लाभणार. तो स्वकीयावर शस्त्र उचलू शकणार नाही. अशी अनेक करणे तो श्री कृष्णा ला सांगतो युद्धाची तीव्रता आणि त्याचे परिणाम त्याला चिंतीत करतात. म्हणून तो युद्ध करण्यास स्पष्ट नकार देतो.
c) पहिल्या अध्यायात शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला?
उत्तर ) आपल्याच समोर आपल्याच नातलग, मित्रपरिवार व गुरुवर्यांना युद्धसाठी उभे असलेले पाहून अर्जुनाची मन::स्थिती अत्यंत अस्वस्थ व निराशामय होते. त्याची स्थिती लढ ण्यास अनुकूल नसते. आपल्याच नातेवाईकांना मारून तो दुःखी होऊ शकत नाही. युद्धात त्याचा मृत्यू त्याच्या आत्म्याच्या शांततेसाठी सुरक्षित आणि योग्य असेल. तो म्हणतो तो आपल्याच नातेवाईकांचे प्राण कधीच घेऊ शकणार नाही. आपल्याच जेष्ठाना व गुरुजनाना आपल्या विरुद्ध लढण्यासाठी उभे असलेले पाहून त्याचे मन भरून येते. त्याला तिथे उभही राहता येत नाही. त्याचे मनात अत्यंत दुःखी होते. तो श्री कृष्णास युद्ध करण्यास नकार देतो. आपल्याच लोकांना मारून मी पाप करू इच्छित नाही असं तो सांगतो. त्याची स्थिती फारच दयनीय होते. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला कौर्वानी मारले तरी चालेल. तरी ते मला हितकारक असेल.
युद्धादरम्यान अर्जुनाचे मन दुखणे व चिंतेने ग्रासलेलं असते. युद्धाची तीव्रता व त्याचे भयानक परिणाम पाहून त्याचे मन अस्वस्थ होते. त्याच्या हातातून गांडीव (धनुष्य ) गळून पडतो. आपल्याच स्वकीया बरोबर युद्ध करायच्या विचाराने त्याचे मन व्याकुळ होते. त्याचे डोळे अश्रूनी भरून येतात. अत्यंत दुःखाणने मन उद्विगन झालेला अर्जुन श्रीकृष्णाला युद्धास नकार देत आपल्या हातातील गांडीव धनुष्य बाणा सह जमिनीवर टाकतो. व युद्ध न करण्याच्या निर्धाराने आपल्या रथाच्या मागील बाजूस जाऊन बसतो.
अशाप्रकारे भगवद गीतेचा पहिला अध्याय संपतो. जो उपनिषदा प्रमाणेच पवित्र आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात सादर केला आहे. या अध्यायला 'अर्जुनविषादयोग 'म्हणून संबोधले गेले आहे. या अध्यायात अर्जुनाने आपला मानसिक संघर्ष व दुःख श्रीकृष्णा समोर मांडला आहे.
Ans. 26. मीरा ओक ....
१) ज्यांच्याशी युद्ध करायचे ती सर्व ज्येष्ठ आणि नातलग आहेत हे पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर आणि मनावर कोणते परिणाम झाले व त्यावर अर्जुनाला काय वाटले?
उत्तर : _ युद्ध अटल आहे हे ठरल्यानंतर पितामह भीष्मांनी शंखनाद केला. रणांगणावर रनवाद्ये वाजायला लागली. भगवंतांनीही त्यांचा पांचजन्य शंख तसेच भीम , अर्जुन यांचे असे सर्वांचे शंख पाठोपाठ वाजायला लागले. संपूर्ण वातावरणच बदलून गेल. सर्वांनाच खूप उत्सुकता वाटत होती आता काय होणार?
शंखनाद याचा अर्थ आम्ही युद्धाला तयार आहोत, सज्ज आहोत. भगवान गोपाल कृष्ण रथाचे सारथ्य करतायत. आता अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध आणायला सांगितलेला आहे. अर्जुनाने निरीक्षण केले की त्याला कोणाकोणाला मारायचे आहे? कारण लढाईचे काही नियम असतात. त्यानुसार लढाई बरोबरीच्या विराशीच करायची. शूर योद्ध्याने शूर योद्ध्याशीच लढायचे. अन्यथा ते अपमानास्पद आहे.
अर्जुनाने समोर पाहिले तरभीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही सर्व गुरुजन मंडळी, ज्यांनी आपल्या शिक्षण दिले. कोणी काका, कोणी मामा, कोणी भाऊ सगळी स्वजन मंडळी युध्दासाठी समोर सज्ज आहेत. हे पाहताच अर्जुनाच्या मनाचा गोंधळ झाला.मनी गजबज झाली. तो संपूर्ण अस्वस्थ झाला. त्याचा परिणाम देहावर झाला. कितीही पराक्रमी वीर असला तरी त्याच्या मनावर आघात झाल्यावर तो दुर्बल होतोच.यामुळे इथे अर्जुनाच्या ठिकाणी वीर वृत्तीच्या ऐवजी करुणा उत्पन्न झाली. जसे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याप्रमाणे विरवृत्ती आणि करुणा भाव एकाच मनात नाही राहू शकत. शत्रूशी लढायचे तर कारुण्य उपयोगाचे नाही. द्या, क्षमा उपयोगाची नाही. तर धैर्याने, शौर्याने लढले पाहिजे. अर्जुन अतिशय कोमेजला झाला. ज्याप्रमाणे वाळलेल्या लाकडाला पोखरण्याचे काम एखादा भुंगा ज्या सहजतेने करतो, तोच भुंगा कमळामध्ये जाताच पाकळी मिटली तरी बा हेर येऊ शकत नाही. तशी अर्जुनाची अवस्था झाली. वीर योद्धा असूनही समोर स्वजन पाहताच त्यांचे सर्व सामर्थ्य निघून गेले. त्यांचे सर्व अंग कापायला लागले. अंगावर रोमांच उभे राहिले. अंगातील ताकदच नाहीशी झाली.हातातील शस्त्रे गळून पडली. तोंडाला कोरड पडली. त्यांचे लाडके गांडीव धनुष्य तेही गळून पडले. काय करावे हे सुचेना. तेव्हा गोपाळकृष्णांना अर्जुन म्हणतो, की ही लक्षणं काही चांगली नाहीत. अशुभ दिसतायत. स्वजनांचा वध करून आपलं कल्याण होईल असं वाटत नाही.
२) युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितली आहेत?
उत्तर :_ अर्जुन समर्थन करतो ' न कांक्षे विजयं कृष्ण' मला जय नको, राज्य नको, भोग नको, वैभव नको याचं कारण असं, की ज्यांच्या समवेत,ज्यांच्यासाठी हे भोग भोगायचे आहेत, ती सर्व मंडळी आपल्या हातून मरणार असतील आणि त्यांना मारून हे भोग मला भोगायचे असतील, तर मला हे राज्य नको. ते आतताईपणे वागले. त्यांना राज्याचा लोभ आहे, म्हणून ते लढतात. ही त्यांना जरी कळत नसल तरी ते आपल्याला का कळू नये? त्यांनी विवेक सोडला तरी आपण विवेकाने वागले पाहिजे. आपल्याच लोकांना मारून राज्य स्विकारावं , असं मला वाटत नाही. अगदी त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मी ते तुच्छ मानतो. ते दुष्ट असतील ही पण त्यांना मारणं पाप आहे. हे असं पाप हातून घडलं तर कृष्णा तू ही आम्हाला सोडून निघून जाशील, आमच्यावर नाराज होशील. असं असेल आणि या युद्धामुळे आम्ही तुला गमावणार असू तर ते राज्य, युद्ध नकोच. तुझा आम्हाला आधार आहे, तो जाता कामा नये.
दुसर अस की युद्ध केलं तर संपूर्ण कुळाचा नाश होईल. कुलधर्माचा ही नाश होईल. धर्म नष्ट होईल, अधर्म होईल, स्त्रिया एकट्या पडतील, मग वर्णसंकर होईल, नरकात जातील त्यांच पिंड दान करायला ही कोणी उरणार नाही. त्यांना तिलोदक कोण देणार? त्यामुळे ते जरी युद्धाला तयार असले तरीही मी युद्ध करणार नाही. त्याहीपेक्षा मी भिक्षा मागेन किंवा त्यापलीकडे जाऊन मी शास्त्रहीन असता जरी त्यांनी माझ्यावर हल्ला केला, माझा वध केला तरी चालेल. तू काहीही सांगितलेस तरी मी युद्ध करणार नाहीस. माझ्या हातून हे महापाप होऊ नये. त्यापेक्षा मरण स्वीकारेन.
३). पहिल्या अध्यायात अर्जुनाने कोणता निर्णय घेतला?
उत्तर:_ ' युद्ध करायचे नाही '. हा ठाम निर्णय अर्जुनाने घेतला.
Ans. 27. रागिणी नेर्लेकर....
प्रश्न आमचा उत्तर तुमचे
१) ज्याच्याशी युद्ध करायचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर व मनावर काय परिणाम झाला आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले ?
उत्तर- युद्धात आपल्यासमोर सर्व जवळचे नातलगत आहेत.आपले आजोबा भाऊ सासरे पुतणे नातू मित्र गुरुवर्य यांच्याशी युद्ध करून मी काय राज्य करू शकेल असे मला वाटत नाही, हे यामुळे अर्जुन चिंताग्रस्त झाला.माया ममता स्नेह प्रेम आपलेपणा ने अर्जुनाचे मन गलबलून गेले . हात पाय गळून गेले व तोंडाला कोरड पडली.शरीराचा थरकाब झाला व त्यांना मारून पाप लागणार आहे या भीतीने अर्जुनाचे मन भयग्रस्त झाले . अंगाचा दाह होऊ लागला .चिंता भीती तणाव वाढू लागला.भीतीने पोटात गोळा येऊ लागला व आपण चक्कर येऊन पडतो की काय असे वाटू लागले . असा परिणाम अर्जुनाच्या शरीरावर झाला.
२) युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितले आहेत ?
उत्तर- अर्जुन चिंताग्रस्त झाला व त्याने युद्ध न करण्याची कारणे सांगितली आपल्या माणसाशी आपणच युद्ध करून त्यांना मारून त्यांची हत्या करून त्यांच्यावर विजय मिळवून राज्य मिळवावे, वैभव मिळवावे ही भावना अर्जुनाला पटेना त्यांना मारून आपण सुखी होणार का त्यांच्याशिवाय आपण जगू शकणार का त्यांच्याशिवाय हे राज्य पद काय कामाचे आपल्याच कुळाचा आपणच नाश करणे हे पाप आहे. ते पाप आम्हाला नको आम्ही नरकात जाऊ कुळाचे रक्षण करणे, समाजाचे स्तौर्य आणि नैतिकता ही धोक्यात येईल कुटुंब कुळाचा नाश म्हणजे कुटुंबाचे नुकसान आपल्याच कुटुंबातील मूळ नष्ट होतील आणि आपल्याला पूर्वजनांच्याही आत्म्याला दुःख होईल. धार्मिक कार्यक्रम थांबेल पूर्वजांना पिंडदान तर्पण करता येणार नाही युद्ध केल्यावर त्याचा परिणाम चालू पिढीला तर होणारच भावी पिढीला पण होणार आणि पूर्वजनांनाही भोगाव लागणार युद्धात घराघरातील करते पुरुष मारले जातील कुटुंबाचा आधार संपेल पुढील पिढीला संरक्षण आधार सुरक्षा कशी मिळणार अशी अनेक कारणे अर्जुन श्रीकृष्णास सांगतात आणि अर्जुन म्हणतो आपल्या प्रियजनांशी युद्ध करून मी जिंकेन पण त्याचा काय फायदा मला राज्यपद उपभोगता येणार नाही मनाला खंत राहील राज्यात धार्मिकता राहणार नाही सगळीकडे अनिती पसरेल मी काही आदर्श राजा बनणार नाही माझ्यावर कलंक पापाचा धब्बा लागेल आपल्याच माणसाशी युद्ध करून त्रैलोक्याचे ही राज्य मिळत असेल तर ते मला नको.
३) पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने काय निर्णय घेतला ?
उत्तर- अर्जुनाने युद्ध न करण्याचा निश्चय केला कुटुंबाचा नाश व नरकाची प्राप्ती टाळण्यासाठी अत्यंत व्याकुळ झालेल्या अर्जुनाने खूप दुःखी मनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला अर्जुन म्हणतो की कुटुंबातील सर्वांचे रक्षण करणे प्रजेचे पालन करणे आपल्या धर्माचे रक्षण करणे, कुळाचे रक्षण करणे एका राजाचे कर्तव्य असते परंतु राजा हे करू शकला नाही तर तो राजा कसला आपल्याबरोबर सर्वजण असतील मोठ्यांचे आशीर्वाद गुरुजनांची शिकवण मित्राचे सहकार्य असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते ते नसतील तर मी एकटा काहीच करू शकणार नाही त्यापेक्षा मी युद्धास तयारच होत नाही मी कोणताच प्रतिकार करीत नाही अशा परिस्थितीत जरी कौरवांनी मला रणांगणात मारले तरी ते मला जास्त कल्याणकारक होईल असे म्हणून शोकाने मन फार उद्दीग्न झालेला अर्जुन बाणा सह धनुष्य टाकून रथात एका बाजूला जाऊन बसला व त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
Ans 28. पद्मा मदनकर....
ओम श्री परमात्म नै नमः
अध्याय 1 युद्ध भूमि वरील अर्जुनाची स्थिति,
अ) ज्यांच्याशी युद्ध करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे सर्व काही पाहिल्यावर अर्जुनाच्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम झाला. अर्जुन करुणेने व्याप्त झाला व अत्यंत शोकाकुल होऊन श्री कृष्णाला म्हणाला की ,माझे सर्व अवयव गळून पडत आहेत, तोंडाला कोरड पडली आहे,शरीराला कंप सुटला आहे अंगावर रोमांच उभे राहिले आहे, हातातून गांडीव धनुष्य गळून पडते आहे .तसेच माझे मन भ्रमिस्टसारखे झाले आहे मी उभा देखील राहू शकत नाही.
अर्जुन म्हणतो हे केशवा मला विपरीत चिन्हे दिसत आहे, युध्दात आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही, मला विजयाची इच्छा नाही, राज्यसुखाची इच्छा नाही, हे गोविंदा असे राज्य आमच्या काय कामाचे? अश्या भोगांनी व जगण्याने काय लाभ होईल?
युध्द न करण्याची कारणे।
1 आम्हाला ज्याच्यासाठी राज्य, भोग, आणि सुख अपेक्षित आहे तेच सर्व संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत, त्यामुळे हे मधुसूदना ! हे सर्व मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी या सर्वांना मारु इच्चीत नाही
2 हे जनार्दना आपल्या आप्तांना मारून आम्हाला पापच लागणार , आपल्याच कुटुंबातील लोकांना मारून आम्ही सुखी कसें होणार? ....
3 जरी लोभमुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारे दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना ! कुळाच्या नाशाने उत्पन्न होणार दोष स्पष्ट दिसत असताना आपण या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करू नये?
4 कुळाचा नाश झाल्यास कुलधर्म नाहीसे होतात व कुळधर्म नाहीसे झाले तर कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावले.
5 कुळातील स्त्रिया बीघडतात , वर्ण संकर होऊन वर्णव्यवस्था नॅश पावते.
6 वर्णसंकरामुळे श्राद्ध, जळतर्पण, पिंडदान इ, ला मुकलेले त्यांचे पितर अधोगतीला जातात.
7 वर्णसंकरामुळे परंपरा गत जातीधर्म व कुळधर्म उद्धवस्त होतात व पूर्वजांना अनिच्चीत काळासाठी नरकात पडावे लागते.
अर्जुनाने युद्धातील कुटुंबियांना ठार मारण्यापासून परावृत्त होण्याचा निर्णय घेतला. जर शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला शस्त्र हातात घेतलेल्या धृतराष्ट्र पुत्रांनी रणात मारले तरी मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट सांगितले.
Ans 29. नीलिमा चौधरी ....
प्रश्न आमचा उत्तर तुमचे अध्याय पहिला
प्रश्न 1 a) ज्यांच्याशी युध्द करावयाचे ते सर्व नातलग आणि जेष्ठ आहेत हे समोर पाहिल्यावर अर्जुनाच्या शरिरावर व मनावर कोणते परिणाम झाले आणि त्यावर अर्जुनाला काय वाटले.
उत्तर --अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरु,मामा,भाऊ,मुलगे ,नातू, मित्र ,सासरेआणि हितचिंतक यांना पाहिले. यासर्वांना पाहून अर्जुन अत्यंत करुणेने व्याप्त झालेला ,शोकाकूल होऊन म्हणाला. हे कृष्णा! युध्दाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत.तोंडाला कोरड पडली आहे .शरिराला कंप सुटला आणि अंगावर रोमांच उभे राहिले त्यांच्या हातातून गाण्डीव धनुष्य गळून पडले. अंगाचा दाह होत आहे तसेच अर्जुनाचे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे त्यामुळे अर्जुन उभा देखील राहू शकत नाही .युध्दात आप्तांना मारुन कल्याण होईल असे असे अर्जुनाला वाटत नाही .अर्जुनाला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाची ही नाही. आम्हांला असे राज्य काय करायचे ? अशा भोगांनी आणि जगण्याने काय लाभ होणार आहे? आम्हांला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुख अपेक्षित आहेत, तेच हे सर्व जण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युध्दात उभे ठाकले आहेत.
b) युध्द न करण्याबद्दल अर्जुनाने कोणती कारणे सांगितले आहेत .
समोर गुरुजन,काका,मुलगे,आजे,मामा,सासरे,नातू,मेव्हणे त्याचप्रमाणे इतर आप्त पाहून अर्जुन म्हणाला हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी या सर्वांना मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा ! हे जनार्दना ! धृतराष्ट्राच्या मुलांना मारुन आम्हांला कोणते सुख मिळणार ? या आततायींना मारुन आम्हाला पापच लागणार .आपल्या बांधवांना आपल्याच कुंटुबियांना मारुन आम्ही सुखी होणार नाही.
कुळाचा नाश झाल्यामुळे दोष उत्पन होईल आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक लागेल .या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करु नये .कुळाचा नाश झाला तर परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात .कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्याप्रमाणात पाप फैलावते. हे पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि स्त्रिया बिघडल्या असता वर्ण व्यवस्थेचा नाश होतो .
वर्णसंकर हा कुळाचा नाश करणार्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राध्द, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात .या वर्णसंकर करणार्या दोषामुळे परंपरागत जातिधर्म आणि कुळधर्म नाहीसे उध्वस्त होतात .हे जनार्दना! ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत ,अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते .असे आम्ही ऐकत आलो आहोत.
c) पहिल्या अध्यायात अर्जुनाने शेवटी काय निर्णय घेतला ?
युध्द न करण्याचे कारणे सांगून रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन बाणासह धनुष्य खाली टाकला .रथाच्या मागील भागात जाऊन बसला आणि युध्द न करण्याचा निर्णय घेतला .
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
जय श्रीकृष्ण,अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. खूप छान अभ्यासाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच सर्व माहिती संकलित करून मिळते आहे ही गोष्ट तर अतुलनीय आहे. खूप खूप आभार आणि धन्यावाद . 🙏
ReplyDelete